Editor

वरळीतून माघार घे, वंचितच्या उमेदवाराला शिवसेनेकडून धमकी देत २ कोटींची ऑफर पोलिसात आणि निवडणूक आयोगाकडे वंचितची तक्रार

मुंबईः प्रतिनिधी संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीला आता वेगळेच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वरळीतील शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांचा निर्विवाद विजय व्हावा यासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गौतम गायकवाड यांना २ कोटी रूपयांची ऑफर देत उमेदवारी मागे घेण्याची धमकी दिल्याचा आरोप उमेदवार गौतम …

Read More »

‘भाजपाचा राम’ शिल्लक राहिला नाही अशी वर्तमानपत्रांची हेडलाईन असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे भाकित

कर्जत जामखेडः प्रतिनिधी कर्जत- जामखेडमध्ये भाजपाचा राम शिल्लक राहिला नाही ही हेडलाईन २४ तारीखला वर्तमानपत्रांची असेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कर्जतच्या जाहीर सभेत व्यक्त केला. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा आज पार पडली. त्यावेळी ते बोलत …

Read More »

आदिवासींच्या विकासासाठी भाजपा कटीबद्ध भाजप अध्यक्ष अमित शाह यांचे प्रतिपादन

नवापूरः प्रतिनिधी स्वातंत्र्यानंतर ५५ वर्षे देशाची सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसने आजवर आदिवासीचा वापर फक्त मतांसाठी केला. गेल्या पाच वर्षांत आदिवासींच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक निर्णय घेतले. आदिवासींचा विकास करण्याची क्षमता फक्त भारतीय जनता पार्टीत असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथे झालेल्या …

Read More »

स्थानिक भाजपा आमदारच अनधिकृत बांधकामाला संरक्षण देतोय जिल्हादंडाधिकाऱ्यांनी आदेश देवूनही फौजदारी गुन्हा बिल्डरवर दाखल होईना

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभेच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. या रणधुमाळीत सत्ताधारी पक्षाकडून गतीमान सरकार आणि पारदर्शक सरकार पाच वर्षात दिल्याचा दावा करत आहे. मात्र मुंबईपासून हाकेच्या अंतावर असलेल्या मीरा-भाईंदर शहरात अनधिकृत इमारत उभारल्याप्रकरणी ठाणे जिल्हादंडाधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदविण्याचे आदेश देवूनही केवळ स्थानिक भाजपाच्या आमदाराच्या दबावामुळे फौजदारी गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करण्यात येत …

Read More »

तुमची ईडी असो वा काही तिला ‘येडी’ केल्याशिवाय गप्प बसणार नाही चितपट कुस्ती खेळणाऱ्या पैलवानांची फळी तयार केलीय- शरद पवारांचा टोला

पंढरपूरः प्रतिनिधी ज्यांच्या हाती सत्ता आहे ते सत्तेचा गैरवापर करताना दिसतात. त्यांच्याविरोधी कोणी बोलले तर तो देशद्रोही ठरवला जातो. आजचे राज्यकर्ते गुन्हेगारांवर कारवाई न करता त्यांच्या विरोधात जो बोलतो त्यावर ईडीचं हत्यार वापरतात. आता तुमची ईडी असो वा काही तिला ‘येडी’ केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा स्पष्ट इशाराही शरद पवार …

Read More »

कंपन्या, खासगी कारखान्यातील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी निवडणूक आयोगाचे कामगार आयुक्तांना आदेश

मुंबई : प्रतिनिधी खासगी कार्यालये, आस्थापना, दुकाने, कारखाने व अन्य ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच कामगारांना विधानसभा निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी दि. 21 ऑक्टोबर 2019 रोजी भरपगारी सुट्टी किंवा सवलत देण्यात यावी, असे निर्देश राज्याच्या कामगार आयुक्तांनी दिले आहेत. राज्य शासनाने याविषयी दिनांक 25 सप्टेंबर रोजी परिपत्रक काढले …

Read More »

दिवाळीचे स्वागत इराणी गायक आणि वादकांच्या संगीताने होणार स्नेहालयात सकाळी आणि संध्याकाळी होणार

अहमदनगरः प्रतिनिधी इराण मधून आलेले गायक आणि वादक यंदा दीपोत्सवाचे स्वागत स्नेहालय संस्थेत आयोजिण्यात आलेल्या.”व्हाईट ड्रीम” या संगीत मैफलीने करणार आहेत. येत्या शनिवारी, दिनांक १९ ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी पाच वाजता स्नेहालय पुनर्वसन संकुलात सायंकाळी पाच ते सात या वेळेत या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे .सर्व संगीत रसिकांना येथे …

Read More »

थांबा, सरकारी नोकरदार, शिक्षकांच्या पगारीसाठी पैसा गोळा करायचाय तिजोरीत खडखडाट असल्याने श्रीमंत संस्थांकडून पैसे घेण्याच्या हालचाली सरकारकडून सुरु

मुंबईः विशेष प्रतिनिधी दसरा गेला दिवाळी आली तरी देशावर मंदीचे सावट असल्याने अनेक औद्योगिक कारखाने एकाबाजूला बंद पडत आहेत. तर दुसऱ्याबाजूला बँकामधील व्यवहार आणि बाजारात खरेदी-विक्रीला थंडा प्रतिसाद मिळत आहे. या मंदीमुळे तिजोरीतही पैसा जमा होईनासा झाल्याने सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना दिवाळीपूर्वी पगार देण्यासाठी सरकारच्या अखत्यारीतील संस्था आणि रिझर्व्ह बँकेकडून …

Read More »

अर्थव्यवस्था कमकुवत होण्यामागे विरोधक नव्हे तर सरकारचा निष्काळजीपणा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा अर्थमंत्र्यांवर पलटवार

मुंबईः प्रतिनिधी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी योग्य त्या उपाय-योजना करणे गरजे आहे. मात्र सरकारकडून फक्त विरोधकांवर टीका करण्यात येत असल्याने त्यांना अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी उपाय सापडत नसल्याची पलटवार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यावर केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यांनी देशाच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीस माजी पंतप्रधान …

Read More »

भारतातील मुलांपेक्षा नेपाळ, बांग्लादेश, पाकिस्तानातील मुलांना चांगले अन्न मिळते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची टीका

नाशिक – निफाडः प्रतिनिधी या जगात मुलांना अन्नाचा पुरवठा करण्यासंदर्भात जे देश आहेत. त्याच्यामध्ये भारतातील मुलांना सगळ्यात कमी प्रतीचे अन्न मिळतं. आपल्यापेक्षा नेपाळ, बांग्लादेश आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा अन्नाचं प्रमाण मुलांना अधिक मिळतं, ही भारतासारख्या देशाला बातमी चांगली आहे का? असा संतप्त सवाल करतानाच जो अन्नधान्याची निर्यात जगात करतो त्या देशातील …

Read More »