Editor

पत्रकार परिषदेतही सबकुछ देवेंद्र फडणवीसच विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर शांतच

मुंबईः विशेष प्रतिनिधी अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी आणि सरकारच्या धोरणाविरोधात घेण्यात येणाऱ्या मुद्यांची माहिती देण्यात येते. त्यानुसार सध्याच्या विरोधी पक्षात असलेल्या भाजपा व त्यांच्या आघाडी पक्षाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. मात्र या पत्रकार परिषदेत सबकुछ देवेंद्र फडणवीस हेच असल्याचे दिसून येत होते. तर त्यांचे सहकारी विधान …

Read More »

शरद पवारांना त्या पध्दतीने एल्गार आणि भीमा-कोरेगांवचा तपास न्यायचाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

मुंबईः विशेष प्रतिनिधी काही वर्षापूर्वी झालेल्या भीमा कोरेगांव येथील हिंसाचाराची आणि पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेचा एकमेकांशी संबध आहे. जेव्हा हिंसाचाराची घटना घडली तेव्हा शरद पवारांनी या हिंसाचाराचा संबध हिंदूत्ववाद्यांशी जोडला. मात्र आता शहरी नक्षलवाद्याचे काही पुरावे समोर आल्याचे दिसल्यानेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविला असल्याचे …

Read More »

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात २ हजाराने वाढ अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांचे आश्वासन

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विविध पूर्व आयएएस प्रशिक्षण केंद्रात अल्पसंख्याक विद्यार्थीही तयारी करत आहेत. मात्र या विद्यार्थ्यांना इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत अल्पसंख्याकांना निवास आणि भोजनासाठी अवघे २००० रूपये मिळत असे. आता त्यात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी घेतला असून आता या विद्यार्थ्यांना ४ हजार रूपयांचे विद्यावेतन मिळणार …

Read More »

विजेत्यांचे हाल तर लोढाच्या प्रकल्पाकडे म्हाडाची डोळेझाक म्हाडा विरोधात विजेत्यांकडून पोलीसात तक्रार

मुंबई : विशेष प्रतिनिधी इंटीग्रेटेट टाऊनशिप योजनेतंर्गत म्हाडाला दिलेली घरे केवळ स्वस्त दरात नागरीकांना उपलब्ध होवू नयेत यासाठी भाजपाच्या मंगलप्रभात लोढांच्या पलावा सिटीने त्या घरांचा ताबाच अद्याप रहिवाशांना दिले नाही. तसेच लोढा डेव्हल्पर्सच्या या कृत्यावर म्हाडाने अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याने अखेर या रहिवाशांनी पोलिसांत धाव घेतली आहे. राज्य सरकारच्या …

Read More »

महसूल विभागाच्या मनमानीला गृहनिर्माणने लावले वेसण अप्पर मुख्य सचिवांच्या समितीच्या मंजूरीनेच होणार प्रतिनियुक्ती

मुंबईः विशेष प्रतिनिधी शहरातील झोपडपट्टीवासियांची पात्रता निश्चित करण्यासाठी प्रतिनियुक्तीवर नेमण्यात येत असलेल्या महसूली अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला गृहनिर्माण विभागाने चांगलीच वेसण लावली आहे. त्यामुळे आता गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने मंजूरी आणि संबधिताची माहिती घेतल्याशिवाय प्रतिनियुक्ती न करण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. शासकिय जमिनीवरील झोपडपट्ट्या आणि त्यात राहणारे रहिवाशी …

Read More »

बकिंगहॅम पॅलेसच्या धर्तीवर पोलिस मुख्यालयात अनुभवायला मिळणार ‘चेंज ऑफ गार्ड’ गृहमंत्री देशमुख, पर्यावरण मंत्री ठाकरेंची संकल्पना

मुंबई: प्रतिनिधी लंडन येथील बकिंगहॅम पॅलेसच्या धर्तीवर महाराष्ट्र पोलीस मुख्यालयात ‘चेंज ऑफ गार्ड’ ही अभिनव संकल्पना येत्या महाराष्ट्र दिनापासून सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ‘युनायटेड किंगडम’च्या राजघराण्याचा राजप्रासाद ‘बकिंगहॅम पॅलेस’ येथे सुरक्षारक्षकांचे अत्यंत प्रेक्षणीय असे ‘चेंज ऑफ गार्ड’ हे प्रात्यक्षिक होत असते. आठवड्यातील ठराविक …

Read More »

पुरोगामी, दलित, आंबेडकरवादी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा केंद्राचा डाव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बांळासाहेब थोरात यांची भीती

मुंबईः प्रतिनिधी एल्गार परिषदेचा तपास केंद्र सरकारने ज्या घाई गडबडीने एनआयएकडे दिला, त्यावरून हा निर्णय काळजी वाढवणारा आहे. पुरोगामी, दलित, आंबेडकरीवादी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचे यातून स्पष्ट दिसत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. हे व्यासपीठ पुरोगामी विचारांचे होते. तिथे …

Read More »

गडचिरोलीतल्या नुकसानीची तेलंगणाकडून भरपाई घेवू जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी गडचिरोलीत धरणाचे पाणी जास्त येवून नुकसान झाले असेल तर त्याबाबत तेलंगणा राज्याला कळविण्यात येईल. तसेच झालेली नुकसानभरपाईही त्यांच्याकडून घेतली जाईल अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. तेलंगणा राज्यातील मेलीकट्टा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गडचिरोली जिल्ह्यातील ८-९ गावे येतात. तेलंगणा राज्याने त्यासाठी तिथल्या जमिनीचे संपादन केलेले आहे. …

Read More »

महाविकास आघाडीकडून शरद पवार पुन्हा राज्यसभेवर भाजपाची तिसरी जागा धोक्यात आणण्यासाठी आघाडीकडून दोन जण उतरणार

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यसभेवरील राज्यातील सात खासदारांची मुदत संपत आहे. या ७ पैकी ४ जागांवर महाविकास आघाडीचा उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. तर ५ वा उमेदवार महाविकास आघाडीकडून संयुक्तरित्या उभा करण्यात येणार आहे. मात्र भाजपाकडून आतापर्यंत फक्त दोनच जणांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद …

Read More »

पंतप्रधानाच्या जीवाला धोका होता तर तपासात काय मिळालं? राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भाजपावर टीका

मुंबईः प्रतिनिधी पुण्यातील एल्गार परिषद झाली. त्यानंतर कोरेगांव भीमा येथे दंगल उसळली. या दोन्ही घटना वेगवेगळ्या आहेत. मात्र त्यावेळच्या सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याचं पत्र मिळालं. पंतप्रधान हे देशाचे सर्वोच्च असतात आणि त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणणे हास्यास्पद असल्याची खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी …

Read More »