संसदेचे कामकाज सुरळीत चालवण्याची जबाबदारी ही सत्ताधारी पक्षाची असते. त्यांनी पुढाकार घेऊन चर्चा केली पाहिजे, पण दुर्दैवाने देशातील मायबाप जनतेला मला हे सांगावं लागेल की, यावेळी संसदेचं कामकाज सुरळीत चालवण्याची जबाबदारी पार पाडण्यात सरकार अपयशी ठरले असल्याचा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाला लगावला. …
Read More »राज ठाकरे यांचा इशारा, महाराष्ट्र द्वेष्टी पिलावळ वेळीच ठेचायला हवी कल्याण येथील अभिषेक शुक्लाने केलेल्या मारहाणीनंतर राज ठाकरे यांचा इशारा
कल्याणमध्ये एका मुजोर अमराठी माणसाने मराठी माणसाला, मराठीपणावरून अर्वाच्य शिव्या देत, जबर मारहाण केली. अशीच मुजोरी काही दिवसांपूर्वी गिरगावमध्ये एका अमराठी माणसाने दाखवली. तिकडे त्याला महाराष्ट्र सैनिकांनी जागच्या जागी प्रसाद दिला. कालच्या प्रकरणानंतर पण माझे महाराष्ट्र सैनिक कल्याणमध्ये प्रसाद द्यायला गेले होते. कल्याणच्या घटनेत कोणीतरी शुक्ला नावाचा माणूस होता, महाराष्ट्रात …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, डॉ आंबेडकरांच्या अपमानाचे पाप लपवण्यासाठी भाजपाचे फेक नॅरेटीव्ह भाजपाकडूनच राहुल गांधींविरोधात कुभांड, भाजपा सदस्यांनीच राहुल गांधींना अडवले
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेच्या प्रवेशद्वारावर धक्काबुक्की केल्याचा कोणताही व्हिडिओ नाही. गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याने देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. भाजपाच्या पोटात होते तेच ओठावर आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपाच्या मनात किती राग आहे ते उघड झाले. अमित शाहांचे …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा , बीड परभणीतील मृतांना १० लाख रूपयाची नुकसान भरपाई बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, तर परभणी प्रकरणात न्यायालयीन चौकशी
बीड, परभणी मधील घटना दुर्दैवी आहेत. या दोन्ही घटनांची सरकारने गंभीर दखल घेतली असून बीड जिल्ह्यातील हत्येच्या प्रकरणाची न्यायालयीन आणि एसआयटी अशी दुहेरी चौकशी केली जाईल. तर परभणी मधील संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले …
Read More »अजित पवार यांची ग्वाही, ‘तो’ अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला तरी कारवाई करणारच ‘कल्याण मारहाण’ घटनेची गंभीर दखल घेत विधानसभेत
कल्याणच्या योगीधाम सोसायटीत मराठी माणसावर झालेली मारहाण आणि अन्यायाच्या घटनेची गंभीर दखल घेत “महाराष्ट्र हा ‘शिव-शाहू-फुले आंबेडकरां’चा आहे. इथे कुणी मराठी माणसावर अन्याय करत असेल तर ते चालणार नाही. सभागृहात मांडण्यात आलेली माहिती तपासून मराठी माणसावर अन्याय करणारा ‘तो’ अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला, तरी त्याची गय केली जाणार नाही. …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही कल्याण प्रकरणाची राज्य शासनाकडून गंभीर दखल
कल्याण येथील सोसायटीमध्ये मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू आहे. मुंबई ही मराठी माणसांची अस्मिता आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केले. कल्याणमधील मराठी कुटुंबावर झालेल्या …
Read More »नाना पटोले यांचा इशारा, हल्ले करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानाचे पाप भाजपाला… काँग्रेस कार्यकर्ते जुलमी, अत्याचारी ब्रिटीशांना घाबरले नाहीत तर भाजपाच्या गुंडांना कशाला घाबरतील?
राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बदद्ल भारतीय जनता पक्षाच्या मनात काय भावना आहेत हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यातून दिसून आलेच आहे. बाबासाहेबांबद्दलचा आकस, चिड व संताप या विधानातून व्यक्त झाला आहे. भाजपा व अमित शाह यांनी बाबासाहेबांचा अपमान केल्याबद्दल माफी तर मागितली नाहीच उलट भाजपाच्या गुंडांनी मुंबई …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, डॉ आंबेडकरांना पराभूत करण्यात भाजपा-आरएसएसही अमित शाह यांना इशारा, आदरानेच बोला अन्यथा याद राखा
राज्यसभेत भाजपाचे नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमानकारक उल्लेख केला. त्याचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सीएसएमटी येथे मोठ्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा नेते अमित शाह यांना इशारा देत म्हणाले की, बाबासाहेबांबद्दल आदरानेच बोला …
Read More »मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारकडवाडी, ईव्हीएम मशिबाबत काय दिले उत्तर अधिवेशनानंतर पहिला हप्ता देणार मात्र त्यात कोणताही बदल नाही
विधानसभा निव़डणूकीनंतर राज्यात नव्याने स्थापना झालेल्या महायुती सरकारकडून मुंबईत विशेष घेतल्यानंतर पहिल्यांदाच नागपूरात हिवाळी अधिवेशन घेण्यात आलं. या अधिवेशनात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलेल्या अभिभाषणावर सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील सदस्यांनी आपापली भूमिका मांडली. त्यानंतर यावेळी बोलताना विरोधकांनी बहुचर्चित लाडकी बहिण योजना, बीड आणि परभणी येथील घटनांचा उल्लेख करत राज्य …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, परभणी व बीडमधील घटना पुरोगामी महाराष्ट्राच्या नावाला कलंक भाजपा युती सरकारच्या काळात गुंडाराज; महाराष्ट्रात फोफावलेल्या गुंडाराजचा अंत करा
परभणी व बीड जिल्ह्यात झालेल्या घटना ह्या पुरोगामी महाराष्ट्राला व संताच्या भूमीला कलंक लावणाऱ्या आहेत. शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचार संपवण्याचा हा प्रयत्न आहे. परभणीत पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सुर्यवंशी यांचा झालेला मृत्यू हा पोलिसांनी केलेली हत्या असून या हत्येप्रकरणी जबाबदार पोलिसांवर अद्याप कठोर कारवाई का केली नाही? राजकीय आशिर्वादाने महाराष्ट्रात …
Read More »
Marathi e-Batmya