Editor

नाना पटोलेंचा आरोप, देशातील शेती व शेतकरी उद्ध्वस्त करण्याचे काम भाजपा सरकारचे नक्षलवादी, दहशतवादी, आंदोलजीवी संबोधून भाजापाकडून शेतकऱ्यांचा अपमान

केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. भाजपाची धोरणे शेतकरी विरोधी असून कृषी साहित्य, खते महाग झाली आहेत तर शेतमालाला हमी भाव मिळत नाही. शेती करणे परवडत नसल्याने शेतकरी आतमहत्या वाढल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे शेतीची अवस्था दयनीय झाली असून देशातील अन्नदात्याला उद्ध्वस्त केले जात …

Read More »

अजित पवारांचा आरोप, ४ महिन्यात वर्षावरील चहापाणावर २ कोटींचा खर्च, चहामध्ये सोन्याचा अर्क ? शिंदे-फडणवीस सरकारकडून जाहिरातबाजीवर वारेमाप खर्च

अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विरोधी पक्षांची बैठक विधानभवनात आज झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी शिंदे गटाची शिवसेना आणि भाजपावर टीका करताना सरकारकडून जाहिरातबाजीवर वारेमाप खर्च केला जात असल्याचा आरोप करत ग्रामीण भागाच्या विकासासाठी असलेल्या निधीचे वितरण झालेले नाही. आर्थिक वर्ष संपत आले. त्यामुळे हा …

Read More »

डॉन गवळी यांच्या बंधूचा मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत भावाने केला शिवसेनेत प्रवेश दगडी चाळीतील अनेक गवळी समर्थकांनीही केला प्रवेश

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना दोन गटांमध्ये विभागली गेली. पहिला ठाकरे गट आणि दुसरा शिंदे गट. निवडणूक आयोगाने एक आठवड्यापूर्वी शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्यानंतरही शिवसेनेतलं इनकमिंग वाढलं आहे. अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीचा भाऊ प्रदीप गवळी आणि माजी नगरसेविका वंदना गवळी या दोघांनी …

Read More »

राहुल गांधी यांनी सांगितला भारत जोडो यात्रेचा स्वानुभव, मी अहंकाराने यात्रा सुरु केली होती पण… माझ्या पायांना वेदना होत होत्या पण माझ्या चेहऱ्यावर हासू होते, रडावसं वाटत होते

मागील दोन दिवसांपासून काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन छत्तीसगड येथील रायपूर येते सुरु होते. या अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने आलेला स्वानुभव सांगताना म्हणाले, चार महिने कन्याकुमारी ते श्रीनगर अशी भारत जोडो यात्रा आम्ही काढली. व्हिडिओत तुम्ही माझा चेहरा पाहिला. मात्र आमच्यासोबत लाखो लोकं …

Read More »

भास्कर जाधवानी दिघेंचे नाव घेत एकनाथ शिंदे यांना जयचंदचा दिला इशारा दिघेंनी तुम्हाला दुःखातून बाहेर काढलं पण बाळासाहेब गेल्यानंतर तुम्ही त्यांच्या मुलांना दुखः ढकलल

धर्मवीर चित्रपटात एकनाथ शिंदे यांनी आपली दोन मुले गमावल्याचा प्रसंग दाखविला आहे. अतिशय दुःखद आणि दुर्दैवी असा तो प्रसंग आहे. दोन दोन मुलं ज्याला गमवावी लागली, त्याचे दुःख काय असते? हे आम्ही समजू शकतो. कुणासोबतच असा प्रसंग घडू नये. त्या प्रसंगानंतर धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी तुम्हाला सावरलं. तुम्हाला दुःखातून बाहेर …

Read More »

राहुल गांधींचा सवाल, अदानी- मोदींचे नाते काय, चीन प्रश्नी मोदींच्या मंत्र्याने दाखवली ती देशभक्ती? संसदीय समितीमार्फत चौकशी का केली जात नाही

काही दिवसांपूर्वी लोकसभेत मी एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्योगपती अदानी यांच्यासोबतचा विमानातला फोटो दाखवित नरेंद्र मोदी यांचे अदानी सोबतचे नाते काय ? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर भाजपाचे सगळे मंत्री आणि खासदार बचावासाठी उभे राहिले. अदानी इतका मोठा देशभक्त आहे का? की त्याच्या बचावासाठी भाजपाचे सगळे खासदार-मंत्री उभे राहिले …

Read More »

सरन्यायाधीश चंद्रचूड यांची स्पष्टोक्ती, भेदभाव वाढल्याने दलित-आदिवासी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या ७५ वर्षा प्रतिष्ठित संस्थांबरोबर सहानुभूतीच्या संस्था निर्माणाची गरज

भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्यांबाबत मोठं विधान केलं आहे. उपेक्षित वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढत आहेत. यामध्ये बहुतांश विद्यार्थी हे दलित आणि आदिवासी समाजातील आहेत, हे संशोधनातून समोर आलं आहे. समाजातील एखाद्या उपेक्षित घटकाबद्दल सहानुभूती नसल्यामुळे जो भेदभाव वाढला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, अशी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही, देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा हिस्सा अग्रेसर ठेवण्याचा प्रयत्न देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा क्रमांक अग्रेसर ठेवेल

महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन इकॉनॉमी करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यात महाराष्ट्र १ ट्रिलीयन इकॉनॉमी देऊन देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा क्रमांक अग्रेसर ठेवेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मुंबईतील हॉटेल ग्रँड हयात येथे एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री शिंदे …

Read More »

नारायण राणेंचा अजित पवारांना बारा वाजविण्याचा इशारा देत ठाकरेंच्या खोक्याची कॅसेट माझ्याकडे कसबा निवडणूकीवरून राणेंचा अजित पवार, उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यातील पोटनिवडणूकीच्या प्रचारादरम्यान भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टोलेबाजी करत, ज्या ज्या नेत्यांनी शिवसेना सोडली, ते सर्व नेते निवडणुकीत हरले आहेत. नारायण राणे हे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले होते, ते तर दोनवेळा निवडणुकीत हरले. वांद्रे येथे तर …

Read More »

अशोक चव्हाण यांची टीका, केंद्राच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे न्यायमुर्तीही सुरक्षित राहिले नाहीत काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात भाजपावर जोरदार टीकास्त्र

सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयात केंद्र सरकारचा हस्तक्षेप वाढतो आहे. न्यायमुर्ती सुद्धा सुरक्षित राहिलेले नाहीत. न्यायालये ही न्यायाची शेवटची आशा असते. उद्या तिथेही न्याय मिळणार नसेल तर सर्वसामान्यांनी जायचे कुठे? असा परखड सवाल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. येथे सुरू असलेल्या तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात राजकीय प्रस्तावासंदर्भात मते मांडताना …

Read More »