मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात तत्ववादी आणि आदर्श राजकारणी म्हणून आणि आपल्या समाजवादी विचारांशी कोणतीही तडतोड न करणारा नेता म्हणून भविष्यात नाव घेतले जाईल ते फक्त गणपत आबा देशमुख यांचे. कधीही पक्षांतर न करता आणि कधीही आपल्या आमदार पदाचा रूबाब किंवा त्याचा गैरवाजवी वापर करताही सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याचे आमदार …
Read More »सहकारी संस्थांना आता वार्षिक सर्वसाधारण सभा प्रत्यक्षही घेता येणार मात्र अट ही ५० पेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी संस्थांना सभासदांच्या प्रत्यक्ष सहभागाद्वारे
मुंबई : प्रतिनिधी मागील दिड वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे सहकारी संस्थांना वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यावर निर्बंध आल्याने या संस्थांना आपले कामकाज चालविणे अवघड झाले होते. मात्र आता यावर राज्य सरकारने तोडगा काढत सहकारी संस्थांना या सभा घेण्यास परवानगी देत मार्गदर्शक तत्वे जाहीर जाहिर केली. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळणे आवश्यक …
Read More »आता शेतकरी करू शकणार मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी रियल टाइम नोंदणीमुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना अचूक नुकसान भरपाई आणि मदत देणे शक्य होणार
मुंबई : प्रतिनिधी शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारित शेतकऱ्यांना पीक कर्ज ही दिले जाते. मात्र दोन तीन गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही …
Read More »या १४ आयएएस अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या राज्य सरकारकडून आदेश जारी
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील १४ सनदी अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या असून कोशल्य विकासचे आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह यांची वर्णी उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या सहसचिव पदी लावण्यात आली आहे. तर एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी मलीकनेर यांची मात्र आहे त्याच पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. तर कामगार विभाग आयुक्त कल्याण यांच्या …
Read More »अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज-मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूरपरिस्थिती तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे १ हजार ८०० कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. राज्याच्या सर्वच विभागांमध्ये अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे रस्ते व …
Read More »पॅकेज म्हणा नाही तर मदत त्यांचा प्रश्न, पण घोषणा करा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोला
कोल्हापूरः प्रतिनिधी मी पॅकेज जाहिर करणारा नाही तर मदत जाहिर करणारा मुख्यमंत्री असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहिर केल्यानंतर विरोधकांच्या पत्रकार परिषदेत आमची हरकत नाही. त्यांनी त्याला पॅकेज म्हणावं की मदत म्हणावं हा त्यांचा मुद्दा आहे. फक्त तुम्ही त्याची घोषणा करावी. सामान्य माणसाला मदत मिळण्याशी मतलब आहे, असा पलटवार विरोधी …
Read More »मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांना आज भेटलो पुन्हा मुंबईत भेटणार कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार
कोल्हापूर : प्रतिनिधी पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीत राजकारण नको. मी स्वत: आज शाहूपुरी येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटलो आणि बोललो. मुंबईत आम्ही परत एकदा सर्वाना बोलावून पुर परिस्थितीत सर्वांना कशी मदत करता येईल ते पाहू अशी माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत दिली. मी इथे आलो …
Read More »शालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक पालकांची पुन्हा फसवणूक करण्याचा सरकारचा डाव- आ. अतुल भातखळकर यांचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी शालेय फी मध्ये १५ टक्के सवलत देण्याचा निर्णय हा माझ्या व पालक संघटनांच्या न्यायालयीन लढ्यानंतर महाविकास आघाडी सरकारला उशिरा आलेली जाग असली तरीही, अध्यादेश काढून कायद्यात सुधारणा न करता केवळ अधिसूचना काढणार असल्याची शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक असून यातून पालकांची पुन्हा फसवणूक करण्याचा राज्य …
Read More »पूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरा
मुंबई : प्रतिनिधी ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान ५० टक्के रक्कम तरी तातडीने द्यावी, विमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत असे निर्देश विमा कंपन्यांना देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना करत नुकसानग्रस्तांना उर्वरित विमा रक्कमही कागदपत्रांची पूर्तता करून लवकरात …
Read More »पर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा पर्यटनस्थळी पर्यटकांसाठी उपलब्ध होणार तारांकीत दर्जाच्या सोयी-सुविधा
मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (एमटीडीसी) पर्यटक निवासे आणि मोकळ्या जागा या निसर्गरम्य आणि प्रेक्षणीय पर्यटनस्थळांच्या ठिकाणी आहेत. या ठिकाणी येत असलेल्या पर्यटकांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानिक व्यावसायिक, युवकांना रोजगार उत्पन्न होवून पर्यटनस्थळाचा सर्वागिण विकास व्हावा यासाठी एमटीडीसीने पुढाकार घेतला आहे. याठिकाणी पंचतारांकित दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यात येणार …
Read More »
Marathi e-Batmya