मुंबईः प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अधिवेशन रविवारी १६ फेब्रुवारी रोजी स्व.राम कापसे नगर, नवी मुंबई येथे होत आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीच पुन्हा याच पदावर नियुक्ती करण्यात आली असून १० हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ते पदाची सूत्रे हाती घेणार असल्याची माहिती भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी दिली. या अधिवेशनात …
Read More »नगरविकासच्या मनिषा म्हैसकर यांच्याकडे आता राजशिष्टाचार विभाग ८ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या महत्वाच्या विभागाचे प्रधान सचिव असलेल्या मनीषा म्हैसकर-पाटणकर यांची आज बदली करण्यात आली असून त्यांची रवानगी आयएएस अधिकाऱ्यांसाठी शिक्षेचा विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज शिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव पदी करण्यात आली. त्यांच्यासह आठ आयएएस अधिकाऱ्यांची बदल्या करण्यात आल्या. जयश्री भोज व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक …
Read More »डबेवाल्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे द्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
मुंबई: प्रतिनिधी मुंबईच्या डबेवाल्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत हक्काची घरे उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी तसेच त्यांच्या मुंबई डबेवाला भवनाचा प्रश्नही तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. मुंबईतील डबेवाल्यांकरिता घरबांधणी, मुंबई डबेवाला भवन तसेच अन्य मागण्यांसाठी उपमुख्यमंत्रीच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते …
Read More »भीमा-कोरेगाव प्रकरणी मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादीची परस्परविरोधी भूमिका एनआयएला तपास देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा
मुंबईः विशेष प्रतिनिधी पुणे येथील भीमा-कोरेगांव येथील हिंसाचार प्रकरणाचा तपास राज्य सरकारकडून एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्याचा निर्णय केंद्राने घेतला. केंद्राच्या या निर्णयास राज्य सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला. मात्र महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याप्रकरणाचा तपास एनआयएला सुपूर्द करण्याची भूमिका घेतल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगत …
Read More »शाळा, रूग्णालये, पोलिस, अग्निशामक दलाला पाच दिवसीय आठवड्याचा लाभ नाही सकाळी ९.४५ला कार्यालये सुरू होणार
मुंबईः प्रतिनिधी शासकिय कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार राज्य सरकारने पाच दिवसाचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयातून शासकीय रुग्णालये, चिकित्सालये, पोलीस, कारागृहे, पाणी पुरवठा प्रकल्प, अग्निमशन दल, सफाई कामगार, शासकीय महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, शाळा, तंत्रनिकेतने आदी वगळण्यात आली आहेत. तसेच दापोडी, सातारा, वर्धा, अकोला, अहमदनगर, अष्टी, खडकवासला, नाशिक व नांदेड येथील …
Read More »दुध भेसळीवर अंकुश ठेवण्यासाठी औषध आणि पदुमचे जिल्हानिहाय पथक मंत्री शिंगणे आणि केदार यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात दुधात भेसळीबाबतच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. या दुध भेसळीवर अंकुश ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रसासन विभाग आणि दुग्धविकास यांची संयुक्तरित्या प्रत्येक जिल्ह्यात पथक तैनात करत त्या मार्फत दूधाची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री राजेंद्र शिंगणे आणि पदुम मंत्री सुनिल …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या हातातील माहिती जनसंपर्क व सामान्य प्रशासनाकडूनच लपवाछपवी सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या एकवर्षाच्या कंत्राट मुदतवाढीसाठी जुन्या तारखेचा आधार
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील जनतेच्या हिताचे घेतलेले निर्णय समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या माहिती व जनसंपर्क विभागाने खास मर्जीतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यासाठी चक्क लपवाछपवीचा कार्यक्रम सुरु आहे. विशेष म्हणजे या अधिकाऱ्याची मुदत संपल्यानंतर खास त्यास मागील तारखेचा अध्यादेश काढत मुदत दिल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली. राज्य सरकारने …
Read More »अर्थमंत्री पवारांचा विरोध डावलून पाच दिवसांचा आठवडा होणार सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा
मुंबईः प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून केंद्राच्या धर्तीवर राज्यातही ५ दिवसाचा आठवडा करावा अशी मागणी शासकिय कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांकडून करण्यात येत होती. आता ही मागणी फलद्रुप होण्याची चिन्हे दिसत असून या प्रस्तावास अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तीव्र विरोध असला तरी हा प्रस्ताव राज्य सरकारकडून मान्य करण्यात येणार असल्याची …
Read More »आपच्या झाडूने भाजपाचे गर्वहरण तर काँग्रेस साफ ७ ठिकाणी भाजपाला मिळाला विजय
नवी दिल्लीः प्रतिनिधी दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकून भाजपाची सत्ता स्थापन करण्याचा चंग भाजपा नेते अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांधला. त्यासाठी निवडणूकीचा प्रचार धर्मावर आधारीत कसा होईल याची रणनीती आखण्यात आली. यासाठी भाजपाने संपूर्ण देशभरातील नेते-कार्यकर्त्यांची फौज उभी करत आम आदमी पार्टीला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र या …
Read More »दिल्लीकरांच्या मतदानातून भाजपाच देशद्रोही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची प्रतिक्रिया
मुंबईः प्रतिनिधी दिल्ली विधानसभेच्या निवडणूकीत भाजपाने आपली सर्व शक्ती खर्ची टाकली. गृहमंत्री अमित शाहंच्या ४४ सभा, अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि मुख्यमंत्री योगी आदीनाथ यांच्या १२ हून अधिक सभा, देशातील २७० खासदार, भाजपाचे नेते, भाजपा राज्यातील मंत्री यांच्यासह लाखभर कार्यकर्त्ये प्रचारासाठी मैदानात उतरले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे देशद्रोही पक्षाला …
Read More »
Marathi e-Batmya