मोठा बेलोरा हे पुसद तालुक्यात येणारे गाव. आता गावं म्हटलं की व्यक्ती तेथे प्रवृत्ती आल्याच. बेलोऱ्यात बारावी पर्यंत शाळा आहे. पण सगळीच मुलं शाळेत जायची असं नाही. शाळेत न जाणारी आणि काम न करणारी तरूण मुलं (खरं तर सगळ्यांनाच कामं असायची असं पण नाही) हे सगळे समाज मंदीरावर बसून पत्त्याचा …
Read More »कोरोनाचा जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रकल्प खालापूरला स्थलांतरीत करणार आराखडा सादर करण्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी गोवंडी येथील नागरिकांसह अनेक मुंबईकरांची गोवंडी येथील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रकल्प मुंबईबाहेर नेण्याची मागणी आहे. याअनुषंगाने तसेच परिसरातील प्रदुषण समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक संपन्न झाली. आमदार अबु असीम आझमी यांच्या पुढाकाराने बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस आमदार …
Read More »कोरोना : नव्या बाधित रूग्णाची संख्या एक महिन्यापूर्वीइतकी; बरे होण्याचे प्रमाण वाढले १० हजार २४४ नवे बाधित, १२ हजार ९८२ बरे झाले तर २६३ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी राज्यात नवे बाधित रूग्ण आढळून येण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर घट होताना दिसत येत असून साधारणत: ऑगस्ट महिन्यात आढळून येणारी रूग्णसंख्या मागील २४ तासात आढळून आली आहे. ऑगस्ट महिन्यात नवे बाधित आढळून येणारे रूग्ण ९ ते १२ हजार दरम्यान आढळून येत होते. त्यानुसार आज १० हजार २४४ इतके …
Read More »अद्ययावत मानसिक आरोग्य संकुल सुरु करायचंय, प्रस्ताव तयार करा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी मानसिक आरोग्य संस्थेच्या पाषाण येथील जागेवर २५० खाटांचे अद्ययावत मानसिक आरोग्य संकुल उभे करण्यात येणार असून याबाबतचा प्रस्ताव तयार करावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले. मानसिक आरोग्य संस्थेची आढावा बैठक वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय येथे आयोजित करण्यात आली होती. …
Read More »आशिष शेलार यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला दिले हेआदेश ४ नोव्हेंबर २०२० पर्यत प्रतिज्ञा पत्र सादर करण्याचे आदेश
मुंबई: प्रतिनिधी कोरोना बाधित रुग्णांवर शासकिय रूग्णालयात उपचार सुरु असताना त्या रूग्णांची पुरेशी काळजी घेतली नसल्याच्या १० घटनांप्रकरणी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. या होत असलेल्या बेजबाबदारी प्रकरणी राज्य सरकारला ४ नोव्हेंबर पर्यत प्रतिज्ञा पत्र सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले. मुख्य न्यायाधीश दिपंकर दत्ता …
Read More »कोरोना : आजही बाधित संख्या कमीच तर घरी जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ; जिल्हानिहाय माहिती १३ हजार ७०२ नवे बाधित, १५ हजार ०४८ बरे झाले तर ३२६ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील बाधितांच्या संख्येत सतत घट होताना दिसत आहे. मागील २४ तासात बाधित रूग्णांची संख्या १३ हजार ७०२ इतकी आढळून आली आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १४ लाख ४३ हजार ४०९ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ५५ हजार २८१ इतकी झाली आहे. तर आज १५ हजार ०४८ …
Read More »प्रियंका आणि राहुलच्या संवेदनशिलतेला भाजपकडून मोदींच्या व्हिडिओचे असेही उत्तर कोण सर्वाधिक संवेदनशील स्पर्धा सुरु?
मुंबई : प्रतिनिधी उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील दलित पीडीत मृत मुलीचे पार्थिव तिच्या कुटुंबियांच्या हाती न सोपविता पोलिसांनी त्यावर अंत्यसंस्कार केले. त्याचबरोबर तिच्या कुटुंबियांना दोन दिवस डांबून ठेवत पोलिसांच्या एसआयटी टिम व्यतीरिक्त कोणालाही भेटू किंवा फोनवरून संपर्क करू दिला नाही. या पिडीत कुटुंबियांची भेट घेण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका …
Read More »वाचा, दिवाळीनंतर शाळेचे कोणते वर्ग सुरु होणार कोणते नाही शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची माहिती
अचलपूर : प्रतिनिधी एकाबाजूला कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला असला तरी दुसऱ्या बाजूला राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात केंद्र सरकारने राज्य सरकारंना परावनगी दिली. त्यामुळे राज्यातील शाळा कधी सुरु होणार याकडे साऱ्या पालकांचे लक्ष लागून राहीले. अखेर शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिवाळीनंतर ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरु …
Read More »महाराष्ट्र शासन संचालित होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती
बीड : प्रतिनिधी महाराष्ट्र शासन संचालित होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. सोनाजीराव होमिओपॅथीक वैद्यकीय कॉलेज तर्फे “केशरबाई सोनाजी क्षीरसागर” उर्फ “केशरबाई काकू” यांच्या स्मृती प्रित्यर्थ वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारला वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख प्रमुख …
Read More »‘बेटी बचाओ’चा नारा देणारे पंतप्रधान मूग गिळून गप्प का? हाथरस पीडित कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी सोमवारी काँग्रेसचा सत्याग्रह: थोरात
मुंबई: प्रतिनिधी उत्तर प्रदेशातील हाथरसच्या घटनेने देशाला शरमेनं मान खाली घालायला लावली पण भाजपाच्या योगी आदित्यनाथ सरकारची थोडीही संवेदना जागी झाली नाही. हे प्रकरण अत्यंत बेजबाबदारपणे व हुकुमशाही पद्धतीने हाताळण्यात आले. पीडित कुटुंबाला न्याय देण्याऐवजी त्यांना धमक्या देण्यापर्यंत उत्तर प्रदेश सरकारची मजल गेली. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष …
Read More »
Marathi e-Batmya