देशाला नव्हे, तर जगाला हेवा वाटावा, असा समृद्ध महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी राज्य शासन काम करीत आहे. या राज्यात कुणावरही अन्याय होणार नाही, याठिकाणी केवळ प्रगती नांदेल, ही काळजी शासन घेत आहे. संविधान सगे आणि राज्याची १३ कोटी जनता सोयरे असल्याच्या भावनेतून सर्वोत्तम महाराष्ट्र निर्माण होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आरोपावर रोहित पवार म्हणाले, महिलेला न्याय देण्यासाठी एक दोन वेळा फोन मंत्री जयकुमार गोरे प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आरोपावर केले भाष्य
काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या जयकुमार गोरे यांना महायुती सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री पदाचे बक्षिस देण्यात आले. दरम्यान, एका महिलेला जयकुमार गोरे यांनी पाठविलेल्या अर्धनग्न फोटोवरून राजकिय वाद रंगलेला असतानाच या प्रकरणाला आता ब्लॅकमेलिंगचे वळण मिळाले आहे. त्यातच या प्रकरणी आरोपीचा संबध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, शिंदेंचा सरकार, गृहविभागावर विश्वास नाही का? कुणाल कामराने कोणाचेही नाव घेतले नसताना एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी चिडून हल्ला करण्याचे कारण काय?
हास्यकलाकार कुणाल कामराने त्यांच्या कार्यक्रमात कोणाचेही नाव घेतले नाही तरीही ‘चोराच्या मनात चांदणे’ या म्हणीप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी ती टीका स्वतःवर ओढवून घेऊन तोडफोड केली. हल्ला करणारे सरकारमधील घटक पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्यांचा सरकार, संविधान, कायदा व गृहविभागावर विश्वास नाही का, त्यांना कायदा हातात का घेतला. शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी मांडलेला हा उच्छाद पाहून …
Read More »एकनाथ शिंदे यांना ‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार, विधानसभेत अभिंदनाचा प्रस्ताव सर्वसामान्यांचे दुःख दूर करणं हाच माझा धर्म
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील मानाचा आद्य जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज विधानसभेत अभिनंदन परस्पर मांडला. त्याला उपमुख्यमंत्री शिंदे उत्तर देत होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मला मिळालेला हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही. मला आणि माझ्या …
Read More »त्या गाण्यावरून उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया, कामराने अयोग्य केलं नाही शिवाजी महाराजांचा अपमान चालतो अन् गद्दारांचा अपमान चालत नाही
स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा हा त्यांच्या विडंबनात्मक कलेमुळे नेहमीच चर्चेत आला आहे. त्यातच आज कुणाल कामरा याचे महाराष्ट्रातील विद्यमान राजकिय परिस्थितीवर आधारीत आणि केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवरून एक गाणं काल रविवारी संध्याकीळ रिलीज झालं. त्यावरून राज्याच्या राजकारणात एकच घमासान निर्माण झालं आहे. तसेच राजकिय वर्तुळातही त्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या …
Read More »अखिलेश यादव यांचा सवाल, शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळच्या घटनेची माफी मागणार का? राजपूत शासक राणा सांगा, देशद्रोही, वक्तव्याचे अखिलेश यादव यांच्याकडून समर्थन
समाजवादी पक्षाचे खा रामजीलाल सुमन यांनी राज्यसभेत बोलताना राजपूत शासक राणा सांगा हा देशद्रोही असल्याचे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचे समर्थन समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी रविवारी समर्थन करत त्यांनी राजपूत शासक राणा सांगा यांना “देशद्रोही” म्हटले होते. अखिलेश यादव यांनी टीका फेटाळून लावत असा युक्तिवाद केला की जर …
Read More »जयराम रमेश यांचा आरोप, अल्पसंख्यांकांचे धार्मिक अधिकार कायमचा काढून घेण्याचा प्रयत्न परंपरागत अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न
काँग्रेसने रविवारी वक्फ (दुरुस्ती) विधेयकावर एक निवेदन जारी केले आणि म्हटले की हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा संविधानावर “आणखी एक हल्ला” असल्याचा आरोप केला. २७ फेब्रुवारी रोजी, केंद्रीय मंत्रिमंडळाने संसदेच्या संयुक्त समितीने प्रस्तावित केलेल्या सर्व १४ बदलांसह सुधारित वक्फ विधेयकाला मंजुरी दिली. काँग्रेस खासदार आणि संपर्क प्रभारी जयराम रमेश यांनी …
Read More »मुंबई ठाण्यातील रेल्वे प्रश्नी श्रीकांत शिंदे, नरेश मस्के यांनी घेतली रेल्वे मंत्र्यांची भेट रेल्वे प्रवाशांच्या अडचणी सोडविण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार करणार
मुंबई – ठाणे आणि उपनगरातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात, सेवेचा दर्जा अधिक वृध्दींगत व्हावा, या उद्देशाने कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन …
Read More »ईडीचा १० वर्षातील कन्व्हेशन दर माहित आहे का? फक्त १ टक्का काँग्रेसची ईडी आणि भाजपावर टीका
भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने मंगळवारी संसदेत सांगितले की अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) २०१५ पासून १० वर्षांत राजकीय नेत्यांविरुद्ध एकूण १९३ खटले दाखल केले आहेत. परंतु त्यापैकी फक्त दोन प्रकरणांमध्येच त्यांना शिक्षा झाली आहे, म्हणजेच शिक्षा होण्याचा दर सुमारे १% आहे. यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून टीका होत असून काँग्रेसने ईडीला “भाजपाचा आघाडी सहयोगी” …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून आरोग्य सेवेतील ६८० जणांना नियुक्ती पत्राचे वाटप शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत तसेच आयुर्वेद महाविद्यालयातील गट ड संवार्गातील निवड झालेल्यांना नियुक्ती पत्रे
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत तसेच आयुर्वेद महाविद्यालयासह संलग्न नऊ रुग्णालयातील गट ड संवर्गातील ६८० पदांची सरळसेवेने भरती करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. नियुक्त झालेल्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्यात. रुग्णालयातील रुग्णांना उत्तम सेवा देण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात गट …
Read More »
Marathi e-Batmya