Tag Archives: bjp

नाराज पंकजा मुंडेंच्या नाराजीवर गिरिष महाजन म्हणाले, एक तासापूर्वी फोन केला… मोठी जबाबदारी मिळेल

राज्यातील सत्तांतरानंतर तब्बल ४० दिवसानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र, भाजपात संधी न मिळाल्याने काही नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण दिसत आहे. त्यातच विधान परिषदेच्या निवडणूकीत, राज्यसभेच्या निवडणूकीत आणि राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे यांनी कदाचित माझी पात्रता नसेल असे वक्तव्य करत …

Read More »

भाजपा प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे तर मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी केली नेमणूक

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा जी यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. तसेच त्यांनी मुंबई भाजपा अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे मंत्री तथा मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे व आशिष शेलार यांचे अभिनंदन केले व त्यांना …

Read More »

दिपक केसरकर म्हणाले, चित्रा वाघ म्हणत असतील तर आणखी चौकशी होईल मंत्री संजय राठोड यांच्या मागणीवरून केला खुलासा

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या विस्तारात १८ जणांचा समावेश करण्यात आला. परंतु या १८ मध्ये पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या संजय राठोड यांचा समावेश करण्यात आल्याने भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली. या टीकेवरून आता शिंदे गटाचे मंत्री …

Read More »

अमोल मिटकरी यांचा रवि राणा यांना टोला, देवेंद्र चालिसा म्हणा… राज्य मंत्रिमंडळातील सहभागावरून लगावला टोला

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळात हनुमान चालिसावरून रान पेटविणारे रवि राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांचे भाजपाबरोबरील सख्य काही लपून राहिले नाही. तसेच हनुमान चालिसावरून उध्दव ठाकरे आणि शिवसेनेला जेरीस आणणाऱ्या रवि राणा यांचा या नव्या सरकारमध्ये समावेश होईल असे सांगण्यात येत असताना पहिल्या …

Read More »

“तिरंग्यावरही भाजपाचे नाव” काँग्रेसने फाडला “हर घर तिरंगा” घोषणेचा बुरखा परभणीतील व्हिडिओ जारी करत केली भाजपाने माफी मागावी केली मागणी

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त १५ ऑगस्टला हर घर तिरंगा या योजनेची घोषणा केली. या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी देशाच्या विविध भागात सर्वसामान्य नागरिकांना झेंडा खरेदी करण्यासाठी कशा पध्दतीची अडवणूक आणि छळवणूक करण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. त्यातच आता महाराष्ट्रात तिरंगा झेंड्यावर भाजपाचे नाव …

Read More »

पालकमंत्री, खाते वाटप रखडणार, १५ ऑगस्टला कोणता मंत्री कोठे झेंडा फडकाविणार? मुख्यमंत्री कार्यालयाकडून सर्वांना आदेश जारी

विरोधकांच्या सततच्या टीकेला घाबरून अखेर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने अखेर राज्य मंत्रिमंडळाचा पहिल्या टप्प्यातील विस्तार केला. या मंत्रिमंडळ विस्तारात २० जणांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. मात्र मंत्रिमंडळ विस्तार करूनही दोन दिवस होत आले तरी कोणाला कोणते खाते द्यायचे आणि कोणाला कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री नेमायचा याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

काळ्या कपड्यातील आंदोलनावरील मोदींच्या टीकेला राहुल गांधी यांचे प्रत्युत्तर काळे कपडे दिसले देशातली महागाई, बेरोजगारी दिसत नाही का?

नुकतेच काही दिवसांपूर्वी महागाईच्या विरोधात केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालून आंदोलन केले. या आंदोलनाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसने कितीही काळी जादू करण्याचा प्रयत्न केला तरी जनतेच्या मनात ते विश्वास निर्माण करू शकत नाही अशी टीका …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा अनेकदा दिल्ली दौरा पण राज्यासाठी… शिवसेनेने विरोधी पक्षनेता निवडण्यापूर्वी आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करायला पाहिजे होती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा दिल्ली वाऱ्या केल्या. मात्र महाराष्ट्रातील जनतेसाठी त्यांनी केंद्र सरकारकडे मदतीची काहीच मागणी केली नाही. जनतेला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतःचे मंत्रिमंडळ स्थापन करण्यात व्यस्त होते अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. विधान भवनातील विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »

मंत्री संजय राठोड यांचा चित्रा वाघ यांना इशारा, तर मी कायदेशीर मार्ग अवलंबणार चित्रा वाघ यांच्या टीकेनंतर राठोड यांचा इशारा

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या संजय राठोड यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रिमंडळातून नारळ देण्यात आला होता. त्यानंतर शिवसेनेत बंडाचे निशाण फडकावित एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या सहकार्याने सरकार स्थापन केले. मात्र या सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात संजय राठोड यांचा समावेश करताच भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्या …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, भाजपाच्या ‘हर घर तिरंगा’ इव्हेंटसाठी चीनमधून तिरंगा नाना पटोले यांची बुलढाणा जिल्ह्यात तर बाळासाहेब थोरात यांची धुळ्यात आझादी गौरव पदयात्रा

अत्याचारी ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी मोठा व प्रदिर्घ लढा द्यावा लागला. काँग्रेसच्या झेंड्याखाली देश एकवटला आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या काँग्रेस विचाराने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे काहीही योगदान नाही ते लोक आज ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या नावाखाली इव्हेंटबाजी करत आहेत. या इव्हेंटबाजीसाठी चीनमधून तिरंगा झेंड्यांची …

Read More »