ओबीसी आरक्षणाकरता आमचा लढा शेवटपर्यंत सुरु ठेवणार आहोत. कुठलीही किंमत मोजावी लागली तरी भाजपा ओबीसी आरक्षणाचा लढा लढत राहील. तो पर्यंत २७ टक्के तिकिटे आम्ही ओबीसींना देणार हा भाजपाचा निर्धार आहे. भाजपा हा पक्ष ओबीसींच्या विश्वासावर मोठा झाला असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगत आम्ही केवळ अलंकारिक पद्धतीने ओबीसींना …
Read More »राऊतांचा मनसेवर निशाणा साधत भाजपाला आव्हान पोलिसांच्या भीतीने भोंगे गायब झाले, महागाईवर बोला
मागील काही दिवसांपासून राज्यात मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसे, भाजपाने राज्यातील महाविकास आघाडीवर निशाणा साधत असतानाच आज शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी मनसेवर टीकेची झोड उठवित भाजपाला महागाईच्या मुद्यावरून बोलण्याचे आव्हान दिले. महाराष्ट्रात पोलिसांच्या भीतीने सर्व राजकीय भोंगे गायब झाले, असे सांगत त्यांनी हिंदू समाजातच फूट पाडण्याचा प्रयत्न केला. खरंतर …
Read More »वीज तुटवड्यानंतर आता सर्वसामान्यांना गॅस दरवाढीचा शॉक घरगुती गॅस एक हजार रूपयांवर दरात ५० रूपयांची वाढ
मागील काही दिवसांपासून कोळसा तुटवड्यामुळे वीज टंचाईचा प्रश्न निर्माण झालेला असून देशातील अनेक राज्यांमध्ये वीजेचे लोडशेडींग सुरु झाले आहे. त्यातच आधीच पेट्रोल-डिझेलमुळे जीवनावश्यक वस्तुंच्या प्रचंड दरवाढीमुळे महागाईचा सामना करावा लागत असलेल्या सर्वसामान्य नागरीकांचा स्वयंपाकही महाग करून टाकला आहे. केंद्राने घरगुती गॅसच्या दरात ५० रूपयांची वाढ केली. त्यामुळे आता घरगुती गॅसची …
Read More »अजित पवारांचा टोला, काही नेते घोषणा करतात आणि घरात जावून बसतात अन्… मनसेप्रमुख राज ठाकरेंवर साधला निशाणा
मागील महिन्यापासून मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत संघर्षाची भूमिका स्विकारली. मात्र त्यांच्या आक्रमक भूमिकेचा सर्वाधिक फटका हिंदू धर्मियांच्या मंदिरांना आणि कार्यक्रमांना बसला. तरीही मनसे कडून मस्जिदींवरील भोंग्यावरून अद्यापही आंदोलन मागे घ्यायला तयार नाही. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज ठाकरेंवर पुन्हा एकदा …
Read More »न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने सुरु केली निवडणूकीची प्रक्रिया नगरपरिषद/नगरपंचायतींच्या प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती व सूचनांसाठी १४ मे पर्यंत मुदत
काही दिवसांपूर्वी ओबीसी आरक्षण आणि कोरोनामुळे रखडलेल्या स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणूका प्रलंबित राहीलेल्या आहेत. मात्र त्याविषयीची प्रक्रिया दोन आठवड्यात पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर अखेर राज्य निवडणूक आयोगाने या निवडणूका घेण्याच्या अनुषंगाने निवडणूकीच्या अनुषंगाने प्रक्रिया सुरु केली. या पहिल्या टप्प्यातील प्रक्रियेत राज्यातील २१६ नगर परिषदा-नगरपंचायतींच्या प्रभाग रचनेसंदर्भातील हरकती व …
Read More »उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांच्या सुविधेसाठी लाल परीचे नियेाजन करा मंत्री, ॲड. अनिल परब यांचे निर्देश
कोरोना आणि संप या पार्श्वभूमिवर एसटी महामंडळ गेल्या दोन वर्षात एका वेगळ्याच परिस्थितीशी झुंज देत होते. या काळात जो विस्कळीतपणा आलेला आहे तो दूर करून उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी वाहतूकीचे नियोजन करा, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी विभाग नियंत्रकांना दिले. …
Read More »मुंबई काँग्रेस म्हणते, सर्व आगामी निवडणुकांमध्ये EVM मशीन ऐवजी Ballot Paper चा वापर करा भाई जगताप यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
वर्ष २०१६ ते २०१९ या कालावधीत, नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात देशभरातून सुमारे १९ लाख EVM मशिन्स गायब झाल्या आहेत. त्यातील ९ लाख ६० हजार मशिन्स भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BHEL) व ९ लाख ३० हजार मशिन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECIL) च्या होत्या. या गायब झालेल्या EVM मशिन्स अजूनही मिळालेल्या नाहीत. …
Read More »काँग्रेसच्या आवाहनाला चंद्रकांत पाटलांचा प्रतिसाद, ती भूमिका त्यांची वैयक्तिक ओबीसी आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी न्यायालयाच्या सूचनेनुसार काय केले सांगा
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून उत्तर प्रदेशातील ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंनी माफी मागावी अन्यथा त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देवू देणार नसल्याचा इशारा दिल्यानंतर याप्रश्नी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यासंदर्भात देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन केल्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील …
Read More »तुरूंगातून बाहेर आल्यानंतर आमदार रवि राणांचा मुख्यमंत्र्यावर निशाणा १५ वर्षांनी त्यांना हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचं आठवलं
हनुमान चालिसावरू मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आव्हान दिल्याप्रकरणी तब्बल १२ दिवस तुरुंगात घालविल्यानंतर बाहेर आलेले अमरावतीचे आमदार रवि राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि मुंबई महापालिकेवर निशाणा साधला. १५ वर्षानंतर यांना मी रहात असलेली इमारतीचे बांधकाम बेकायदेशीर असल्याची टीका आमदार रवि राणा यांनी करत आता मुख्यमंत्र्यांनी घरातून बाहेर …
Read More »राज ठाकरेंवर अटकेची टांगती तलवार, न्यायालयाकडून दुसऱ्यांदा अजामीनपत्र वॉरंट २००८ मधील प्रकरणी परळीतील न्यायालयाने वॉरंट बजावले
भोंग्याच्या मुद्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबादेत गुन्हा दाखल झाल्यानंतर राज ठाकरे यांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र राज ठाकरे यांना न्यायालयाने दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट बजावित न्यायालयाने हजर होण्याचे आदेश दिले आहे. विशेष म्हणजे हे अजामीपात्र वॉरंट एका त्यांना २००८ मधील प्रकरणी आहे. त्यामुळे राज यांच्या …
Read More »
Marathi e-Batmya