Editor

तांडवचे निमित्त…मात्र ५ वर्षातील राजकिय घटनांचा इतिहास तत्कालीन परिस्थितीवर भाष्य करणारी वेबसीरीज

२०१४ साली झालेल्या देशातील सत्तांतरानंतर भाजपाचा दबदबा संपूर्ण देशभरात वाढला. तर दुसऱ्याबाजूला केंद्रातील भाजपा सरकारकडून लोकशाहीवादी लोकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यांवर गदा येण्यास सुरुवात झाली. तसेच संपूर्ण सामाजिक जीवनाला वळण देणाऱ्या गोवंश हत्या, पाकिस्तानच्या अनुशंगाने सुरु झालेल्या राजकारणाच्या माध्यमातून देशात मुस्लिम विरोधी वातावरणाला मिळणारे खतपाणी आदी मुळे देशात पहिल्यांदाच मोदी भक्त विरूध्द …

Read More »

आठवड्यातील या चार दिवशी होणार कोरोना लसीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला लसीकरणाचा आढावा

मुंबई : प्रतिनिधी राज्यात मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी होणाऱ्या कोरोना लसीकरणाचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. आठवड्यातील चार दिवस राज्यातील २८५ केंद्रांवर लसीकरण होणार असून ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यावेळी केले. वर्षा येथील समिती कक्षातून मुख्यमंत्र्यांनी …

Read More »

खोटे आकडे देऊन दिशाभूल करण्यापेक्षा भाजपने पराभव मान्य करावा ४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा-बाळासाहेब थोरात

मुंबई : प्रतिनिधी राज्यात पार पडलेल्या १४ हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले असून राज्यातील चार हजारांहून अधिक ग्रामपंचायतीत काँग्रेस पक्षाने बहुमताने विजय मिळवला आहे. राज्याच्या सर्व भागातील ग्रामपंचायतीत महाराष्ट्र विकास आघाडीने ८० टक्के जागा मिळवून प्रचंड मोठा विजय मिळविला आहे. या निकालातून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या एक वर्षाच्या …

Read More »

कोरोना: ८ महिन्यानंतर पहिल्यांदाच आढळले आतपर्यंतचे सर्वात कमी बाधित १ हजार ९२४ नवे बाधित, ३ हजार ८५४ बरे झाले तर ३५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी साधारणत: आठ महिन्यापूर्वी राज्यातील दैंनदिन कोरोना बाधितांची संख्या २ हजाराच्या आत आढळून येत असे. मात्र त्यांनंतर त्यानंतर या ८ महिन्यात सातत्याने संख्या वाढताना दिसत होती. परंतु पहिल्यादांच २ हजाराच्या आत अर्थात १९२४ इतके दैंनदिन रूग्ण आज आढळून आले. तर मागील २४ तासात आज ३,८५४  रुग्ण बरे होऊन घरी, …

Read More »

सहा हजार ग्रामपंचायतींत भाजपाला बहुमत मिळेल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला असून सध्याच्या कलानुसार ६ हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींत भाजपा बहुमत मिळवेल, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपाचे निवडणूक आघाडीचे संयोजक सुनील कर्जतकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख …

Read More »

न्यु नॉर्मल-New normal अर्चना शंभरकर लिखित कोरोना काळात नव्याने स्थिरावत चाललेल्या गोष्टींवरील भाष्य

फार फार वर्षा पुर्वीची गोष्ट आहे… आमची नानी आम्हाला कोणतीही गोष्ट सांगतांना या वाक्यानेच सुरूवात करायची. आणि या वाक्यानंतर एका अद्भूत आणि अनाकलनीय अशा गोष्टींचा खजीना उघडत जायचा. यात कधी राजाचे प्राण पोपटात असायचे, तर कधी सात समुद्र, सात डोंगर भाषेची, प्रवासाची किंवा गुगल मॅपची अशी कोणतीही अडचण न येताही …

Read More »

अखेर ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेण्यास सरकारची परवानगी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी सोशल डिस्टन्सिंग आणि कोविड 19 च्या अनुषंगाने निर्गमित विविध मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यास संमती देण्यात येत आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३) च्या कलम ७ नुसार प्रत्येक …

Read More »

भाजपाच्या या नेत्यांना स्वतःच्या गावातील ग्रामपंचायती राखता आल्या नाहीत शिवसेनेने केली घुसखोरी

मुंबईः प्रतिनिधी नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल आज झाले. मात्र या निवडणूकीत राज्याच्या स्थानिक पातळीवरील जनतेचा कल दाखविणारी असून भाजपाच्या दोन आजी-माजी प्रदेशाध्यक्ष असलेल्या दोन नेत्यांना त्यांच्याच मुळ गावातच ग्रामपंचायतीतील पक्षाची सत्ता राखता आली नाही. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे गाव असलेल्या खानापूर ग्रामपंचायतीमध्ये भाजपाचा पराभव झालाय. हा पराभव …

Read More »

पदवी व पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना दिलासा: प्रमाणपत्रे सादर करण्यास मुदतवाढ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी विद्यार्थी व पालक यांच्याकडून प्राप्त झालेल्या विनंती अर्जाच्या अनुषंगाने पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करण्यास  दिनांक २० जानेवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील उच्च व तंत्रशिक्षण …

Read More »

कोरोना : जाणून घ्या प्रत्येक जिल्ह्यातील बाधित, बरे आणि मृतकांची संख्या ३ हजार ८१ नवे बाधित, २ हजार ३४२ बरे झाले तर ५० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील २४ तासात राज्यात २,३४२  रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १८,८६,४६९ करोना बाधित बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.७६% एवढे झाले आहे. आज राज्यात ३,०८१  नवीन रुग्णांचे निदान झाले तर राज्यात आज ५० करोना बाधित रुग्णांच्या …

Read More »