मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती एच.एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ अजित देसाई आणि डॉ शेखर भोजराज यांनी दिली आहे. तर पुढील तीन ते चार दिवसात मुख्यमंत्री कामावर रूजू होणार असल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी दिली. मानेच्या दुखण्यामुळे काल रूग्णालयात मुख्यमंत्री …
Read More »मराठवाड्यातील या तीन जिल्ह्यांमधील पाणीप्रश्न निकाली निम्न पैनगंगा धरणापर्यंत ४४.५४ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरण्यास मंजुरी-जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी निम्न पैनगंगा धरणापर्यंत ४४.५४ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरण्यास मंजुरी दिली. निर्णयामुळे यवतमाळ, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील काही भागास अधिकचे पाणी उपलब्ध होईल अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देत या निर्णयाच्या माध्यमातून मराठवाड्याच्या दृष्टीने दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. गोदावरी पाणी तंटा लवादामध्ये निम्न पैनगंगा धरणापर्यंतचे पाणी वापरण्यास …
Read More »गॅस सिलिंडरपासून अपघात झाल्यास मिळेल ५० लाखांची भरपाई, जाणून घ्या… घराच्या नुकसानीसाठीही करता येणार दावा
मुंबई: प्रतिनिधी आजच्या काळात प्रत्येकाच्या घरात गॅस सिलिंडर आहे. छोट्याशा चुकीमुळे मोठा अपघात होऊ शकतो म्हणून गॅस सिलिंडरचा वापर अत्यंत जपून केला जातो. अशा परिस्थितीत एलपीजी वापरताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास काय केले पाहिजे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच एलपीजी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला किंवा गॅस गळतीमुळे अपघात झाला तर ग्राहक म्हणून तुमचे अधिकार काय आहेत, हेही जाणून घेतले पाहिजे. ५० लाख रुपयांपर्यंतचा विमा एलपीजी कनेक्शन घेतल्यावर पेट्रोलियम कंपन्या ग्राहकाला वैयक्तिक अपघात कवच देतात. एलपीजी सिलेंडरमधून गॅस गळती किंवा स्फोट झाल्यामुळे अपघात झाल्यास ५० लाख रुपयांपर्यंतचा हा विमा आर्थिक मदतीच्या स्वरूपात आहे. या विम्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांची विमा कंपन्यांशी भागीदारी आहे. डिलिव्हरीपूर्वी सिलिंडर पूर्णपणे ठीक आहे की नाही हे तपासणे आवश्यक आहे. ग्राहकाच्या …
Read More »वक्फवर नाहीतर मंडळांतर्गत पुणे जिल्ह्यातील एका संस्थेवर छापा वक्फ मंडळाची किंवा व्यक्तिश: माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करु नये-मंत्री नवाब मलिक
मुंबई: प्रतिनिधी वक्फअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या पुणे जिल्ह्यातील एका संस्थेवर आज अंमलबजावणी संचालनालयामार्फत (ईडी) छापा पडल्याची माहिती मिळाली आहे. तथापी, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या कोणत्याही कार्यालयावर छापे पडलेले नाहीत, यासंदर्भात चुकीची माहिती प्रसारीत होत असल्याने स्पष्टीकरण करत असल्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत …
Read More »इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी १२ नोव्हेंबर पासून अर्ज स्वीकारले जाणार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरावे- शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेची आवेदनपत्रे शुक्रवार १२ नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरावीत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे. परीक्षेस नियमित, …
Read More »अमृता फडणवीसांचा नवाब मलिकांना ४८ तासांचा अल्टीमेटम कायदेशीर नोटीस पाठवित दिला इशारा
मुंबईः प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या एका गाण्याच्या व्हिडिओ अल्बमला ड्रग्ज पेडलर जयदीप राणा याने फायनान्स केल्याचा आरोप करत त्यासोबतचा फो अमृता फडणवीस यांचा फोटो शेअर केला. त्यावर अमृता फडणवीस यांनी माझी …
Read More »त्य़ा नेत्यांवरील आरोपांच्या चौकशीचे काय झाले? राष्ट्रवादी जाणार ईडीकडे ईडीची वेळ घेवून जणार असल्याची नवाब मलिक यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी साधारणतः दोन वर्षांपूर्वी त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीत असलेल्या अनेक नेत्यांच्या वर धाडसत्र सुरु झाले होते. मात्र त्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ईडीकडून सुरु झालेला तपास कुठेपर्यत झाला याची माहिती घेवून त्या अनुषंगाने असलेली पक्षाकडे जमा झालेली माहिती देण्यासाठी लवकरच ईडीच्या अधिकाऱ्यांची वेळ घेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »भाजपाचे माजी आमदार राजू तोडसाम यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश… प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा
मुंबईः प्रतिनिधी यवतमाळ जिल्ह्यातील अर्णी विधासभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेश पार पडला. आदिवासी समाजाचा एक प्रामाणिक, होतकरु नेता राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याबाबत जयंत पाटील यांनी समाधान व्यक्त केले. तसेच …
Read More »समुद्रमार्गे गुजरातमधून देशभरात ड्रग्जचा व्यापार चालतोय; याच्यामागे कोण? याचा खुलासा एनसीबी आणि एनआयए यांनी करावा- नवाब मलिक
मुंबईः प्रतिनिधी समुद्रमार्गे गुजरातमधून देशभरात ड्रग्जचा व्यापार चालतोय हे आता सिद्ध होतेय त्यामुळे याच्यामागे कोण आहे याचा खुलासा एनसीबी आणि एनआयए यांनी करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. काल गुजरातच्या द्वारका येथे ३५० कोटीचे ड्रग्ज सापडले आहे. त्याआधी मुंद्रा एअरपोर्टवर …
Read More »PF व्याजाचे पैसे आले नाहीत तर येथे करा तक्रार १ मिनिटात जाणून घ्या तुमची शिल्लक
मुंबईः प्रतिनिधी सरकारने देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात व्याज जमा करण्यास सुरुवात केली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी सरकार EPF बचतीवर ८.५ टक्के दराने व्याज देत आहे. व्याजाचे पैसे पीएफ खात्यात आले की नाही, ते तुम्ही घरी बसून पाहू शकता. याशिवाय जर तुमच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा झाली नसेल, तर …
Read More »
Marathi e-Batmya