राजकारण

बदल्यांची सीआयडी चौकशी करा अन्यथा न्यायालयात दाद मागणार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी कोरोना महामारीमुळे राज्य गंभीर संकटात असूनही बदल्यांना परवानगी देताना राज्य सरकारने मनमानीपणे आपलेच धोरण बदलले, कोरोनाच्या उपाययोजनात सातत्य न राहिल्याने जनतेचे जीवित संकटात आले, बदली कायद्याचा भंग झाला, राज्याचे आर्थिक नुकसान झाले व बदल्यांचा बाजार मांडून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले आहेत. बदल्यांच्या सीआयडी चौकशीचा आदेश द्यावा, …

Read More »

बिहार समर्थक महाराष्ट्र भाजप नेत्यांना दुःख सहन करण्याची शक्ती मिळो काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या पदकांमध्ये बिहार पोलिसांना यावर्षी एकही पदक मिळालेली नाही. त्याचवेळी महाराष्ट्र पोलिसांना तब्बल ५८ पदकं मिळाल्याने बिहार पोलिसांचे गुणगान गाणाऱ्या व महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या बिहार समर्थक राज्यातील भाजपा नेत्यांना प्रचंड दुःख झाले असेल. हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो ही श्रीरामचरणी प्रार्थना, अशी खोचक …

Read More »

सुप्रिया सुळेंचे आश्वासन, श्रमिक कामगारांच्या वेतन विधेयकासाठी पाठपुरावा करणार श्रमिक घर कामगार संघटनेचे उद्घाटनप्रसंगी सुप्रिया सुळेचे आश्वासन

मुंबई: प्रतिनिधी असंघटित कामगारांच्या हितासाठी गठित झालेल्या श्रमिक घर कामगार संघटनेचे उद्घाटन झुमच्या माध्यमातून करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आश्वासन दिले की, कामगारांना किमान वेतनाच्या रखडलेल्या विधेयकासाठी पाठपुरावा करणार आणि कामगार वर्गास न्याय मिळवून देणार. महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी कामगार वर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी आग्रही आहे आणि मोठ्या विश्वासानी …

Read More »

खुशखबर: अल्पसंख्याकातील या तरूणांना पोलिस भरतीच्या अनुषंगाने होणार मदत मिळणार पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण- अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक

मुंबई : प्रतिनिधी राज्यात पोलीस पदावर अधिकाधिक अल्पसंख्याक तरुणांची निवड होण्याच्या दृष्टीने त्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सध्या या प्रशिक्षणासाठी राज्यातील १४ जिल्ह्यांमधून इच्छूक प्रशिक्षणार्थी उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरु करण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांमध्येही ती लवकरच सुरु केली जाईल. सध्या फक्त निवड प्रक्रिया सुरु असून कोरोनाची परिस्थिती पाहून …

Read More »

काँग्रेसच्या भटक्या विमुक्त जाती-जमाती सेलकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवींना आदरांजली चर्चगेट येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून केली

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीदिना निमित्त मुंबई काँग्रेसच्या भटक्या विमुक्त जाती जमाती सेलच्यावतीने चर्चगेट येथील अहिल्यादेवींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी या सेलचे अध्यक्ष राजाभाऊ खरात, सचिव जयेश जांगळे यांच्यासह इतर कार्यकर्त्ये उपस्थित होते. Share on: WhatsApp

Read More »

जय जवान, जय किसान, जय कामगार आपल्या राज्याचे ध्येय राहणार शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार , कामगारांचे हित जोपासणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी आरोग्य या विषयाकडे  प्राधान्याने लक्ष दिले जाणार असून राज्यातील खेड्यापाड्यांमध्ये तसेच दुर्गम भागात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय सुविधा पोहोचण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त आज मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण …

Read More »

खुशखबर: एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एसटी सुरु होणार कोचिंग क्लास आणि स्पर्धा परिक्षा केंद्रांबाबतही पुढील आठवड्यात निर्णयाची शक्यता- विजय वडेट्टीवार

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी आंतरजिल्हा एसटी प्रवासावर घालण्यात आलेली बंदी पुढील आठवड्यात उठविण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील चार-पाच महिने इच्छा असूनही एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता आले नाही अशांना आता दिलासा मिळणार असून याबाबत पुढील आठवड्यात निर्णय होणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी …

Read More »

कहाँ गए वो २० लाख करोड ? या प्रश्नाची भाजप व मोदींना भीती का वाटते ?: सत्यजीत तांबे

मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने केलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी आज भाजप कार्यालयासमोर आंदोलन करत, मोदीजी, कहाँ गये वो २० लाख करोड?  हा जाब विचारण्यात आला. मुंबईतील कार्यालयासमोर आंदोलनास जात असताना पोलिसांनी अध्यक्ष सत्यजीत तांबे व त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले. कहां …

Read More »

काँग्रेसने मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्याचे तरी धाडस दाखवावे भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे आव्हान

मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने महाराष्ट्राला विविध  माध्यमातून २८ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची थेट मदत दिली आहे . याउलट महाआघाडी सरकारने राज्यात एका ‘कवडी’चेही पॅकेज गोरगरिबांना दिलेले नाही. भाजपा कार्यालयावर मोर्चा काढण्याऐवजी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांवर दबाव आणून असे पॅकेज जाहीर करायला लावावे, तेवढे धाडस राज्यातील काँग्रेस नेत्यांनी दाखवावेच असे आव्हान भाजपा मुख्य प्रवक्ते केशव …

Read More »

परभणीतील त्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसास ५० लाखांची मदत प्रस्तावास तातडीने एका दिवसात मंजुरी -ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कर्तव्य बजावताना कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या परभणी जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसास ५० लाख रुपयांची विमा कवच रक्कम अदा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री  हसन मुश्रीफ यांनी दिली. सुपा (ता. गंगाखेड, जि. परभणी) या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी रामदास आम्ले हे ग्रामस्थांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी …

Read More »