Editor

बंदींसाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि कारागृह विभागाकडून प्रयासला मुदतवाढ “प्रयास” मुळे हजारो बंदींच्या जीवनामध्ये होतोय सकारात्मक बदल

कारागृहातील बंदीजनांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे आवश्यक आहे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून कारागृह विभाग आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्था यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. हा कार्यक्रम बंदी कल्याण व पुनर्वसन प्रकल्प म्हणून ओळखण्यात येतो. ‘प्रयास’च्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यात येतो. …

Read More »

अमित शाह यांचे आश्वासन, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटला सर्वतोपरी सहकार्य करू 'स्वस्ती निवास’ कौटुंबिक संवेदना जपणारे केंद्र म्हणून ओळखले जाईल

कर्करोग आजारावरील उपचार पद्धती ही दीर्घकाळ चालणारी आहे. आजारपणात आपलेपणाची कौटुंबिक किनार पाश्चिमात्य देशातील कुटुंबात पाहायला मिळत नाही. आपल्याकडे कुणी आजारी पडल्यास संपूर्ण कुटुंब आपलेपणाने रुग्णालयात त्याची साथ देतो. परिणामी कुटुंबियांच्या निवासाचा प्रश्न निर्माण होतो. आजारपणातील भावनिक गुंतागुंत व संवेदना जपण्याचे केंद्र म्हणून स्वस्ती निवास ओळखले जाईल, असा विश्वास केंद्रीय …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, मुंबई डुबवली, नालेसफाईचे कोट्यवधी रुपये कोणाच्या खिशात गेले? हाल होण्यास महानगरपालिका व राज्य सरकारच जबाबदार; मुंबईला लुटणा-या भ्रष्ट टोळीला मुंबईकर माफ करणार नाही

मान्सूनच्या पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईच्या रस्त्यावर राज्य सरकार आणि महानगरपालिकेतील प्रशासन राजच्या भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहिल्याचे चित्र दिसले. रस्ते, रेल्वे ट्रॅक सगळीकडे पाणीच पाणी साचले होते. चाकरमानी मुंबईकरांचे कामावर जाताना प्रचंड हाल झाले. बीएमसी दरवर्षी कोट्यवधी रुपये मुंबईतील नालेसफाई व मान्सूनपूर्व कामावर खर्च करते पण दरवर्षी पहिले पाढे ५५ असे चित्र …

Read More »

अजित पवार यांच्याकडून बारामती, इंदापूर, पुणेसह अन्य जिल्ह्यांतील परिस्थितीचा घेतला आढावा मान्सूनच्या मुसळधार पाऊसाची अनेक जिल्ह्यात हजेरी

मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात दाखल झाला असून हवामान खात्याने मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उद्या रेड अलर्ट आहे. पालघरसाठी यलो अलर्ट आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या घाट परिसरात …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश… नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा

पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्यपूर्णरित्या आढावा घेत आहेत. या परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ज्या ठिकाणी नुकसान झाले तेथे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या मुख्य सचिव आणि राज्याच्या आपत्ती निवारण कक्षाशी ते सातत्याने संपर्कात आहेत. दरम्यान, राज्यातील …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे आदेश, प्रशासनाने सतर्क राहून मदत कार्य करावे जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांना निर्देश

राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून विशेषतः मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कता ठेवून मदत कार्य करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या संदर्भामध्ये ठाणे, नाशिक जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे ठाणे, …

Read More »

मान्सूनच्या पहिल्याच मोठ्या पावसाने मुंबई आणि मुंबईकरांची उडाली दैना मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाव्यातील मान्सूनने काढली हवा

मान्सूनचे केरळात आगमन झाल्यानंतर एकाच दिवसात मान्सूनचे पदार्पण महाराष्ट्रात झाले. पण मान्सूनच्या पावसाला मुंबईत पोहोचायला तीन दिवस लागणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. पण तत्पूर्वीच कोकणात आलेल्या पावसाने मुंबईत रात्रीत आगमन करत रात्रभर मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आज सकाळपासून मुंबई आणि उपनगरात मान्सूनने चांगलीच हजेरी लावत कोसळायला सुरुवात …

Read More »

मुकुल अग्रवाल या तीन कंपन्याच्या स्टॉकमधून बाहेर पडणार एक टक्का ठेवलेल्या कंपन्यांमधूनही बाहेर पडणार

मुकुल अग्रवाल यांनी मार्च तिमाहीत त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये कपात केली, ज्या तीन कंपन्यांमध्ये त्यांनी पूर्वी १% पेक्षा जास्त हिस्सा ठेवला होता त्या कंपन्यांमधून ते बाहेर पडले. दीर्घकालीन दृष्टिकोन बाळगणाऱ्यांसाठी, अशा बाहेर पडण्यामुळे लक्ष वेधले जाते. परंतु अशा प्रकारच्या हालचालींचा अर्थ नेहमीच काहीतरी चुकीचे आहे असे होत नाही. कधीकधी ते मूल्यांकनाबद्दल असते …

Read More »

संरक्षण क्षेत्रातील बँकोच्या उत्पादनाच्या शेअर्सवर साऱ्यांच्या नजरा २०२९ पर्यंत ५० हजार कोटी रूपयांपर्यंतच्या निर्यातीचे लक्ष्य

गेल्या महिन्याभरात, वाढत्या भू-राजकीय तणावामुळे आणि २०२९ पर्यंत ५०,००० कोटी रुपयांच्या संरक्षण निर्यातीचे उद्दिष्ट यामुळे, संरक्षण क्षेत्रातील शेअर बाजारात तेजीत आहेत. परिणामी, संरक्षण क्षेत्रातील शेअरमध्ये वाढ झाली आहे, ज्यामुळे अंकीय वाढ झाली आहे. दलाल स्ट्रीटवर संरक्षण क्षेत्रातील शेअर्सने लक्ष वेधले असताना, एका कमी ज्ञात शेअरने शांतपणे त्या सर्वांपेक्षा चांगली कामगिरी …

Read More »

नीती आयोगाचे सीईओ बी व्ही आर सुब्रमण्यम यांची घोषणा, भारत जगातील चौथी अर्थव्यवस्था जीडीपीमध्ये भारताने जपानला मागे टाकले

नीती आयोगाचे सीईओ बी व्ही आर सुब्रमण्यम यांनी शनिवारी घोषणा केली की भारताने जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. आयएमएफच्या आकडेवारीचा हवाला देत, सुब्रमण्यम यांनी पॉलिसी थिंक टँकच्या १० व्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीनंतर पत्रकार परिषदेत या मैलाचा दगड निश्चित केला. “मी बोलतोय तशी आपण चौथी सर्वात …

Read More »