मुंबईः प्रतिनिधी मुंबईतील पर्यावरणीय समतोल राखण्याच्या अनुषंगाने नियोजित आरेतील कार शेड कांजूर मार्गला हलविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने हरकत घेत पुढील सुणावनी होईपर्यत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश सदरच्या जागेवर कारशेड उभारणाच्या कामाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती आज दिली. आरेतील मेट्रो कारशेडसाठी जंगलातील वृक्षांची …
Read More »कोरोना : बाधित रूग्णांची संख्या स्थिर ३ हजार ४४२ नवे बाधित, ४ हजार ३९५ बरे झाले तर ७० मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी मागील १५ दिवसांपासून राज्यातील बाधित रूग्णांची संख्या ३ हजार ते ३५०० या प्रमाणात नवे बाधित आढळून येत आहेत. त्यामुळे नव्या बाधित रूग्णांच्या संख्येवर आरोग्य विभागाला नियंत्रण मिळविण्यात यश असल्याचे दिसून येत आहे. आज २४ तासात ३ हजार ४४२ नवे बाधित आले असून एकूण संख्या १८ लाख ८६ हजार …
Read More »पाकिस्तानी म्हणणे, ईडी मागे लावणे हे विकृत राजकारण; हे चालू देणार नाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची विरोधकांना धोबी पछाड
मुंबईः विशेष प्रतिनिधी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाकिस्तानी माओवादी म्हणणं, आणि केवळ हक्कभंग आणला म्हणून ईडी मागे लावणे हे विकृत राजकारण असून अशा पध्दतीचे राजकारण महाराष्ट्रात आम्ही खपवून घेणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना देत तसेच कोणीही उठावं आम्हाला टपली मारून जावे या गोष्टीही …
Read More »मुनगंटीवारांच्या प्रश्नावर अजित पवारांचे हे सूचक वक्तव्य मराठवाडा- विदर्भ वैधानिक महामंडळ करू मात्र वरिष्ठांची जबाबदारी घ्या
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याचे महत्वाचे वैधानिक विकास महामंडळ असलेल्या मराठवाडा-विदर्भ वैधानिक विकास महामंडळाची मुदत संपलेली असून ते महामंडळ पुन्हा कधी तयार करणार अशी विचारणा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी करत कोण आहे तो झारीतील शुक्राचार्य जो प्रस्ताव रोखत असल्याचा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवारांना उपप्रश्न विधानसभेत उपस्थित केला. त्यावर आम्ही महामंडळ …
Read More »संसदेचे अधिवेशनच रद्द करणाऱ्या मोदींना कितवे आश्चर्य म्हणणार ? आघाडी सरकारला आठवे आश्चर्य म्हणणारा भाजपा जगातील सर्वात दांभिक आणि ढोंगी पक्ष
मुंबईः प्रतिनिधी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांचा ठेवल्यावरून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारविरोधात बोंब ठोकत महाविकास आघाडी सरकारला आठवे आश्चर्य म्हटले. अधिवेशनाच्या कालावधीवरून महाविकास आघाडी सरकारला हिणवणारा भाजपा हा जगातील सर्वात दांभिक आणि ढोंगी पक्ष आहे. दोन दिवसांच्या अधिवेशनावर टीका करणारे हेच भाजपा नेते आता कोविडमुळे …
Read More »याचिका न्यायालयात मात्र युक्तीवाद रंगला विधानसभेत फडणवीस विरूध्द अनिल परब रंगला सामना
मुंबईः विशेष प्रतिनिधी प्रस्तावित आरे तील कारशेड कांजूर मार्ग येथे स्थलांतरीत करण्यास प्रशासनातील अधिकाऱ्यांनीच विरोध केला. तरीही राज्य सरकारने कारशेड तिकडेच हलविले. या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचे सरकारने नेमलेल्या समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे मेट्रोचे काम चार वर्षे पुढे जाणार असल्याची बाब विरोधी पक्षनेते …
Read More »अवरेज वीज बीलाची फडणवीसांची तक्रार, विधानसभाध्यक्षांचे तातडीने आदेश पुरवणी मागण्यांवरील चर्चेच्या वेळी आदेश दिले
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात सत्तास्थानी विराजमान झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमावेळी एक पुस्तिका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते पुस्तिका प्रसिध्द केली. त्या पुस्तकात मुख्यमंत्री लिहितात कि, वर्षभरात सर्व मंत्र्यांनी एकदिलाने एक संवादाने निर्णय घेण्यास सहकार्य केले. मात्र वीज बील सवलतीच्या घोषणेबाबत विसंवाद का असा सवाल उपस्थित करत ज्यांचे घर पुरात …
Read More »सभागृहातच मुनगंटीवारांनी दिली शिवसेनेच्या आमदाराला मंत्री पदाची ऑफर विधानसभेत चर्चेच्यावेळी दिली
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेत शिवसेनेने भाजपाची साथ सोडल्याने सर्वाधिक आमदार असूनही भाजपाला विरोधी पक्षात बसावे लागले. मात्र प्रताप सरनाईक यांनी मांडलेल्या हक्कभंग प्रस्तावाला मुदतवाढ देण्यासंदर्भातील प्रस्तावावरील चर्चे दरम्यान भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेच्याच आमदाराला भर विधानसभेत मंत्री पदाची ऑफर दिल्याने क्षणभर सभागृहही बुचकाळ्यात पडले. अभिनेत्री कंगणा राणावत …
Read More »कोरोना: मुंबई महानगरसह राज्यात मृतकांमध्ये घट, कोल्हापूरात शून्य नोंद २ हजार ९४९ नवे बाधित, ४ हजार ६१० बरे झाले तर ६० मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील एकाबाजूला नवे बाधित आढळून येणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होत असताना दुसऱ्याबाजूला बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. त्याचबरोबर मृतकांची नोंद आता हळू हळू कमी होत आहे. मुंबईत ७ मृतकांची तर महानगरात ६ असे मिळून ठाणे विभागात अवघ्या १३ मृतकांची नोंद झाली आहे. पुणे विभागात ७, नाशिक …
Read More »निवडणूकीसाठी जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर या गोष्टी पुरावा म्हणून चालतील महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी राखीव जागांवर ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी समितीकडे हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेल्या अर्जाची सत्यप्रत अथवा पोचपावती किंवा अर्ज केल्याबाबतचा कोणताही पुरावा सादर करण्याची मुभा उमेदवारांना देण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने ११ डिसेंबर …
Read More »
Marathi e-Batmya