उत्तर प्रदेशमध्ये भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंविरोधात दंड थोपटले आहेत. आता त्यांना उत्तर प्रदेशमधील साधु, संत आणि महंतांचाही पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात मनसे आणि भाजपची जवळीक दिसत असली तरी उत्तर प्रदेशमध्ये वेगळंच चित्र तयार झालंय. यावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी …
Read More »शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर राणाच्या फोटोसेशनवरून आरोग्य मंत्री म्हणाले… रूग्णालयात असे करणे किंवा जाणीवपूर्वक करणे चुकीचे
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी तुरूंगातून जामीनावर बाहेर आल्यानंतर स्वतःची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी वांद्रे येथील लीलावती रूग्णालयात दाखल झाल्या. मात्र रूग्णालयात असताना नवनीत राणा यांनी त्यांच्यासोबत तेथे घडत असलेल्या अनेक गोष्टींचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करत लोकांमधून सहानभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र राणा यांनी व्हायरल केलेल्या काही फोटोंबाबत शिवसेनेने आक्षेप …
Read More »सरपंच व सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास १ वर्षाची मुदतवाढ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा
राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका माहे जानेवारी २०२१ मध्ये पार पाडण्यात आल्या आहेत. यात राखीव प्रवर्गातील ग्रामपंचायत सरंपच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना विशेष बाब म्हणून जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात पुनश्च एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. सबब जात वैधता प्रमाणपत्र १७ जानेवारी २०२३ पर्यंत सादर करण्याबाबतची घोषणा ग्रामविकास व …
Read More »पंडित शिवकुमार शर्मांवर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या या भावना
भारतीय संगीताच्या मानबिंदूचा अस्त-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पं.शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली संतूर या वाद्याची जगाला ओळख करून देणारा, संतूरच्या अलौकिक तरंगांनी जगाला भुरळ घालणारा भारतीय संगीत क्षेत्राचा एक मानबिंदू अस्ताला गेला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ संगीतकार, संतूरवादक पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांना निधनाबद्दल श्रद्धांजली मुख्यमंत्री उध्दव …
Read More »राज ठाकरेंचे पत्र, कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, उध्दव ठाकरे तुम्हीही मनसैनिकांना बजावलेल्या नोटीसा आणि तडीपारीवरून राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
राज्यातील मस्जिदींवरील भोंग्याच्या प्रश्नावरून राज्यातील मनसैनिकांना पोलिसांनी तडीपारीच्या नोटीसा आणि अटकेची कारवाई करण्यात आल्यानंतर अखेर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना खोचक इशारा देत कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, उध्दव ठाकरे तुम्हीही नाही असे सांगत गर्भित इशारा दिला. मस्जिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र …
Read More »अयोध्येतील महंताचा राज ठाकरेंना आठवड्याचा अल्टीमेटमः छटी का दुध… आठ दिवसात माफी मागितली तर प्रवेश
उत्तर भारतीयांच्या विरोधात मनसेने केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची आठ दिवसात माफी मागावी असे थेट आव्हान अयोध्येतील महंतानी दिला असल्याने राज ठाकरे यांनी आपली भूमिका हिंदूत्ववादी केली तरी त्यांच्या दौऱ्यात हिंदू म्हणून स्वागत होताना दिसत नसल्याचे स्पष्ट होत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून …
Read More »सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने फडणवीसांचा खोटारडेपणा उघड मध्य प्रदेशातील ओबीसींचे आरक्षण कोणामुळे गेले? याचे उत्तर फडणवीसांनी द्यावे- नाना पटोले
मध्यप्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्यात असे आदेश आज सर्वोच्च न्यायालायाने दिले आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाला आणि महाविकास आघाडीला दोष देणा-या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा खोटारडेपणा उघड झाला असून भाजपाच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मारेकरी असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले …
Read More »संतूर वाद्याला जगद् विख्यात बनविणारे संतूर वादक पंडित शिवकुमार यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने घेतला अखेरचा श्वास
काश्मीरच्या संतूर या लोकवाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून देणारे आणि आपल्या हळूवार संतूर वादनाने संतूरच्या स्वराची मोहिनी घालणाऱे जगद्विख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे आज निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संतूरचा एक स्वर कमी झाल्याची भावना संगीतप्रेमीमध्ये व्यक्त करण्यात येत आहे. प.शिवकुमार शर्मा यांना आज सकाळी हृदयविकाराचा झटका …
Read More »चंद्रकांत पाटील म्हणाले, उध्दव ठाकरेंना उत्तर देणार १५ मेच्या सभेतून आम्ही उत्तर देऊ
या राज्यात आता न्यायालय सोडून बाकी कोणाकडून न्यायाची अपेक्षाच नाही. म्हणजे सुरुवातीला आरोप करायचा, मग एफआयआर दाखल करायचा, मग एफआयआर न्यायालयात नुसता फेटाळला गेला की न्यायालय ठोकतं, जसं राजद्रोहाच्याबाबत ठोकलं. मग काहीच नाही तर महापालिकेडून घरावर नोटीस जाईल. मग त्या नोटीशीला देखील उच्च न्यायालयात स्थगिती मिळणार. असा सामान्य माणसाला त्रास …
Read More »राज ठाकरे, आदित्य ठाकरेनंतर आता नाना पटोले अयोध्येचा दौऱ्यावर दशरथ गढीच्या महंताकडून पटोलेंना निमंत्रण
अयोध्या दौऱ्यावरून शिवसेना आणि मनसेत असली नकली हिंदूत्वावरून राजकारण सुरु झालेले असताना आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर थेट भाजपाच्या खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनी राज ठाकरेंना आव्हान दिले असतानाही राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचा पुर्नरूच्चार केला. त्यापाठोपाठ शिवसेना नेते तथा मंत्री आदित्य ठाकरे हे ही …
Read More »
Marathi e-Batmya