राजकारण

राफेलचे सत्य सर्वांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी आणि दीडपट हमीभाव देण्याचे शरद पवारांचे आश्वासन

बुलढाणा : प्रतिनिधी देशात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे सरकार बहुमताने सत्तेवर आल्यावर शेतकर्‍यांचा प्रश्न जसा तातडीने सोडवणार आहोत तसाच या राफेलची सखोल चौकशी करून यातील सत्य सर्वांसमोर आणल्याशिवाय राहणार नसल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथील जाहीर सभेत दिले. आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार …

Read More »

उमेदवारही भाड्याने आणावे लागणा-यांनी उपदेश देऊ नये १५ लाख, दीडपट हमीभाव, दरवर्षी दोन कोटी कोटी नोकऱ्यांचे काय ते सांगा? अशोक चव्हाण यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाला नांदेडात माझ्या विरोधात सक्षम उमेदवार मिळत नाही म्हणून त्यांना भाड्याने उमेदवार आणावा लागला. त्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांना नांदेडकरांना उपदेश देण्याचा नैतिक अधिकार नाही. नांदेडचा विकास कोणी केला? हे नांदेडच्या जनतेला माहित आहे. नांदेडकरांनी महापालिका निवडणुकीतही या भाड्याच्या नेतृत्वाचा दारूण पराभव केला आहे. त्याचीच पुनरावृत्ती लोकसभा निवडणुकीतही …

Read More »

रताळ्याला म्हणतंय केळं आणि दुसर्‍याच्याच लग्नात नाचतंय खुळं! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अशोक चव्हाण आणि राज ठाकरेंना टोला

नांदेड: प्रतिनिधी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नांदेड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक इतकी कठीण होते आहे की, त्यांना आता आपल्या प्रचारासाठी नेते आणि पक्षही किरायाने आणावे लागत आहेत, अशी जोरदार टीका आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोकर, नांदेड येथे केली आणि हे पक्ष आणि नेते आहेत तरी कोण तर ‘जे रताळ्याला म्हणतात केळं आणि दुसऱ्याच्या …

Read More »

अनिल अंबानींच्या उद्योगसमुहात सोनिया गांधीची गुंतवणूक भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांचा गौप्यस्फोट

मुंबई: प्रतिनिधी सोनिया गांधी यांनी अनिल अंबानी यांच्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्याचे त्यांच्या निवडणूक शपथपत्रात दिसते. रिलायन्स हायब्रिड बॉन्ड – जी या म्युच्युअल फंडात दोनवेळा १५,०३२ युनिट गुंतवणूक केल्याचे दिसते व त्याचे प्रत्येकी मूल्य ६,५५,६९५ रुपये आहे. शपथपत्रातील सातव्या पानावर ही माहिती आहे. राफेल विमान खरेदी प्रकरणात राहुल गांधी यांनी …

Read More »

राज ठाकरे यांच्या जाहिर प्रचारसभा कोणासाठी ? भाजपाचे मुख्य निवडणूक अधिका-यांना पत्र

मुंबई: प्रतिनिधी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या प्रचार सभा घेत आहेत. मनसेने लोकसभा निवडणुकीत पक्षाचा एकही अधिकृत उमेदवार उभा केला नाही. मग राज ठाकरे यांच्या जाहिर प्रचार सभा कोणासाठी आहेत आणि या जाहिर प्रचार सभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खर्चामध्ये दाखवायचा? यासंदर्भात राज्य निवडणुक आयोगाने स्पष्ट …

Read More »

मोदीजी, तुम्ही आमच्या राष्ट्रवादाला तर घाबरता राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादावर टिका करणाऱ्या मोदींवर मलिकांचा पलटवार

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवाद काढता परंतु मोदीजी याच राष्ट्रवादाला तर तुम्ही घाबरत आहात अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. तुमचा राष्ट्रवाद हा हेडगेवार, गोळवळकर गुरुजींचा सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे. यामध्ये एका विशेष वर्गाला, विशेष जातीच्या लोकांना स्थान आहे. इतर लोकांना स्थान नाही असे सांगतानाच …

Read More »

कमी मतदानाच्या टक्केवारीने सत्ताधारी-विरोधक काळजीत ५ टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान

मुंबईः प्रतिनिधी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील ९१ लोकसभा जागांकरीता गुरूवारी मतदान पार पडले. या ९१ पैकी महाराष्ट्रातील ७ जागांकरीताही मतदान झाले. मात्र या पहिल्या टप्प्यात ५५.९७ टक्के मतदान झाल्याने या कमी मतदानाचा फटका सत्ताधारी की विरोधकांना बसणार या चिंतेने महायुती आणि महाआघाडीतील राजकिय पक्षांना ग्रासले असल्याने पुढील ५ टप्प्यातील मतदानावेळी मतांची …

Read More »

भाजपच्या गोयल यांच्या युनायटेड फॉस्फरसच्या उपाध्यक्षा व्हीजेटीआयच्या अध्यक्ष काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा गौप्यस्फोट

मुंबईः प्रतिनिधी युनायटेड फॉस्फरस लि. कंपनीच्या कार्यालयात बेकायदेशीरपणे भाजपचे अवैध प्रचारसाहित्य बनवण्याचा काळा धंदा काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाच्या पथकाच्या उपस्थितीत उघडकीस आणली. त्यानंतर भाजपच्या पियुष गोयल यांचे बंधू प्रदीप गोयल यांच्या या कंपनीच्या उपाध्यक्षा सँड्रा आर. श्रॉफ यांची व्हीजेटीआयच्या अध्यक्ष पदी नियुक्ती केली. विशेष म्हणजे ही नियुक्ती भाजपचे सरकार आल्यानंतर …

Read More »

दुपारी १ वाजेपर्यंत ३० तर ३ वाजेपर्यंत ४६ टक्के मतदान लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात संथगतीने मतदान

मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सात मतदारसंघात आज सकाळी ७ पासून शांततेत मतदानास सुरूवात झाली. दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.१९ टक्के तर दुपारी ३ वाजेपर्यंत ४६. १३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. पहिल्या टप्प्यातील सात लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे मतदान …

Read More »

या सरकारचं आता फार झालं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची टीका

नाशिकः प्रतिनिधी या सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टाची किंमत नाही … मुलाबाळांच्या भवितव्याचा विचार नाही. बळीराजाला सन्मानाने जगण्याची संधी भाजप सरकार देत नाही.या सरकारचं आता फार झालं… अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारबद्दल संताप व्यक्त केला. महाआघाडीचे नाशिकचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ त्यावेळी ते बोलत होते. या …

Read More »