राजकारण

गारपीट, अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करा

राज्यात मागील आठ दिवसांपासून निसर्गाचा कोप झाला आहे. यात मोठया प्रमाणात शेतकऱ्यांचे व शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे गारपीट व अवकाळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज २८९ अनव्ये सभागृहात उपस्थित केलेल्या मुद्द्याद्वारे केली. अंबादास दानवे म्हणाले की, राज्यातील …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, …नवाब मलिक देशद्रोही तर मिर्चीशी संबंधित प्रफुल्ल पटेल कोण?

माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे आहेत त्यांची साथ महायुतीत नको ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका दुटप्पीपणाची आहे. नवाब मलिक चालत नाहीत तर मग कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्चीशी संबंधीत प्रफुल्ल पटेल फडणवीसांना कसे चालतात? असा सवाल करुन फडणवीस यांचे देशप्रेम नकली आहे, अशा नकली देशप्रेमाची …

Read More »

मलिक यांच्याबाबत भाजपा ठाम; तर अजित पवार म्हणाले, बोलणं नाही…

राज्यातील २० वर्षे झालेल्या जमिनीच्या खरेदी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन मंत्री तथा आमदार नवाब मलिक यांना काही महिन्यांपूर्वीच जामीन मिळाला. त्यानंतर विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावत सत्ताधारी बाकावर जाऊन बसले. मात्र नवाब मलिक यांनी शरद पवार यांच्या समर्थक गटात प्रवेश केला की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात प्रवेश …

Read More »

निवासी आश्रमशाळांमधील २८२ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

राज्यात इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत एकूण ९७७ खासगी अनुदानित आश्रमशाळा चालविण्यात येतात. या आश्रमशाळांना शालेय पोषण, इमारत भाडे आणि वेतन अशा तीन भागात अनुदान देण्यात येत आहे. यावर्षी २२५ कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी आतापर्यंत १८० कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. या आश्रमशाळांमध्ये एकूण २ लाख २३ हजार विद्यार्थी शिक्षण …

Read More »

कर्जावरून नाना पटोले यांचा सवाल, पण शेतकऱ्यांनाच पैसे देण्यास टाळाटाळ का ?

राज्यातील शेतकरी मोठ्या संकटाला तोंड देत असताना राज्य सरकारची भूमिका मात्र वेळकाढूपणाची दिसत आहे. शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची परिस्थिती आली आहे. सरकार फक्त भरपूर दिले भरपूर दिले अशा घोषणा करते पण शेतकऱ्यांना काहीच मिळालेले नाही. सरकार सभागृहात चर्चा करण्यास तयार आहे तर मग चर्चा का घेत नाही. सभागृहात आज शेतकरी प्रश्नांवर …

Read More »

अजित पवार यांनी मांडल्या भाजपा सरकारच्या ५५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या

प्रथेप्रमाणे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज नागपूरात सुरुवात झाली. या अधिवेशनानंतर पुढील काही महिन्यात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभेच्या निवडणूका आणि त्यानंतर काही महिन्यातच विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्याच्या खर्चाचा अंदाज धरून उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी भाजपा सरकारच्या ५५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या …

Read More »

नाना पटोले यांची आरोप, … स्थगन प्रस्ताव नाकारणारे सरकार शेतकरी विरोधी

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्याची मदत अजून मिळालेली नाही आणि आता पुन्हा गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी काँग्रेस पक्षाने स्थगन प्रस्ताव दिला होता पण भाजपा सरकारने चर्चेपासून पळ काढला. केवळ भरपूर मदत दिली आहे असे म्हणून चर्चा टाळणे हा …

Read More »

सुषमा अंधारे यांचा फडणवीसांवर हल्लाबोल, सत्तेपेक्षा देश मोठा…आरोप केलेल्या नेत्यांना सत्तेत…

राज्यातील ज्या नेत्यावर देशद्रोहाचे आरोप केले. त्याच सत्ता येते जाते, देश मोठा असे सांगत त्या नेत्याला सत्तेत सामावून घेतल्याची उपरती झाल्यानेच ते अजित पवार यांना पत्र लिहीत आपल्यावर आलेली उपरती एकप्रकारे पत्रातून व्यक्त करत असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडीओ ट्विट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल, … सरकार असंवेदनशील

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असवेदनशील आहे, याचा प्रत्यय आज सभागृहात आला. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या प्रश्नांवर चर्चा करावी अशी मागणी विरोधकांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली. मात्र सरकारने चर्चा तर सोडा साधे निवेदन सुद्धा केले नाही, असा घनाघाती आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला, चहापानाच्या ऐवजी पान सुपारी…

पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांच्या निमित्ताने विरोधकांकडून वेगवेगळे दावे करण्यात येत होते. मात्र निवडणूकांचे निकाल लागताच विरोधी पक्षांच्या आघाडीतच फाटाफुट झाल्याचे दिसत आहे. वास्तविक पाहता हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधकांकडून सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला. मात्र चहापानाच्या कार्यक्रम हा चर्चा करण्यासाठी असतो. मात्र त्यांच्या पत्रकार परिषदेत काही जण झोपले होते. त्या झोपेतच हे …

Read More »