Editor

केंद्राच्या नव्या वक्फ बोर्ड कायद्यावर सर्वोच्च न्यायालय १५ सप्टेंबरला निर्णय देणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण

वक्फ (सुधारणा) कायदा, २०२५ च्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सोमवारी (१५ सप्टेंबर २०२५) निकाल देणार आहे. या याचिकेचे वर्णन १०० हून अधिक याचिकाकर्त्यांनी मुस्लिम मालमत्तेचे “जोरजोरात अधिग्रहण” असे केले होते तर सरकारने सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेवरील “अतिक्रमण” विरुद्ध आवश्यक प्रतिकार म्हणून बचाव केला होता. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश …

Read More »

डोनाल्ड ट्रम्प यांचा नाटोवर दबाव, चीन- रशिया विरोधात ५० ते १०० शुल्क आकारा नाटो संघटनेच्या सदस्यांना पत्र लिहित दिला प्रस्ताव

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी नाटो देशांवर रशियाकडून तेल खरेदी थांबवून त्यावर निर्बंध लादण्यासाठी दबाव आणला, तर युक्रेन युद्ध संपेपर्यंत चीनवर ५०-१०० टक्के शुल्क लागू करण्याचा प्रस्ताव ठेवला. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी भारतीय तेल खरेदीवर २५ टक्के शुल्कासह भारतीय वस्तूंवर ५० टक्के शुल्क लादल्यामुळे ट्रम्प यांच्या वक्तव्याला महत्त्व आहे, परंतु चीनविरुद्ध …

Read More »

सचिन सावंत यांची मागणी, काँग्रेसची जागा परस्पर आरबीआयला विकण्याचे रद्द करा काँग्रेस पक्षाला नरीमन पाईंट या जागीच नवीन कार्यालय बांधून देण्याचे आश्वासन पूर्ण करा अन्यथा न्यायालयात दाद मागू.

काँग्रेस पक्षासह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याच जागी काँग्रेस पक्षासह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात ठेवून मेट्रो कार्पोरेशने ही जागा परस्पर रिझर्व्ह बँक …

Read More »

मणिपूर हिंसाचारात विस्थापित चुराचंदपूरला पंतप्रधान मोदी यांनी भेट देत साधला संवाद ७३०० कोटी रूपयांच्या विविध विकासाचे उद्घाटन

मणिपूरमध्ये वांशिक संघर्षाने दोन वर्षांहून अधिक काळ उध्वस्त केल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६० लोकांचा बळी घेणाऱ्या हिंसाचाराचे केंद्रबिंदू असलेल्या चुराचंदपूर तसेच राजधानी इम्फाळमधील त्यांच्या घरातून विस्थापित झालेल्यांची भेट घेतली. “मी तुमच्यासोबत आहे,” असा संदेश पंतप्रधान मोदींनी हिंसाचारग्रस्तांच्या कुटुंबांना दिला. मुसळधार पावसातही, पंतप्रधानांनी प्रथम इम्फाळ विमानतळापासून कुकीबहुल चुराचंदपूरपर्यंत ६५ किमीचा …

Read More »

पंतप्रधान मोदी यांनी मणिपूरमधील चुरानचांदपूर आणि इम्फाळला दिली भेट मैतई बहुल इन्फाळमध्ये घेतली जाहिर सभा

इम्फाळ मध्ये राहणाऱ्या मैतई आणि प्रामुख्याने डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या कुकी-झो समुदायाला आवाहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले की, मैतई आणि कुकी-झो नागरिकांनी डोंगराळ आणि खोऱ्यात सौहार्दपूर्ण पूल बांधण्याची गरज अधोरेखित केली. एकत्र पुढे जाण्यासाठी समावेशक विकास आणि परस्पर आदर आवश्यक आहे. पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, मणिपूरमध्ये …

Read More »

नागरिकांनी आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्या राज्य आरोग्य हमी सोसायटीचे आवाहन

महाराष्ट्रात ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ एकत्रित राबविण्यात येत असून राज्यातील सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एकत्रित योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लाख रुपयांच्या मर्यादेत १३५६ उपचार पद्धतींवर शासकीय तसेच खासगी अंगीकृत रुग्णालयांमध्ये विनामूल्य उपचार मिळणार आहेत. पिवळे, केशरी, …

Read More »

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समितीस १४ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची माहिती

राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरणाचा प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी पाटणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या एक सदस्यीय समितीच्या कालावधीस १४ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. मंत्री संजय शिरसाट म्हणाले, या समितीचा कालावधी १४ सप्टेंबर …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ येथे ३३५ कोटी रु.च्या विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल

आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या असून, त्यासाठी देशात 1 लक्ष कोटी रू. निधी उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्रातही आदिवासी समाजासाठी घरे, रस्ते, वीज, पाणी, वसतिगृह व रोजगार अशा सुविधांसाठी योजना-उपक्रम राबविण्यात येत असून, पुढील ३ वर्षांत आदिवासींच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडेल, असा विश्वास …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदी यांना सवाल, रक्त आणि क्रिकेट एकत्र याला काय म्हणायचं भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विरोधात माझं सिंदूर माझा देश अभियान

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या दहशतवाद्यां विरोधात ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई करत रक्त आणि पाणी एकत्रित चालणार नाही अशी गर्जना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. तर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताने सुरु केलेले ऑपरेशन सिंदूर अद्याप थांबविण्यात आलेले नाही असेही यावेळी जाहिर केले होते. त्यास काही महिन्यांचा कालावधी लोटत …

Read More »

ऑगस्ट महिन्यात सीपीआय महागाईत वाढ ४६ अंकानी वाढून २.०७वर पोहोचली

भारतातील ऑगस्टमधील किरकोळ चलनवाढ मागील महिन्याच्या तुलनेत ४६ आधार अंकांनी वाढून २.०७ टक्क्यांवर पोहोचली. जुलै महिन्यात किरकोळ महागाईचा दर १.६१ टक्क्यांवर होता. ऑगस्टमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती वर्षानुवर्षे ०.६९% कमी झाल्या, जरी हे जुलैमधील -१.७६% वरून तीव्र वाढ दर्शवते. एमओएसपीआयच्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात मुख्य चलनवाढ आणि अन्नधान्य महागाईत वाढ प्रामुख्याने भाजीपाला, मांस …

Read More »