Editor

शिवाजी महाराज स्मारक, डॉ.आंबेडकर स्मारक आगामी पाच वर्षात पूर्ण करण्याचा भाजपाचा संकल्प आगामी पाच वर्षांत राज्याचा चेहरामोहरा बदलून जाण्याचा भाजप कार्यकारी अध्यक्ष नड्डा यांचा विश्वास

मुंबईः प्रतिनिधी राज्याचे श्रध्दास्थान आणि प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याची घोषणा करत सत्तेवर आलेल्या या दोन्ही स्मारकाचे काम अद्याप पूर्ण करता आले नाही. त्यामुळे या दोन्ही स्मारकाचे काम आगामी पाच वर्षात पूर्ण करणार असल्याचा संकल्प भाजपाने आपल्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून करत १ कोटी नोकऱ्यांची …

Read More »

राहुल गांधींच्या “७० साल” वाला काटछाट व्हिडिओप्रकरणी सायबर तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता शेअर

मुंबईः प्रतिनिधी राज्यात विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीचा फायदा उठवित भाजपाकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भाषणाच्या मूळ व्हीडीओत काटछाट करत चुकीचा व्हीडीओ व्हायरल दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी शेअर केला. तसेच या काटछाट केलेल्या व्हीडीओचा वापर राजकिय कारणासाठी केल्याप्रकरणी सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या ४० सेंकदाच्या …

Read More »

पंतप्रधान पदावरच्या माणसानेसुद्धा त्या पदाची प्रतिष्ठा राहिल अशी पावले टाकावीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा खोचक सल्ला

औरंगाबाद – कन्नडः प्रतिनिधी पंतप्रधान हे पद देशाच्या इज्जतीचं पद आहे. आम्ही त्याचा सन्मान करतो. आम्ही पंतप्रधान पदाची बेइज्जत कधी होवू देणार नाही. परंतु पंतप्रधान पदावर बसलेल्या माणसाने सुद्धा त्या पदाची प्रतिष्ठा राहिल अशी पावले टाकली पाहिजेत असा खोचक सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कन्नडच्या जाहीर सभेत …

Read More »

सरकारच्या दबावाखाली दूरदर्शन विरोधकांचा आवाज दाबतेय काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी सरकारच्या दबावाखाली विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा दूरदर्शन प्रयत्न करत असून मतदानासाठी आवाहन करण्याच्या काँग्रेसच्या स्क्रिप्टमध्ये परस्पर बदल करण्यात आला आहे. दूरदर्शनचा हा प्रकार संताप आणणारा असून विरोधकांच्या संवैधानिक मत स्वातंत्र्याच्या अधिकारावर गदा आणणारा असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. दूरदर्शनवरील कार्यक्रमासाठी …

Read More »

धारावीचा पुनर्विकास १० वर्षासाठी रखडला निविदा प्रक्रियाच पुन्हा नव्याने होणार

मुंबईः खास प्रतिनिधी २५ वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास पुन्हा एकदा १० वर्षासाठी रखडणार आहे. यापूर्वी मार्गी लागलेली निविदा प्रक्रिया नव्याने सुरु करण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. राज्यातील गतीमान सरकारने साधारणतः दोन वर्षापूर्वी धारावीच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी धारावी झोपडपट्टीच्या विकासासाठी नव्याने निविदा मागविली होती. …

Read More »

राहुल गांधीही १३ तारखेला मुंबईत भाजप शिवसेना सरकारच्या कामाचा करणार पंचनामा

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापाठोपाठ काँग्रेस नेते राहुल गांधी हे ही १३ ऑक्टोंबरला मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. या एकाच दिवशी ते लातूर जिल्ह्यातील औसा, मुंबईतील चांदिवली आणि धारावी येथे त्यांची काँग्रेस उमेदवारांसाठी प्रचारसभा होणार आहे. मुंबईतील दोन मतदारसंघातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार नसीम खान, वर्षा …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींची जळगांवातून प्रचाराची सुरुवात केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणूकीतील भाजपाच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत असून पक्षाच्या उमेदवारांसाठी ९ प्रचार सभा घेणार आहेत, अशी माहिती केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.  विशेष म्हणजे भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना तिकिट न देता त्यांच्या …

Read More »

भाजपाची परिस्थिती म्हणजे, करुन गेलं गाव आणि भलत्याचंच नाव उरळी कांचन ( पुणे-शिरुर) येथील जाहीर सभेत पवारांनी साधला मोदींवर निशाणा

मुंबईः प्रतिनिधी पुलवामाचा बदला हवाईदलाच्या सैनिकांनी घुसुन मारुन घेतला. मात्र क्रेडिट कुणी घेतले? असा उपरोधिक टोला लगावतानाच ‘करुन गेलं गाव आणि भलत्याचंच नाव अशी सध्याची भाजपाची परिस्थिती असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी उरळी कांचन येथील जाहीर सभेत केली. पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला त्याचा बदला घेण्यासाठी …

Read More »

भिवंडी मेट्रो कारशेडसाठी जागा पाहिजे तर बाजार भावाप्रमाणे मोबदला द्या कोन-गोवे संघर्ष समितीची मागणीमुळे भिवंडीतील मेट्रोचा मुद्दा चिघळणार

ठाणेः प्रतिनिधी भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्पाच्या कारशेडसाठी सरकारी जमिनीऐवजी आमच्या खासगी जमिनी संपादीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. लोकहिताचा प्रकल्प असल्यामुळे जमिनी देण्यास आमचा विरोध नाही. परंतु सरकारने आम्हाला बाजार भावाप्रमाणे जमिनीचा चांगला मोबदला द्यावा, अशी मागणी कोन-गोवे संघर्ष समितीने शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत दिली. बाजार भावाप्रमाणे जमिनीचा मोबदला देणार नसाल तर …

Read More »

भाजपाने आमदार चरण वाघमारेसह चारजणांना दाखविला घरचा रस्ता बंडखोर उमेदवारी मागे न घेतल्याने पक्षातून निष्कासित

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीत तिकिट मिळेल, नाही मिळाले तर बंडखोरी करत निवडणूकीच्या रिंगणात उतरणारे तुमसरचे विद्यमान आमदार चरण वाघमारे, नगरसेविका गीता जैन यांच्यासह चार जणांना पक्षातून काढून टाकल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली. भारतीय जनता पार्टी- शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करून निवडणूक लढविणाऱ्या आमदार …

Read More »