Editor

अखेर मुख्यमंत्रीही निघाले अतिवृष्टीग्रस्त भागांच्या दौऱ्यावर : असा राहणार कार्यक्रम मुख्यमंत्री सोमवारी सोलापूर दौऱ्यावर

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून  शेतकरी, ग्रामस्थ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवारा १९ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत सकाळी 09:00 वा.सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने शासकीय  विश्रामगृहाकडे प्रयाण सकाळी 09:30 वा.सोलापूर येथून मोटारीने …

Read More »

यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केली. न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर नैतिक जबाबदारी म्हणून यशोमती ठाकूर यांनी ताबडतोब मंत्रिपदाचा राजीनामा देणे …

Read More »

कोरोना संकटकाळात ८५ हजार ४२८ बेरोजगारांना मिळाला रोजगार कौशल्य विकास व रोजगार मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली. पण असे असतानाही कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या आधारे एकूण ८५ हजार ४२८ इतक्या बेरोजगारांना रोजगार देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक …

Read More »

देवेंद्र फडणवीस बारामतीतील शेतकऱ्यांना भेटून दौऱ्याची करणार सुरुवात सोमवारपासून तीन दिवसांच्या दौऱ्यावर

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सोमवारी १९ ऑक्टोबरपासून ३ दिवसांचा दौरा करणार आहेत. १९ ला ते बारामतीपासून आपला दौरा प्रारंभ करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा …

Read More »

रविवारपासून शरद पवार या गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने सर्वात नुकसान झालेल्या उस्मानाबाद, औसा, तुळजापूर,परांडा येथील गावांना भेटी देणार

मुंबई : प्रतिनिधी गेले दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असून हवालदिल झालेल्या बळीराजाला मायेचा धीर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे रविवारपासून दोन दिवसाच्या दौर्‍यावर आहेत. दरम्यान या दौऱ्यात शरद पवार शेतकर्‍यांच्या थेट बांधावर जावून शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहेत. रविवारी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी …

Read More »

शेतकरी पोराच्या लग्नाची गोष्ट… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत काल्पनिक कथा

केशव रत्नाकरची वाट बघत होता. दिवे लागणीची वेळ होत आली तरी सकाळी गेलेला माणूस अजून कसा आला नाही याची काळजी आणि चिडचिड दोन्ही होऊ लागली. केशव सारखा अंगणात येरझाऱ्या मारू लागला. इतक्यात एक शेंबड पोरगं धावत आलं रत्नाकर काका आला, रत्नाकर काका आला. केशवच्या जीवात जीव आला. त्याने अंगणातूनच रत्नाकरचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न केला. रत्नाकर येऊन अंगणात सुम्बच्या खाटेवर बसला केशवच्या …

Read More »

महाविकास आघाडी सरकार विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली मागणी राष्ट्रपतींना ऐकवा सांगत याचिकाकर्त्यांना फटकारले

नवी दिल्ली: प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेता स्व. सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्याप्रकरणी करण्यात आलेल्या तपासात योग्य पध्दतीने करवाई झालेली नसल्याने महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. तसेच अशा पध्दतीची मागणी करायची असेल तर ती …

Read More »

महिला प्रवाशांना परवानगी द्या, रेल्वे म्हणते रेल्वे बोर्डाची मंजूरी मिळाल्यावर राज्य सरकारला पत्र पाठवत दिली माहिती

मुंबई: प्रतिनिधी मुंबई महानगरात राहत असलेल्या चाकरमानी महिलांना नवरात्रोत्सावाच्या पहिल्या दिवसापासून रेल्वेने प्रवास करण्यास परवानगी देण्याची मागणी करणारे पत्र राज्य सरकारने रेल्वे विभागाला पाठविले. त्यावर तातडीने पश्चिम रेल्वेने त्यावर उत्तर देत राज्य सरकारच्या विनंतीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला असून बोर्डाची परवानगी मिळाल्यानंतर सर्वसाधारण महिलांना प्रवासास परवानगी देता येणे शक्य …

Read More »

कोरोना: मुंबई, पुणे,ठाणे नंतर सर्वाधिक मृत्यू नागपूरात तर आजही बाधितांपेक्षा बरे जास्त ११ हजार ४४७ नवे बाधित, १३ हजार ८८७ बरे झाले ३०६ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाण सध्या जरी २.६३ असले तरी राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई, ठाणे, पुणे पाठोपाठ राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरात सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. मुंबईमध्ये आतापर्यत ९ हजार ६३८ जणांचा मृत्यू झाला असून एकूण बाधित रूग्णांची संख्या २ लाख ३८ हजार ५४४ तर २ लाख …

Read More »

मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित म्हणाले, ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत द्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी परतीच्या पावसाने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान झाले असून, या नुकसानीची व्याप्ती पाहता ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने शेतकर्‍यांना थेट मदत देण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली. गेल्या ३/४ दिवसांत परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: …

Read More »