Editor

सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्तीः विवाह रद्दबातल ठरला तरी पोटगी कायमस्वरूपी १९५५ सालच्या निकालाचा संदर्भ देत दिला निकाल

सर्वोच्च न्यायालयाने आज (१२ फेब्रुवारी) असा निर्णय दिला की हिंदू विवाह कायदा, १९५५ अंतर्गत कायमस्वरूपी पोटगी आणि अंतरिम भरणपोषण विवाह रद्द घोषित केला गेला असला तरीही दिले जाऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने असेही सांगितले की, “१९५५ च्या कायद्याच्या कलम ११ अंतर्गत ज्या जोडीदाराचा विवाह रद्द घोषित करण्यात आला आहे तो १९५५ …

Read More »

शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत सन्मान, महाराष्ट्रात धुमशान शरद पवार यांच्या बचावासाठी एकनाथ शिंदे आले पुढे

मंगळवारी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद गट) अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे पुरस्कार देऊन गौरव केला. शरद पवार यांनी दिल्लीत एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला पण त्या पुरस्काराच्या सन्मानावरू महाराष्ट्रात मात्र घमासान सुरू झाले. शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, आणखी किती मृत्यू होण्याची वाट भाजपा सरकार पाहणार आहे? महिनाभरात ८ मृत्यू होऊनही राज्य सरकारला जीबीएस आजाराचे गांर्भीय नाही

राज्यात जीबीएस GBS चा पहिला रुग्ण सापडून एक महिना झाला आणि या एका महिन्यात या आजाराने ८ मृत्यू झाले आहेत. या आजाराचे रुग्ण आता मुंबईतही सापडू लागले आहे परंतु राज्य सरकार मात्र या आजाराकडे फारसे गांभिर्याने पहात असल्याचे दिसत नाही, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी …

Read More »

कोल्हापूर फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीस तत्वत: मान्यता क्रीडा गणवेश दर्जा, क्रीडा मार्गदर्शक मानधन, प्रशिक्षणार्थी भोजन दरात वाढ करण्याचा निर्णय- क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आहेत. या सुविधा अद्ययावत कराव्यात, काही सुविधा आवश्यतेनुसार नव्याने कराव्यात,असे निर्देश देत गणवेश दर्जा, प्रशिक्षक मानधन, भोजन दरात वाढ करण्याचा तसेच फुटबॉल खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कोल्हापूर येथे फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्याबाबत तत्वत: मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे क्रीडामंत्री …

Read More »

ऊस तोडणी यंत्रासाठी राज्य शासनाने केंद्र शासनास सुधारित प्रस्ताव सादर करा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे निर्देश

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रास अनुदान प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे बैठक झाली. या बैठकीत सन २०२२-२३ पासून राज्यात राबविण्यात येत असलेल्या योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी राज्याचे कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, कृषी आयुक्त …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, आशियातील सर्वात मोठ्या ‘एआय’ महोत्सवाची टीईएएमच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

मुंबई टेक वीक २०२५ या आशियातील सर्वात मोठ्या ‘एआय’ महोत्सवाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. टेक आंत्रप्रेन्योअर्स असोसिएशन ऑफ मुंबई (TEAM) सोबत झालेल्या विशेष बैठकीत त्यांनी मुंबईच्या तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी या महोत्सवाच्या माध्यमातून मुंबईला ‘आशियाचा एआय …

Read More »

बेघरांच्या नजरेतून मुंबईची टिपलेली छायाचित्रे अचंबित करणारी माय मुंबई प्रोजेक्‍ट फोटो' प्रदर्शनाचे उत्‍साहात उद्घाटन

जे स्‍वत: बेघर आहेत, अशांनी मुंबईची टीपेलेली छायाचित्रे अचंबित करणारी आहेत. समाजाने नाकारलेल्‍या बेघरांच्‍या नजरेतून मुंबईचे ख-या अर्थाने दर्शन होते, असे गौराद्गार बृहन्‍मुंबई महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी काढले. निमित्‍त होते, ‘माय मुंबई प्रोजेक्‍ट फोटो’ प्रदर्शनाच्‍या उद्घाटनाचे ! ‘पहचान’ संस्थेच्या माध्‍यमातून ५० बेघर नागरिकांना कॅमेरे देऊन, त्यांच्या दृष्टिकोनातून …

Read More »

बाल संरक्षण आयोगाकडून ‘बालरक्षा अभियान’, ‘बालस्नेही पुरस्कार’ची घोषणा महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड्. सुशीबेन शहा यांची माहिती

बालकांच्या हक्कांचे संरक्षण आणि सुरक्षित भविष्यासाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून ‘बालरक्षा अभियान’ आणि ‘बालस्नेही पुरस्कार’ हे दोन उपक्रम राबवले जाणार आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रातील बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पालक, शिक्षक, पोलिस, सामाजिक संस्था आणि प्रशासन यांच्यात संपर्क, समन्वय आणि जबाबदारीची जाणीव वाढवणे गरजेचे असून त्यादृष्टीने राज्य बाल …

Read More »

सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करून बडतर्फ करा सरकारने न्याय दिला नाही तर लाखो आंबेडकरी जनतेचा ३ मार्चला मंत्रालयाला घेराव

परभणीमध्ये संविधानाची विटंबना केल्यानंतर संतप्त जनता रस्त्यावर उतरून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला. कोंबिंग ऑपरेशन करून शेकडो आंबेडकरी जनतेला बेदम मारहाण केली, अनेक निष्पाप नागरिकांना अटक केली. आंबेडकरी विचाराचा तरुण सोमनाथ सुर्यवंशी यालाही अटक करुन कोठडीत मारहाण केली, यातच त्याचा मृत्यू झाला पण सरकारने या प्रकरणी पोलिसांवर …

Read More »

५० लाख सदस्यांसाठी चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण महाराष्ट्र दौऱ्यावर येत्या १५ दिवसांत भाजपा करणार ५० लाख सदस्यांची नोंदणी

संघटन पर्वाअंतर्गत महाराष्ट्र भाजपाने १ कोटी सदस्य नोंदणीचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. येत्या १५ दिवसांत आणखी ५० लाख सदस्य नोंदवून दीड कोटी सदस्य नोंदणीचे लक्ष्य साध्य केले जाईल, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी व्यक्त करत यासाठी आपण १३ फेब्रुवारीपासून कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासमवेत राज्याचा दौरा करणार …

Read More »