भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सोमवारी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात रायगड जिल्ह्यातील पालीच्या माजी नगराध्यक्षा गीता पालरेचा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. गीता पालरेचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि भाजपा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आ. …
Read More »सुप्रिया सुळे म्हणाल्या, दोन्ही छत्रपतींनी भूमिका घेतलेली आहे त्यानुसार..
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकारण अद्यापही तापलेलं आहे. मात्र भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांकडून त्याचबरोबर शिंदे गटाकडूनही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावरील कारवाईची म्हणावी तशी मागणी होत नाही. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून मात्र राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या …
Read More »सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील नाराजांची नावे घेत राणे बंधूवर साधला निशाणा
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तास्थानी विराजमान होऊन जवळपास चार महिने झाले. या चार महिन्यात फक्त एकदाच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे शिंदे गटाबरोबर भाजपामधील अनेक आमदारांचे लक्ष्य लागलेले आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील अनेक आमदारांना पहिल्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही म्हणून आधीच नाराज आहेत. तसेच राज्यमंत्रीचीही अद्याप नियुक्ती झाली नाही. …
Read More »उध्दव ठाकरेंनी फडणवीसांचा व्हिडिओ ऐकवित म्हणाले, आता करून दाखवा
बुलढाण्यातील चिखली येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ उपस्थित जनसमुदायाला ऐकवित थेट आव्हान दिले. त्यावेळी मी तिकडे होतो, त्यावेळी तुम्ही इकडे होतात. आता मी इकडे आणि तुम्ही तिकडे आहात त्यामुळे तुम्ही एकदा करून दाखवाच आणि मध्य प्रदेशप्रमाणे शेतकऱ्यांची वीज माफी करू दाखवा …
Read More »राष्ट्रवादीची कृषी दिंडी म्हणजे ‘सौ चूहे खा के…
अनेक वर्षे विदर्भावर अन्याय करून आणि विदर्भातील शेतकऱ्याची उपेक्षा करून आता विदर्भात कृषी दिंडी काढायला निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा इरादा म्हणजे, ‘सौ चूहे खा के असा प्रकार आहे, अशी टीका प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अशी दिंडी काढावीच, म्हणजे वर्षानुवर्षे विदर्भातील शेतकऱ्यावर केलेल्या अन्यायाचा पाढा या नेत्यांच्या तोंडावर …
Read More »देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवार बोलल्यानंतर उध्दव ठाकरे…
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानावरून सध्या राज्यातलं राजकारण तापलेलं असताना त्यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यामुळे त्यात आणखी भर पडली आहे. या दोघांच्या वक्तव्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेंस आणि उध्दव ठाकरे यांची शिवसेना राज्यपाल कोश्यारी आणि भाजपावर तुटून पडलेले दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री …
Read More »महाविकास आघाडीने महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी घेतली का?
राज्यातून उद्योग बाहेर गेल्याची आवई उठवल्यानंतर आता ४४ खेडी कर्नाटकला दिली जाणार असल्याच्या धादांत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे का ? असा खडा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी उपस्थित केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या …
Read More »अजित पवारांचा गौप्यस्फोट, राज्यपाल म्हणाले मुझे अभी नही रहना है
ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने महामहिम राज्यपाल महोदयांना विचारांमधील अंधार दूर होऊ दे त्यांच्या वक्तव्यामधील गोंधळ संपू दे… राज्याच्या राज्यपालांना सद्बुद्धी लाभू दे अशी प्रार्थना सगळ्यांच्या साक्षीने अजित पवार यांनी आज केली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे काही वक्तव्य आपण सगळयांनी बघितले ते महाराष्ट्रातील, देशातील कुणालाही …
Read More »साई रिसॉर्टचे पाडलेच नाही ! आता परबांचे सोमय्यांना खुले आव्हान
शिवसेना-ठाकरे गटाचे आमदार अनिब परब यांच्याशी संबंधित रत्नागिरीतील दापोली येथील साई रिसॉर्टवर हातोडा पडणार असल्याचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून सातत्याने सांगितले जात होते. मात्र,सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे तूर्तास कथित साई रिसॉर्टचे पाडकाम होणार नसल्याचे सांगितले जात आहे. यावरून अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांनी खुले आव्हान दिले. याबाबत अधिक …
Read More »भाजपा म्हणते, त्या एका वक्तव्यावरून राज्यपालांना कोंडीत पकडू नका
भारतीय जनता पार्टीचे १८ कोटी कोट्यवधी कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन काम करतात व शिवरायांचे इतिहासातील महत्त्व कोणीही कमी करू शकत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना केले. यावेळी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची …
Read More »
Marathi e-Batmya