उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का बसला असून शिवसेना उबाठामधून बाहेर पडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश केलेल्या सहा खासदारांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच शिवसेनेतील विलीनीकरणाला पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत औपचारिक मान्यता दिली. लोकसभा सचिवालयाने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार, अध्यक्षांच्या या निर्णयामुळे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचे आव्हान, राम मंदिरावर दरोडा टाकणाऱ्यांना संघातून निष्काशित करण्याची हिम्मत आरएसएसने दाखवावी राज्यात दुबार पेरणीचे संकट, दुष्काळाशी मुकाबला करण्याचे सरकारचे नियोजन नाही, बोगस बियाणांप्रमाणे बोगस सरकारचा बोगस कारभार
अयोध्येतील प्रभू रामाच्या मंदिरातील देणगीवर दरोडा टाकून भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेशी खेळ केला आहे. दरोड्यावर आता आरएसएस मधून नाराजी व्यक्त केली जात आहे पण नाराजी व्यक्त करून काही फायदा नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये हिम्मत असेल तर मर्यादा पुरुषोत्तम प्रभूरामाच्या नावावर अब्जावधी रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या संघाशी संबंधित सर्वांना …
Read More »शिवसेना उबाठाचा सोनम वांगचुक आणि अभिजित दिपकेच्या आंदोलनाला पाठिंबा विद्यार्थी आंदोलनाला महाराष्ट्रातून पहिली राजकीय मदत शिवसेना उबाठाची, सीजेपीच्या मोर्चात सामील
जवळपास मागील १५-१६ दिवस झाले, नीट परिक्षेच्या पेपर फुटीप्रकरणी आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्ये प्रकरणी दिल्लीच्या जंतरमंतर येथे कॉकरोज जनता पार्टीचे आंदोलन आणि वातावरणीय कार्यकर्त्ये सोनम वांगचुक यांचे उपोषणाचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेसचे खासदार, कम्युनिस्ट पक्षाचे काही पदाधिकारी आणि काही कलावंतांनी स्वतःहून पुढे येत …
Read More »शिवसेना उबाठाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर सुनेने केले आरोप तीन वर्षापूर्वीची घटना पण २०२६ मध्ये केले आरोप आता
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात, शिवसेनेच्या (यूबीटी) एका माजी खासदाराच्या सुनेने पती आणि सासरच्या मंडळींवर तिला गोमूत्र पिण्यास भाग पाडणे, स्वयंघोषित बाबांकडे जाण्यास लावणे आणि काळ्या जादूच्या विधींसाठी तिचे केस उपटल्याचा आरोप केला आहे. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अंधश्रद्धा विरोधी आणि फौजदारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार गिरिजा राऊत यांनी एफआयआरमध्ये आपले …
Read More »टीईटीच्या पेपरफुटीवरून विधानसभा आणि विधान परिषदेत गोंधळ चर्चेसाठी विधान परिषदेत विधानसभेत विरोधक आग्रही
एकामागून एक पेपरफुटीच्या घटना राज्यात होत असताना २८ जूनला होणाऱ्या टीईटीच्या परीक्षेला पेपर २७ जूनलाच फुटल्याने त्या परीक्षा अचानक रद्द करण्यात आल्या. त्यामुळे शिक्षक होऊ पाहणाऱ्यांचे अनेकांचे स्वप्न भंगले असल्या कारणाने विरोधकांनी सर्व कामकाज बाजूला ठेऊन स्थगन प्रस्ताव मांडत सर्व कामकाज बाजूला सारत याप्रश्नी चर्चा करावी अशी मागणी विधानसभेत शिवसेना …
Read More »उद्धव ठाकरे यांची आमदारांसोबत बैठक, बैठकीला तीन आमदार गैरहजर सभागृहाच्या कामकाजादरम्यान सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे उद्धव ठाकरे यांचे आदेश
मागील काही वर्षांपासून सातत्याने राजकीय आव्हानांना तोंड देत असलेल्या शिवसेना उबाठा पक्षात दुसऱ्यांदा झालेल्या फुटीनंतर राजकीय हालचालींमध्ये वाढ झाली आहे. शिवसेना उबाठापासून पक्षाच्या सहा खासदारांनी फारकत घेतल्यानंतर, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, अर्थात सोमवारी, आपल्या सर्व आमदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावली. ही बैठक ‘शिवालय’ …
Read More »उद्धव ठाकरे यांचे उत्तर, ३० वर्षे भाजपासोबत राहून शिवसेना विसर्जित केली नाही.. तर शिवसेना उबाठा पक्षाच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात शिंदे शिवसेनेला दिले प्रतित्तुर
शिवसेना पक्षाला ६० वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने आयोजित वर्धापन दिना निमित्त मांटुगा येथील षण्मुखानंद हॉलमध्ये आयोजित शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी बोलताना शिंदे शिवसेनेकडून शिवसेना उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप भाजपा आणि शिंदे शिवसेनेकडून करण्यात येत होता. त्या आरोपाला उत्तर देताना शिवसेना …
Read More »व्हिप झुगारल्याने शिवसेना उबाठाच्या त्या सहा खासदारांची खासदारकी रद्द होईल का ? पक्षाच्या बैठकीसाठी व्हिप लागू होत नसल्याची काही तज्ञांची माहिती
संजय बोपेगांवकर शिवसेना उबाठा पक्षातील सहा खासदारांनी दिल्लीत झालेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीला पक्षाचा व्हिप झुगारून गैरहजेरी लावल्यानंतर राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. पक्षाने जारी केलेला ‘व्हिप’कडे दुर्लक्ष केल्यामुळे आता त्या खासदारांवर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाई होणार का? असा मोठा घटनात्मक प्रश्न निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकरणात अनेक कायदेशीर आणि राजकीय …
Read More »शिवसेना उबाठाच्या त्या सहा बंडखोर खासदारांना सुरक्षित ठिकाणी हलवले रात्री राजस्थान वरून मुंबईत येण्याची शक्यता
काल शिवसेना उबाठा पक्षाने बोलाविलेल्या बैठकीसाठी दिल्लीतील खासदारांना व्हिप जारी केल्यानंतरही ते सहा बंडखोर खासदारांनी बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. आता ते सहा खासदार फुटल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. हा शिवसेना उबाठा सेनेला मोठा धक्का मानला जात आहे. आता या सहा खासदारांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली असून, त्यांना वाय प्लस सुरक्षा …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीस भाजपाचे मोदी- फडणवीस सरकारच जबाबदार कांद्याच्या हमीभावासाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये मविआचा शेतकरी क्रांती महामोर्चा, प्रति क्विंटल ३ हजार रुपये हमीभाव द्या
कांद्याला सध्या प्रति क्विंटल २००-३०० रुपये एवढा कमी भाव मिळत असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आजच्या विदारक परिस्थितीस भाजपाचे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार आहे, असा हल्लाबोल करत शेतकऱ्यांच्या कांद्याला भरीव हमीभाव मिळाल्याशिवाय काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी स्वस्थ बसणार नाही, सरकारला सळो की पळो करून सोडू, असा इशारा महाराष्ट्र …
Read More »
Marathi e-Batmya