Editor

आता कोरोना चाचणी २२०० रूपयांत होणार आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी आता जास्तीत जास्त २२०० रुपये इतका दर आकारला जाणार असून रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी २८०० रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. सर्वसामान्य रुग्णांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे जाहीर केले. …

Read More »

स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनाही पीपीई किट द्या वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांची मागणी

पुणे: प्रतिनिधी कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांना दफन न करता त्यांना अग्नी द्यायचा असतो, मात्र अग्नी देणाऱ्या कर्मचाऱ्यांना पालिकेने वाऱ्यावर सोडले असून त्यांना संरक्षण साधन (पीपीई किट) नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर …

Read More »

राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाला वित्तमंत्री कोण ? याची माहितीच नाही शासन निर्णय निघाला वित्तमंत्र्यांच्या नावे मात्र समितीच्या अध्यक्षपदी भुजबळांचे नाव

मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात येणाऱ्या निर्णयाची माहिती किंवा सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून दिली जाते. मात्र राज्याचे वित्त अर्थात अर्थमंत्री नेमके कोण याचा विसर या विभागाला पडला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने नेमके अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील कि अन्न व नागरी पुरवठा …

Read More »

बन्सोड हत्याप्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत करावा आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न असल्याचा माजी मंत्री बडोले यांचा आरोप

नागपूर : प्रतिनिधी राजकीय दबावामुळे जलालखेडा पोलिसांनीआरोपींच्या विरोधात अँट्रासिटीतंर्गत गुन्हा नोंदविण्यास विलंब करत आरोपींना पळून जाण्यास मदत केली. या आरोपी व ठाणेदाराने संगनमताने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ठाणेदाराच्या विरोधातही गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने निलंबित करावे अशी मागणी माजी समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी करत सदर प्रकरणाची स्वतंत्र एसआयटी …

Read More »

एसआरए प्रकल्पांबाबत डॉ.जितेंद्र आव्हाडांचा आणखी एक नवा निर्णय प्रत्येक प्रकल्पात १ ते ५ हजार चौरस फुटाचे आरोग्यकेंद्र उभारणार

ठाणे : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, भविष्यात वैद्यकीय सुविधांची वानवा भासू नये, यासाठी एसआरएच्या प्रत्येक प्रकल्पामध्ये १ हजार ते ५ हजार चौरस फुटाचे आरोय केंद्र उभारण्यात येईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली. म्हाडा, एसआरए योजनांच्या वास्तूंमध्ये …

Read More »

तांदळाचे ९ वाण शोधणारे स्व. दादाजी खोब्रागडे यांचा मरणोत्तर पद्म पुरस्कार द्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: प्रतिनिधी सुप्रसिद्ध कृषी संशोधक स्वर्गीय दादाजी खोब्रागडे यांना मरणोत्तर पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी राज्य सरकारने भारत सरकारकडे शिफारस करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. स्वर्गीय दादाजी खोब्रागडे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संशोधन करून तांदळाचे नवीन नऊ …

Read More »

कोरोना : तीन लाखापैकी १ लाख रूग्ण महाराष्ट्रात तर मृतकांची संख्या ४ हजाराकडे ३४९३ नवे रूग्ण तर १२८ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने आज संख्येने देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक रूग्णांची नोंद करत १ लाख रूग्णांचा रेकॉर्डब्रेक तयार केला. संपू्र्ण देशभरात एकूण रूग्णांची संख्येने ३ लाख रूग्णांचा टप्पा पार केला आहे. त्यातील एक लाख रूग्ण महाराष्ट्रातील आहेत. आज सलग तिसऱ्या दिवशीही राज्यात ३ हजार ४९३ रूग्णांचे निदान झाले …

Read More »

फडणवीस म्हणाले, सरकारने पॅकेज जाहीर केले पण त्याचा फायदा नाही कोकणातील परिस्थितीबाबत सर्वंकष निवेदन सरकारला देणार

दापोली: प्रतिनिधी आज सरकारचे अस्तित्त्व जमिनीवर दिसत नाही. केलेल्या घोषणा प्रत्यक्षात उतरताना दिसत नाही. कुठलीही आपत्ती आपण थांबवू शकत नसलो तरी पण, त्याला प्रतिसाद कसा दिला, हे महत्त्वाचे असते. राज्य सरकारने पॅकेज जाहीर केले. पण, त्याचा फायदा होणार नाही. मासेमारांसाठी त्यात काहीही नाही. मी अनेक कोळीवाड्यांना भेटी दिल्या. डिझेलचा परतावा …

Read More »

मुंबईतल्या गटारी, नद्यांमधील पाण्याची हालचाल आणि पूराची पूर्वसूचना मिळणार एकात्मिक पूर यंत्रणेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : प्रतिनिधी मान्सून काळात एकात्मिक पूर इशारा यंत्रणा (इं‍टिग्रेटेड फ्लड वॉर्निंग सिस्टीम) ही मुंबईसाठी वरदान ठरणार आहे. जीआयएस आधारित या यंत्रणेमुळे आता कोणत्या भागात पाणी साचणार, पुर येणार आहे तसेच अगदी वादळासारख्या संकटाची देखील पूर्व सूचना मिळून सावध होता येणार आहे. या यंत्रणेत उपयोगात आणल्या जाणाऱ्या हायड्रोलिक मॉडेलमुळे एखाद्या …

Read More »

लॉकडाऊनमध्ये मालवाहू “एस.टी” ने कमाविले २१ लाख रूपये लालपरीचं असंही "संजीवन" रुप, ५४३ फेऱ्यात ३ हजार टनाची मालवाहतूक

मुंबई: प्रतिनिधी राज्यात प्रत्येक विभागात १० प्रमाणे ३३० बसेसचे मालवाहतूक बसमध्ये रुपांतर करण्यास मान्यता देण्यात आली असून आतापर्यंत ७२ बसेस मालवाहतूकीसाठी तयार झाल्या आहेत. एस.टी महामंडळाच्या ताफ्यात पूर्वीपासून ३०० मालवाहतूक बस (ट्रकमध्ये रुपांतरीत) कार्यरत आहेत. म्हणजेच आजघडीला ३७२ बसेस मालवाहतूकीसाठी उपलब्ध असून जनसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून लोकप्रिय असलेली लालपरी आता मालवाहतूकीच्या …

Read More »