Editor

शिथिलता दिली मात्र सतर्क राहणे गरजेचे पालिकांनी कोरोना विरुद्ध लढताना दक्षता समित्यांचा प्रभावी उपयोग करावा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: प्रतिनिधी शासन पालिकांच्या पाठीशी पण कोरोना रोखण्यात हलगर्जी नको. नागरिकांनी देखील आरोग्याचे सर्व नियम काटेकोरपणे  पालन तितकेच गरजेचे आहे असे स्पष्ट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्यातील पालिकांनी कोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून हा लढा अधिक तीव्र करावा असे सांगत . लॉकडाऊन नंतर आपण काही गोष्टींमध्ये शिथिलता दिली आहे. …

Read More »

काँग्रेसमधला नेतृत्व गोंधळ संपला : सोनिया गांधीच, अन्यथा राहुल गांधी अध्यक्ष पदी सोनिया गांधीच राहणार असल्याचा ठराव संमत करून बैठक संपली

नवी दिल्ली- मुंबई: प्रतिनिधी पक्षाचे नेतृत्व सोनिया गांधी यांच्याकडे ठेवायचे कि त्यांच्या ठिकाणी नवा अध्यक्ष निवडीवरून निर्माण झालेला काँग्रेसमधील गोंधळ संपुष्टात आला. काँग्रेस पक्षाचे नेतृत्व अर्थात अध्यक्ष पद सोनिया गांधी यांच्याकडे कायम ठेवण्याचा ठराव पक्षाच्या कार्यकारणीच्या बैठकीत करण्यात आला असल्याची माहिती काँग्रेस पक्षाच्यावतीने एका प्रसिध्दी पत्रकातून देण्यात आली. याविषयीचा ठराव …

Read More »

…अन्यथा प्रत्येक शाळेवर गुन्हा दाखल करू शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचा निर्वाणीचा इशारा

अचलपूर : प्रतिनिधी राज्यातील अनेक शाळांकडून अधिकचे शुल्क आकारण्यात येत आहे. अधिकची फि घेण्याचे आता आढळून आले तर वाढीव फि घेणाऱ्या प्रत्येक शाळांवर गुन्हा दाखल करू असा इशारा देत शाळांनी नफेखोरी करू नये असे आवाहनही शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले. शाळांकडून विद्यार्थ्यांच्या पालकांकडून वाढीव फि आकरण्यात येत असल्याच्या …

Read More »

पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा माफी मागा अन्यथा फिरू देणार नाही युवक व क्रिडा मंत्री सुनिल केदार यांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी मागील अनेकवर्षापासून काँग्रेस पक्षाचे नेतृत्व गांधी घराण्यांनी केले आहे. सध्या पक्षाचे नेतृत्व सोनिया गांधी या करत असताना त्यांच्याच नेतृत्वाविषयी राज्यातील काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, मुकल वासनिक आणि मिलिंद देवरा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कृत्य लाज वाटण्यासारखे आहे. त्यामुळे या तिन्ही नेत्यांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा रस्त्यावर फिरू …

Read More »

सोनियां गांधीच्या नेतृत्वावरून प्रदेश काँग्रेसमध्ये दोन गट बाळासाहेब थोरातांचे राहुल गांधींना साकडे तर गायकवाड आणि देशमुख यांचे सोनियां गांधीना

मुंबई: विशेष प्रतिनिधी देशात भाजपाच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी काँग्रेसकडून म्हणावे तितके प्रयत्न होत नाहीत. त्यातच पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे त्यांच्यावर मर्यादा येत असल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नुकतीच पक्षातील नेत्यांनी एका पत्राद्वारे केली. मात्र राज्यातील प्रदेश काँग्रेसमध्ये सोनिया गांधीनी कि राहुल गांधी यांनी नेतृत्व …

Read More »

कोरोना: बाधित रूग्ण संख्येची वाटचाल ७ लाखाकडे १० हजार ४४१ नवे बाधित, ८ हजार १५७ बरे झाले तर २५८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधित रूग्ण बरे होत असल्याचे दिसत असले तरी दुसऱ्याबाजूला बाधित रूग्णांच्या संख्येत वाढही होत आहे. मागील २४ तासात ८ हजार १५७ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ४ लाख ८८ हजार २७१ वर पोहोचली आहे. तर १० हजार ४४१ नवे बाधित रूग्ण आढळून आल्याने बाधित रूग्णांची संख्या …

Read More »

गणेश विसर्जन करायचाय ? मग पालिकेच्या फिरता कृत्रिम तलावात करा मुख्यमंत्री ठाकरेंकडून पाहणी आणि कौतुक

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच प्रदूषण टाळण्यासाठी श्री गणेश विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्याविषयी आवाहन करण्यात येत आहे. आज खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महालक्ष्मी मंदिराजवळ मुंबई महानगरपालिका डी विभागाने ट्रकमध्ये तयार केलेल्या फिरत्या कृत्रिम तलावाची पाहणी केली व कौतुक केले.  तत्पूर्वी त्यांनी नेपीयन्सी रोड प्रियदर्शिनी पार्क येथील गणेश मूर्ती संकलन …

Read More »

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाचे स्वागत काँग्रेसकडून स्वागत सत्याच्या क्षीण आवाजाला ताकद देण्याची जबाबदारी न्यायालयाची आणि सत्यासाठी लढणाऱ्यांची!

मुंबई: प्रतिनिधी देशात संघ विचार पसरवण्याठी आणि भाजपाचा एकछत्री अंमल आणण्यासाठी देशातील सरकारच्या पाठिंब्याने द्वेष आणि तिरस्कार जाणीवपूर्वक पसरवला जात आहे. भाजपा नियंत्रित काही माध्यमे व समाज माध्यमातून असत्याचे कर्णकर्कश्य चित्कार केले जात तर आहेतच, पण सत्येची पाठराखण करणाऱ्या संवैधानिक संस्थाही मोडीत काढल्या जात आहेत. अशा लोकशाहीसाठी अत्यंत कसोटीच्या काळात …

Read More »

अनुकंपा तत्वावरील त्या ५६९ तरुणांना देणार आयटीआयमधून प्रशिक्षण कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये अनुकंपा तत्वावर वायरमन (तारतंत्री) पदाच्या नोकरीसाठी पात्र असलेल्या पण आवश्यक प्रशिक्षणाअभावी नोकरीपासून वंचित राहीलेल्या तरुणांना राज्यातील आयटीआयमधून प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी मिळवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी यंदा विद्युत वितरण कंपनी आणि आयटीआय यांच्यामार्फत राज्यातील पात्र ५६९ विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये प्रवेश देण्यात …

Read More »

आता तुमच्या आवाजावरुन ओळखणार “कोरोना” पालकमंत्री आदित्य ठाकरे, अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला ऑनलाइन प्रारंभ

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी गोरेगावमधील नेस्को जंबो सुविधा केंद्र येथे व्हॉईस बायोमार्कर्स उपलब्ध करून देण्यासाठी व्होकलिस हेल्थकेअर उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला. या यंत्रणेद्वारा व्यक्तिच्या किंवा संशयीत रुग्णाच्या आवाजावरुन त्याची कोरोना चाचणी करणे शक्य होणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, …

Read More »