Editor

भाजपाचा मुख्यमंत्र्यांना सवाल, निर्बंधांमुळे सामान्य माणसांनी जगायच कसं ? अस्वस्थता दडपण्यासाठी राज्य सरकारकडून कोरोनाच्या नावाखाली सामाजिक आणीबाणी- प्रवक्ते केशव उपाध्ये

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात गेल्या १५ महिन्यांत वेगवेगळ्या पध्दतीने लाँकडाऊन कडक निर्बध सुरू असून या निर्बंधांमुळे सामान्य माणसापुढे जगायचं कसं प्रश्न उभा राहिला असल्याने समाजात मोठा असंतोष पसरत आहे. हा असंतोष प्रकट होईल या भीतीपोटी राज्यातील आघाडी सरकारने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची दहशत पसरवत सामाजिक आणिबाणी लागू केली जात आहे. तिसऱ्या …

Read More »

संन्यास घेवू म्हणणारे, धनगर आरक्षणाचे काय झाले? ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न हे भाजपाचे पाप

मुंबई, दि. २७ जून ओबीसी समाजाला चार महिन्यांत आरक्षण देईन अन्यथा राजकारणाचा संन्यास घेईन अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा देणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला सत्तेत आल्यावर पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण देण्याचा निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले? असा प्रश्न विचारुन ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा …

Read More »

पदोन्नतीतील आरक्षण प्रश्न आणखी रखडणार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीला दोन महिन्यांची मुदतवाढ

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्य सरकारच्या सेवेत कार्यरत असलेल्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण मिळण्यास आणखी कालावधी लागणार असून यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीला आणखी दोन महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पुढील काही काळ तरी याप्रश्नी निर्णय होणार नसल्याने हा विषय रखडण्याची शक्यता निर्माण झाली …

Read More »

पंकजा मुंडेचा इशारा आरक्षण दिल्याशिवाय निवडणूका होवू द्यायच्या नाहीत ओबीसी चिंतनमंथन शिबीरात मांडली भूमिका

लोणावळा : प्रतिनिधी हे शिबीर निर्णय आणि निश्चयाचे आहे. 3-4महिन्याच्या आत empirical data तयार करून सर्वोच्च न्यायालयात सादर करावा. OBC च्या आरक्षणाला संरक्षण दिल्याशिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ न देण्यासाठी सरकारने न्यायालयात जावे अशी मागणी करत आरक्षण मिळाल्याशिवाय या निवडणूका होवू द्यायच्या नाहीत असा इशाराही भाजपाच्या राष्ट्रीय सचिव …

Read More »

सेट-नेट पीएचडीधारकांसाठी खुषखबर: रखडलेली प्राध्यापकांची भरती लवकरच उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे संघर्ष समितीला आश्वासन

पुणे : प्रतिनिधी मागील एकवर्षापासून कोरोना विषाणूमुळे रखडलेली प्राध्यापकांच्या रिक्त जागांची भरती प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी देत ही भरती ३ हजार ६४ रिक्त पदांसाठीची राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. सेट-नेट पीएचडी पात्रता धारक संघर्ष समितीच्यावतीने २१ जून २०२१ रोजी पासून …

Read More »

सत्ता मिळाली की सर्वकाही करेन… ही भावना खऱ्या लोकप्रतिनिधीची नाही राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र

नांदेड: प्रतिनिधी सत्ता आल्याशिवाय मी काहीच करणार नाही महाराष्ट्रासाठी…मला सत्ता मिळाली की मी सर्वकाही करेन… सत्ता मिळेपर्यंत महाराष्ट्रातील जनतेसाठी काहीही करणार नाही ही भावना खऱ्या लोकप्रतिनिधीची नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. आम्हाला सत्ता द्या ओबीसी समाजाचे आरक्षण चार महिन्यात देतो …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेकडून संभाजी राजेंचे कौतुक तर फडणवीसांना तिरकस बाण अनेकजण आदळआपट करत आहेत मात्र मी त्यावर बोलणार नाही

मुंबई: प्रतिनिधी संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचं, हे ज्याला कळतं तोच खरा नेता असतो. गर्दी करून ताकद दाखवता येते. मात्र, त्यामुळे करोनाची साथ पसरण्याचा धोका आहे असा टोला भाजपाला लगावत अनेकजण आदळआपट करत आहेत. पण त्याविषयी मी तुर्तास फार बोलणार नसल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगत ओबीसी आरक्षणप्रश्नी …

Read More »

#BreakTheChain अंतर्गत सोमवारपासून फक्त या गोष्टींना परवानगी ! कोविड-19 निर्बंधांशी संबंधित विविध बाबींचे स्पष्टीकरण

मुंबई : प्रतिनिधी राज्य आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वास विभागामार्फत ‘ब्रेक दि चैन’ अंतर्गत ४ जून २०२१ पासून लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये विस्तार करताना जमाव व मेळावे, धार्मिक स्थळ,खाजगी प्रशिक्षण वर्ग कौशल्य केंद्रे, हॉटेल, पर्यटन स्थळासंदर्भात काही क्षेत्रांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे, जेणेकरून निर्बंधांची अंमलबजावणी करताना त्यात गैरसमज किंवा अस्पष्टता  येणार नाही. जमाव/ मेळावे 1- जमावाची व्याख्या ‘एका सामुहिक कारणासाठी …

Read More »

जयंत पाटील म्हणाले भाजपा म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’ साधी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला

मुंबई: प्रतिनिधी ओबीसी आरक्षणाबाबत आंदोलन करणार्‍या भाजपला ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’ असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे. राज्यभरातील ओबीसी नेतृत्व ठरवून मोडीत काढणारा भारतीय जनता पक्ष आज राज्यभर ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत आहे अशा आशयाचे ट्वीट जयंत पाटील यांनी …

Read More »

भाजपाचे ‘जेलभरो आंदोलन’ म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ ओबीसींच्या हक्कासाठी काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन

मुंबई: प्रतिनिधी ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द होण्यास राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार आहे. या आरक्षणासाठी आवश्यक असलेली आकडेवारी सुप्रीम कोर्टाने मागितली असता केंद्र सरकारने ती दिली नाही. राज्यात व केंद्रातही भाजपाचे सरकार असताना जाणीवपूर्वक कोर्टाला आकडेवारी दिली नाही म्हणूनच ओबीसींचे राजकीय आरक्षण …

Read More »