मुंबईः प्रतिनिधी रिपब्लिक टि.व्ही.चे संपादक अर्णव गोस्वामी यांना आर्किटेक्ट अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी आज सकाळी अटक करण्यात आली. या अटकेवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपा आमने-सामने आल्याचे चित्र राज्यात पाह्यला मिळाले. गोस्वामी यांना अटक केल्यानंतर भाजपाकडून महाविकास आघाडी सरकारवर काँग्रेसच्या मदतीने आणीबाणी आणत असल्याचा आरोप शिवसेनेवर करत महाराष्ट्रात लोकशाहीचा गळा …
Read More »परंपरागत दरवर्षीची शिक्षक व विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार! शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार असल्याची अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात ऑनलाईन शिक्षण पध्दती अवलंब करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही अव्याहतपणे अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत गुंतले आहेत व त्यांनी शाळा बंद असल्या तरी …
Read More »राज्यातील स्विमिंग पूल, चित्रपटगृह-नाट्यगृहासह या गोष्टी उद्यापासून सुरु राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
मुंबईः प्रतिनिधी Missionbeginagain अंतर्गत राज्य सरकारने आणि अनलॉक लॉकडाऊन अंतर्गत राज्यातील जलतरण खेळाडू आणि मर्यादीत लोकांकरीता स्विमिंग पूल, चित्रपटगृह-नाट्यगृह-मल्टीप्लेक्स आणि योगा इन्स्टिट्युट सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. तसेच या तीन गोष्टी ५ नोव्हेंबर अर्थात उद्यापासून सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असून त्या अनुषंगाने अधिसूचना जारी करण्यात आली. काही …
Read More »राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांनी दिले प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना हे आव्हान निवडणूकीतील डिपॉझिट जप्त करण्याची ताकद
मुंबई : प्रतिनिधी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील तुळजापूर मध्ये राहोत किंवा कोल्हापूरमध्ये त्यांचे डिपॉझिट जप्त करण्याची ताकद आमच्याकडे आहे असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिले. भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तुळजापूर आणि कोल्हापूरमध्ये निवडून येण्याचे आव्हान दिले होते. त्या आव्हानाला …
Read More »विकास प्रकल्प लटकवा, अटकवा आणि भटकवा! ठाकरे सरकारची कार्यपद्धती भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार
मुंबई: प्रतिनिधी आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेड कांजूर मार्गला हलविण्यासंदर्भात ठाकरे सरकारने घेतलेला निर्णय हा म्हणजे विकास प्रकल्प लटकवा, अटका आणि भटकवा अशी ठाकरे सरकारची कार्यपध्दती असल्याची टीका भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज केली. मेट्रो कारशेड आरेतून कांजुरमार्ग येथे आणण्याबाबात निर्णय ज्या दिवशी ठाकरे सरकारने घेतला त्याच दिवशी आम्ही त्यातील …
Read More »राज्याच्या विकासात केंद्राचा हस्तक्षेप निंदनीय खासदार सुप्रियाताई सुळे यांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचे पाप केंद्र सरकार करतेय हे त्यांच्या कृतीतून दिसत असून हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये केंद्र सरकार हस्तक्षेप करतेय हे निंदनीय आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केंद्रसरकारवर जोरदार हल्लाबोल करत टीका केली. मेट्रो कारशेडबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांवर …
Read More »कांजूरमार्ग कारशेडचे काम थांबवण्यासाठी भाजपचे कट कारस्थान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी कांजूरमार्ग कारशेड हा मुंबईच्या दोन लाईनला जोडणारा प्रकल्प असून २० लाख लोकांना त्याचा फायदा मिळवून देणारा असल्याने हे काम कसं थांबवायचं यासाठी भाजपकडून कट कारस्थान सुरू आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. केंद्राच्या इंडस्ट्री मंत्रालय खात्याकडून राज्याच्या मुख्य …
Read More »त्या चार महिन्यातील वाढीव वीजबिलांबाबत दिवाळीपर्यंत निर्णयाची शक्यता डॉ. नितीन राऊत यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी कोरोना कालावधीमध्ये जास्तीच्या वीजवापरामुळे आलेल्या वाढीव वीजबिलांबाबत दिलासा देण्याबाबत चर्चा सुरु असून दिवाळीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी सोमवारी ट्रॉम्बे येथील टाटा औष्णिक वीज निर्मिती केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांच्या एका …
Read More »पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच रिक्त जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर आचारसंहिता आजपासून लागू १ डिसेंबरला होणार मतदान
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीत पदवीधर मतदारसंघातून ३ पैकीपैकी एक विधान परिषद सदस्य विजयी झाल्याने तर २ शिक्षक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने या पाच जागांसाठीच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या निवडणूकीसाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून १ डिसेंबर २०२० रोजी मतदान होणार आहे. विधान परिषदेवर औरंगाबाद …
Read More »सुशांतसिंह प्रकरणी महिना झाला तरी ‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई? सीबीआय बिहारच्या आदर्श आचारसंहितेचे पालन करत आहे का? काँग्रेसचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या दुर्दैवी निधनावर काही मंडळींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास केला पण ते कोणत्याच निष्कर्षापर्यंत पोहचू शकले नाहीत. मुंबई पोलीस व कूपर रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालावर शंका उपस्थित करत एम्सकडे ते तपासासाठी पाठवण्यात आले पण सुशांतने आत्महत्याच केल्याचा अहवाल एम्सच्या पॅनलनेही दिला. या अहवालाला …
Read More »
Marathi e-Batmya