Editor

१२२ मृत्यूसह एकूण संख्या ७५ हजाराच्या तर अॅक्टीव्ह रूग्णांची ४० हजाराच्या काटावर नव्याने २५६० रूग्णांचे निदान ९९६ जणांना घरी सोडले

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाग्रस्तांच्या बरे होण्याच्या टक्केवारीत जरी वाढ झालेली असली तरी दररोजच्या रूग्णसंख्येत किमान २ हजार रूग्णांच्या नोंदीत कमी आलेली नाही. त्यातच आज १२२ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून राज्यात आज २५६० कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाल्याने एकूण संख्या आता ७४ हजार ८६० पर्यंत पोहोचली आहे. आज नवीन ९९६ …

Read More »

निसर्ग चक्रीवादळाचा महावितरणला मोठा फटका वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्दस्तरावर सुरू असल्याची ऊर्जामंत्री राऊत यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी जोरदार वादळी वा-यासह आलेल्या निसर्ग चक्री वादळाचा महावितरणला मोठा फटका बसला आहे. चक्रीवादळाच्या रौद्ररूपामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्या व विजेचे खांब कोसळ्ले असून वीजपुरवठा रवंडित झाला आहे. चक्रीवादळाची तीव्रता कमी होताच महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्दस्तरावर सुरू केले आहे. निसर्ग चक्रीवादळाचे रौद्ररूप बघता महावितरणचे किती नुकसान …

Read More »

हिंदुस्थान युनिलिव्हरने दिली १० कोटीहुन अधिक किंमतीच्या वैद्यकीय संसाधनांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले आभार

मुंबई: प्रतिनिधी हिंदुस्थान युनी लिव्हर लि. कंपनीने गेल्या सप्ताहात राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाला मिळून १० कोटी रुपयांहुन अधिक किंमतीच्या वैद्यकीय संसाधनांची मदत केली. यामध्ये ५.०४ कोटी रुपयांच्या २८ हजार ८०० टेस्टिंग किटसचा समावेश आहे तर आणखी ५ कोटी रुपये किंमतीची विविध वैद्यकीय संसाधनेही त्यांनी उपलब्ध करून दिली. यामध्ये …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंचा निर्णय राज्यपाल कोश्यारींनी केला रद्दबातल विद्यापीठ कायद्यानुसार अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याचे आदेश

मुंबई: विशेष प्रतिनिधी दोनच दिवसांपूर्वी राज्यातील विद्यापीठस्तरावरील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परिक्षा रद्दबातल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केला. मात्र या निर्णयावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या भविष्याच्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय रद्दबातल करत विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे परिक्षेच्या कारणावरून …

Read More »

खाजगी रूग्णालयानों रूग्णांना बेड नाकारताय, BMC वॉच करतेय पालिकेचे अधिकारी नियुक्त करण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी कोरोना उपाययोजनांवर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. मुंबईतील खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या ८० टक्के बेडस राखीव ठेवण्याच्या शासनाच्या आदेशांचे काटेकोर पालन करावे यासाठी अशा सर्व रुग्णालयांमध्ये पालिकेने अधिकारी नियुक्त करून नियंत्रण करावे व रुग्णांची हेळसांड होणार नाही असे पाहावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले. तर …

Read More »

७३४ रिक्त पदे भरा, अन्यथा प्रशासनाने कामाची अपेक्षा करू नये शिधावाटप कर्मचारी संघटनेचा सरकारला इशारा

मुंबई: प्रतिनिधी सध्या राज्यभर कोरोना विषाणूने थैमान घातलेले असून मुंबई/ठाणे विभागात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. अशा परिस्थितीत अन्न, नागरी पुरवठा विभागाअंतर्गत येणा-या नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांचे आस्थापनेवरील शिधावाटप कर्मचारी/अधिकारी हे बदलापूर, कल्याण, विरार, पनवेल अशा अनेक दूरवरच्या ठिकाणावरून प्रवास करून …

Read More »

खुषखबर ! पुण्यात होणार पहिल्यांदा ३० माकडांवर कोरोना लसची चाचणी माकड राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे करणार सुपूर्द-वनमंत्री संजय राठोड

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूमुळे (कोव्हीड – 19) होत असलेला प्रादुर्भाव टाळण्यासाठी SARS COV- 2 ही लस तत्काळ विकसीत करण्यासाठी संशोधन हाती घेण्यात आले आहे. या संशोधन प्रकल्पासाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला ३० माकडांची आवश्यकता आहे. ही ३० माकडे राज्याच्या हद्दीतील घेण्यात येणार असून कोरोना प्रतिबंधात्मक लसचा सर्वप्रथम प्रयोग …

Read More »

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई जिल्ह्यातील सर्व विभागांनी दक्ष रहावे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी ३ जून रोजी येणाऱ्या संभाव्य चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील महसूल व अन्य महत्त्वाच्या विभागांनी आपत्कालीन व्यवस्थेसह दक्ष राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिल्या आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वे, बेस्ट, महसूल, आरोग्य आदी महत्त्वाच्या विभागासोबत संभाव्या वादळाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. त्यावेळी त्यांनी उपरोक्त सूचना दिल्या. रेल्वेची वाहतूक …

Read More »

बॉम्बे, जसलोक, हिंदुजा आणि लिलावती हॉस्पीटला सरकारकडून नोटीसा मुंबईतील खासगी रुग्णालयांना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या अचानक भेटी

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राज्य शासनाने ताब्यात घेतल्या आहेत. मात्र अद्यापही काही ठिकाणी रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून अपेक्षित ते सहकार्य होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याची दखल घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल रात्री मुंबईतील खासगी रुग्णालयांना अचानक भेटी दिल्या. या भेटी दरम्यान बॉम्बे, जसलोक, हिंदुजा …

Read More »

७० पैकी ३० हजारापेक्षा जास्त घरी गेले, तर ३७ हजाराहून अधिक अॅक्टीव्ह रूग्ण २३६१ नवे रूग्ण, तर ७६ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी राज्यात आज नव्याने २ हजार ३६१ रूग्ण आढळून आले आहे. तर ७६ जणांचा मागील २४ तासात मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ७० हजारावर पोहोचली असून यापैकी ३० हजार १०८ रूग्ण बरे होवून घरी गेलेले आहेत. ३७ हजार ५३४ रूग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश …

Read More »