Breaking News

रूग्णांची लूट करणाऱ्या रूग्णालयांवर कारवाईसाठी भरारी पथके स्थापन करा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारण्याबाबत राज्य शासनाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. यासर्व निर्देशांची अंमलबजावणीसाठी आणि तपासणीसाठी राज्यात भरारी पथक नेमण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.  यासंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, …

Read More »

पॉलिटेक्निकच्या पहिल्या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया १० ऑगस्टपासून ऑनलाईन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील १० वी आणि १२ वीचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामुळे पुढील शिक्षणासाठीच्या प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून १० वी आणि १२ वी नंतर पॉलिटेक्निकच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १० ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२० या कालावधीत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने पूर्ण करण्यात …

Read More »

मूर्ती दहन… सर्जनशील लेखक आणि कलावंत सुदेश जाधव यांची खास कथा

काश्या म्हाताऱ्याच्या अंगणात तुडुंब गर्दी भरली होती. अंगणात पूर्ण भयाण शांतता. म्हाताऱ्याचा जीव कशात तरी अडकला होता. म्हाताऱ्याला कांदा भजी आवडायचे म्हणून गावच्या सरपंचाने एका प्लेटीतून कांदाभजी आणलेले. उशाला तसेच पडून होते. भजीला वास सुटला पण म्हाताऱ्याचा जीव काय सुटेना. म्हाताऱ्याला काहीतरी सांगायचं होतं पण म्हातारा काय तोंड उघडेना. म्हाताऱ्याला फणसाच्या  गऱ्याचा वास …

Read More »

टाळेबंदी हटवा अन्यथा दहा ऑगस्ट नंतर रस्त्यावर येवू वंचित बहुजन आघाडीचा इशारा!

मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वाधित संसर्ग असलेल्या भागांना हॉटस्पॉट म्हणून घोषित केले. मात्र, सरकारने हॉटस्पॉट घोषित केलेल्या भागांमध्ये यावर्षा पेक्षा गेल्यावर्षी म्हणजेच २०१९साली जास्त लोकांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य विभागाची ही माहिती आहे. त्यामुळे राज्य सरकारने पूर्णपणे टाळेबंदी हटावावी आणि खऱ्या अर्थाने अनलॉक करावा. अन्यथा दहा ऑगस्ट नंतर …

Read More »

कोरोना: मुंबईत स्थिर, ठाण्यात संख्या घटली तर घरी जाणाऱ्योक्षा बाधित जास्त ११ हजार ५१४ नवे बाधित, १०८५४ जण घरी तर ३१६ मृत्यूची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कोरोनाच्या प्रसारावर मुंबई महापालिकेने चांगलेच नियंत्रण मिळविले असून मागील काही दिवसांपासून शहरातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २० हजारावर स्थिर राहीली आहे. तर ठाणे जिल्ह्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची ३४ हजारावर असलेली संख्या आता २७ हजारापर्यत खाली आलेली आहे. त्यामुळे या जिल्ह्यातही संख्या चांगल्यापैकी बरे होवून घरी …

Read More »

मराठी आर्किटेक्चर नाईक आत्महत्याप्रकरणातील आरोपीवर कडक कारवाई करा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी मुंबईतील मराठी आर्किटेक्चर अन्वय नाईक यांच्या आत्महत्याप्रकरणी आरोपी यादीत असलेल्या पत्रकार अर्णब गोस्वामी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. सध्या अभिनेता स्व. सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी न्याय मिळवून देण्याच्या नावाखाली ते राजकिय हेतूने आरोप करून महाविकास आघाडी …

Read More »

राज्यातल्या पावसाची पंतप्रधान मोदींनी घेतली मुख्यमंत्री ठाकरेंकडून माहिती मुंबई, कोकण आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी, नियंत्रण कक्षांशी थेट मुख्यमंत्री संपर्कात

मुंबई : प्रतिनिधी मुसळधार वृष्टी आणि जोरदार वारे यामुळे मुंबई, मुंबई परिसर तसेच कोकणातील जिल्हे त्याचप्रमाणे विशेषत: कोल्हापूरमध्ये उद्भवलेल्या परिस्थिती संदर्भात मुख्यमंत्री सातत्याने आढावा घेत असून ते संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी व नियंत्रण कक्षांमध्ये स्वत: बोलत आहेत. कोरोनाशी मुकाबला सुरु असतांना अतिवृष्टीमुळे संपूर्ण काळजी घेऊन मदत कार्य करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. काल …

Read More »

२.३ कोटी मुलांच्या शिक्षणासाठी देशातील पहिला गुगलचा क्लासरूम महाराष्ट्रात पहिलं राज्य असल्याचा सार्थ अभिमान-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी सगळे जग विचित्र परिस्थितीला सामोरे जात असतांना आणि आपले आयुष्य मास्क आणि घरात बंदिस्त झालेले असतांना कोरोनाने आपल्याला काय शिकवले असा विचार आपण केला तर कोरोनाने उद्याच्या गोष्टींची आज आपल्याला ओळख करून दिली. उद्याचे जग, उद्याची माध्यमे, उद्याचे शिक्षण कसे असेल याची आजच जाणीव करून दिली. त्यामुळे …

Read More »

रामभक्तांवर पोलिसांची कारवाई, राज्यात मोगलाई अवतरली भाजपा प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी अयोध्या येथील श्रीराममंदिराच्या भूमिपूजनानिमित्त शांततेत आनंदोत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांवर महाविकास आघाडी सरकारने कारवाई करून मोगलाईचे दर्शन घडविल्याची टीका भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी मुंबईत केली.  प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी भाजपा प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते. कोरोना …

Read More »

जे तत्कालीन सरकारला जमले नाही ते विद्यमान “मुख्यमंत्र्यांनी करून दाखविले” दुधाच्या भुकटी सरकारच्या दुसऱ्या विभागाला देण्याचा निर्णय

मुंबई: विशेष प्रतिनिधी मागील काही दिंवसापासून राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आणि दूधाच्या भुकटीला अनुदान देण्याच्या प्रश्नांवरून सातत्याने आंदोलन केले जात आहे. मात्र या प्रश्नांचे मूळ तत्कालीन सरकारने याबाबत निर्णय न घेतल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. परंतु जे तत्कालीन सरकारला जमले नाही ते विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करून दाखविल्याची माहिती …

Read More »