देशभरातील निवडणुकांचे निकाल काँग्रेस पक्षासाठी समाधानकारक आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने भाजपाचा पराभव करून विजयाची पताका फडकवली आहे. तर राजस्थान व छत्तिसगड विधानसभा पोट निवडणुकीतही काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. दिल्ली महानगरपालिका, हिमाचल प्रदेश व गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता होती पण आता फक्त गुजरातमध्येच त्यांना सत्ता राखता आली. निवडणूक निकालाने …
Read More »भाजपाने ६ मुख्यमंत्री, ७ खासदार, शेकडो नेते उतरवूनही हाती पराभव, मात्र आपची विजयी घौडदौड दिल्ली महापालिकेत आम आदमी पक्षाला १३४ तर भाजपाला १०४ जागा
मागील काही वर्षात भाजपाकडून प्रत्येक निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात येत आहे. त्यानुसार मागील १५ वर्षापासून हाती राखलेल्या दिल्ली महापालिकेची निवडणूकही भाजपाने प्रतिष्ठीत करत भाजपाशासित ६ राज्यांचे मुख्यमंत्री, ७ खासदार आणि शेकडो पदाधिकारी दिल्ली महापालिकेच्या निवडणूकीत उतरविले. मात्र आप अर्थात आम आदमी पार्टीने आपल्या कामाच्या आणि प्रचाराच्या जोरावर भाजपाला १०४ जागांवर रोखत …
Read More »नाना पटोलेंचा आरोप, सीमावाद उकरून काढून महाराष्ट्र तोडण्याचे भाजपाचे षडयंत्र ईडीचे सरकार महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात दळभद्री सरकार
सीमाभागात कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचे सरकार जाणीवपूर्वक वातावरण बिघडवत असून मराठी लोकांना मारहाण करुन त्यांच्या संपत्तीचे नुकसान केले जात आहे. महाराष्ट्राची जनता कर्नाटकची दादागिरी सहन करणार नाही, महाराष्ट्राने संयमाची भूमिका घेतली आहे पण आमचा संयम सुटला तर कर्नाटक व केंद्र सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देत सीमावाद उकरून …
Read More »भाजपाचा इशारा संजय राऊत, चिथावणी देणे बंद करा, अन्यथा संयम सुटेल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा
. संजय राऊत यांनी तुरुंगात शिकलेली षंढ, नामर्द अशी भाषा वापरून चिथावणी देणे आणि आव्हान देणे बंद केले पाहिजे, अन्यथा संयम सुटेल आणि भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरेल, असा खणखणीत इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिला. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर …
Read More »मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गप्प, मात्र शरद पवारांचा इशाराः ४८ तास नाही, तर कर्नाटकात येतो महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक केल्यानंतर शरद पवार यांनी दिला इशारा
मागील काही दिवसांपासून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून सातत्याने महाराष्ट्रातील गावांवर दावा करण्यात आलेला आहे. तसेच महाराष्ट्राला चिथविणारी वक्तव्ये केली जात आहेत. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी आपला कर्नाटकचा दौरा रद्द केला. त्यातच आज बेळगावातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांवर कर्नाटकात हल्ला करण्यात आला. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून …
Read More »कर्नाटकातील हल्ल्यानंतर शंभूराज देसाई म्हणाले, पंतप्रधान आणि अमित शाहच्या कानी घालणार महाराष्ट्र सांम्यजसाची भूमिका घेतेय
कर्नाटकच्या आगळीकीनंतरही राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून कर्नाटकबाबत चकार शब्द काढला जात नाही. आणि महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला झाल्यानंतरही किमान कर्नाटकला इशारा देण्याचे सोडाच उलट शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या कानावर घालणार असल्याचे वक्तव्य करत आपली चमडी बचावू भूमिका दाखविली आहे. चंद्रकांत पाटील आणि शंभूराज …
Read More »अजित पवार म्हणाले, आमच्या अडीच वर्षाच्या काळात असे कधी झाले नव्हते सीमा भागातील अनेक गावे आताच का बोलायला लागली
राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले. मात्र हे सरकारच आहे की नाही अशी अवस्था झाली आहे. या सरकारच्या काळात महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात असलेली गावे कधीही बोलत नव्हती. मात्र आता ती गावे कोण म्हणतं गुजरातला जातो, कोण म्हणतं तेलंगणात जातो म्हणतो, तर कोणी थेट कर्नाटकात जातो असे म्हणतंय. आमच्या अडीच वर्षाच्या काळात …
Read More »आशिष शेलार म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी सोबतचा संसार हाच सगळ्यात मोठा नेभळटपणा सामनाच्या अग्रलेखाला भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचे उत्तर
वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जे अभिवादन करायला तयार नाहीत, अशा काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत तडजोडीचा संसार हाच सगळ्यात मोठा नेभळटपणा नाही का? …असे म्हणत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी सामनातील अग्रलेखाला प्रतिउत्तर दिले आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, विरोधी पक्षाने नरसिंह होऊन खोके सरकारचा अंत करायला हवा, …
Read More »नाना पटोले म्हणाले, महाराजांचा अपमान करणे भाजपाचे नियोजित षडयंत्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर भाजपा कारवाई का करत नाही ?
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याची भारतीय जनता पक्षात चढाओढच लागल्याचे दिसत आहे. मागील महिनाभरात भाजपाच्या चार-पाच नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी वक्तव्ये केली आहेत. हे प्रकार अनवधानाने झालेले नसून भाजपाने छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करण्याचे जाणीवपूर्वक रचलेले षडयंत्र आहे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …
Read More »भाजपा म्हणते, उध्दव ठाकरे हे आंबेडकरच काय ओवैसींशीही युती करू शकतात पण जिंकेल भाजपा युतीच-प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकाश आंबेडकरच काय ओवैसी यांच्याशीसुद्धा युती करू शकतात, पण आमच्या विरोधात कोणी कितीही युती केली, तर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही एक्कावन्न टक्के मतांची लढाई लढून कोणत्याही निवडणुकीस कधीही सज्ज आहोत, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे …
Read More »
Marathi e-Batmya