Editor

होतकरु तरुणांच्या स्टार्टअप्सच्या पेटंटसाठी १० लाखापर्यंतचे अर्थसहाय्य देणार कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यात स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी होतकरु तरुणांच्या नवनवीन संकल्पनांवर आधारित स्टार्टअप्सना पेटंट मिळविण्यासाठी अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा कौशल्यविकास मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली. तरुणांनी त्यांचे कौशल्य, गुणवत्ता आणि नवनवीन संकल्पना वापरुन विकसित केलेल्या स्टार्टअप्सना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पेटंट मिळविण्यासाठी मोठा खर्च होतो. बरेच होतकरु …

Read More »

कोरोना: बाधितांच्या एकूण संख्येने ओलांडला १९ लाखाचा टप्पा ३ हजार १०६ नवे बाधित, ४ हजार १२२ बरे झाले तर ७५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील एकूण बाधितांची संख्येने १९ लाखांचा टप्पा ओलांडला असून मागील ९ महिन्यातील ही एकूण संख्या आहे. तर यापैकी १७ लाख ९४ हजार ८० इतके रूग्ण बरे झाले आहेत. मागील चार महिन्यात सरासरी एक ते दिड लाख रूग्ण संख्येने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासात राज्यात …

Read More »

देवेंद्र फडणवीसांची मागणी उपमुख्यमंत्र्यांनी केली पूर्ण सर्वच इंटर्नशीप करणार्‍या डॉक्टरांना कोरोना काळासाठी मिळणार अतिरिक्त भत्ता

मुंबई : प्रतिनिधी मुंबई, पुण्याप्रमाणेच आता राज्यातील सर्वच इंटर्नशीप करणार्‍या डॉक्टरांना कोविड काळातील सेवेसाठी अतिरिक्त भत्ता देण्यात येईल, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता आणि आज त्यासाठी एक बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली. आभासी पद्धतीने झालेल्या या …

Read More »

मेट्रो कारशेडच्या भाजपा विरोधामागचे काँग्रेसने फोडले बींग भारतीय जनता पक्ष बिल्डरांचे एजंट म्हणून काम करत होते का ? सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी फडणवीस सरकारने कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेड करिता निर्धारीत असलेल्या जमिनीवर ११ जून २०१९ रोजी मोदी सरकारच्या हाऊसिंग फॉर ऑल २०२२ या उद्दिष्टांकरिता एक लाख परवडणाऱ्या घरांचा शापूरजी पालनजी या बांधकाम व्यावसायिकाने शासनाला दिलेला प्रस्ताव स्विकारून त्यावर अप्पर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठीत केली …

Read More »

मुख्यमंत्री महोदय, अकरावी प्रवेशांमधील घोळ आता आवरा माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अँड आशिष शेलार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी यावर्षी कोविड मुळे अकरावी प्रवेशाची प्रक्रिया विलंबाने होत असून यामध्ये प्रचंड घोळ सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. अद्याप १ लाख विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असून हा घोळ मिटवा, विद्यार्थी, पालकांना होणारा त्रास थांबवा अशी विनंती करीत भाजपा नेते माजी शिक्षण मंत्री आमदार अँड आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे …

Read More »

शरद पवार जाणार मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या मदतीला; भाजपाविरोधात आघाडी ? पश्चिम बंगाल निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेसाठी जाणार- नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी भाजप केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकारच्या अधिकाराचे हनन करुन पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे. कायदा व सुव्यवस्था हा विषय राज्य सरकारचा असताना केंद्र सरकार हस्तक्षेप करत अधिकार्‍यांना बदलण्याचे काम आहे. हा विषय गंभीर असून याविषयासंदर्भात तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी व पवारसाहेब यांची …

Read More »

कोरोना: संख्या ६० हजाराच्या खाली २ हजार ८३४ नवे बाधित, ६ हजार ५३ बरे झाले तर ५५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील बरे होणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने बाधित रूग्णांच्या संख्येत चांगलीच घट होत आहे. काल ६२ हजाराहून अधिक असलेली बाधितांची संख्या चांगलीच घट झाली आहे. त्यामुळे बाधित संख्या ६० हजाराच्या खाली नोंदविली गेली आहे. मागील २४ तासात २ हजार ८३४ नव्या बाधितांची नोंद तर बरे होणाऱ्यांची संख्या ६ …

Read More »

राज्यातील महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारपासून रात्रीची संचारबंदी अखेर लागू ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार : राज्यात पुढील १५ दिवस अधिकची सतर्कता- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेत राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहापर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ५ जानेवारीपर्यंत ही संचारबंदी लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना …

Read More »

कोरोना : जाणून घ्या जिल्ह्यातील अॅक्टीव्ह रूग्ण आणि शुन्य मृत्यूची माहिती ३ हजार ८११ नवे बाधित, २ हजार ६४ बरे झाले तर ९८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील बहुतांष शहर आणि जिल्ह्यात बाधित रूग्णांच्या संख्येत चांगलीच घट होत असून अनेक जिल्ह्यात आता मृतकांची संख्या शुन्यावर आली आहे. यामध्ये आज ठाणे शहर, कल्याण डोंबिवली, पालघर यासह राज्यातील जवळपास १० ते १५ जिल्ह्यांमध्ये शून्य मृतकांची नोंद झालेली आहे. (चार्ट पहा) मागील २४ तासात ३ हजार ८११ नवे …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंच्या आव्हानाला विरोधी पक्षनेते फडणवीसांचे प्रतित्तुर कांजूर मार्ग कारशेडवरून पुन्हा विकास विरूध्द राजकारण

मुंबई: प्रतिनिधी प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे! श्रेयासाठी काम करणे हा भाजपाचा स्वभाव नाही. पण प्रश्न अपश्रेयाचा जरूर आहे, ते तुमच्या वाट्याला येऊ नये, हीच इच्छा! प्रतित्तुर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रश्नार्थक आव्हानाला उत्तर दिले. भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला …

Read More »