Tag Archives: bjp

बिनविरोध निवडणूकीचे ठरलेले असताना मग दोघांचे अर्ज का? भाजपाच्या दोन उमेदवारांचे अर्ज आणि मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना फोन

मुंबई: विशेष प्रतिनिधी विधान परिषदेच्या ९ जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये बिनविरोध निवडणूक घडवून आणण्यासाठी ठरलेले आहे. मात्र आज सोमवारी भाजपाच्या दोन डमी उमेदवारांनी अर्ज भरताच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन करत आपले बिनविरोध निवडणूकीचे ठरलेले असताना दोन उमेदवारांचे अर्ज कशासाठी? असा सवाल केल्याची …

Read More »

९ जागांसाठी १४ उमेदवारांचे अर्ज दाखल : पण निवडणूक बिनविरोध होणार खबरदारी म्हणून भाजपा, राष्ट्रवादीकडून प्रत्येकी २ जणांचे जास्तीचे अर्ज : १ अपक्ष रिंगणात

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह १० उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले. नामनिर्देशन दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवसापर्यंत एकूण १४ उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने दिली. या निवडणूकीत जरी १४ उमेदवारांनी आपले अर्ज भरले तरी यापैकी भाजपा आणि …

Read More »

शेलारांच्या तक्रारीनंतर तब्बल १० व्या दिवशी शिक्षण विभागाला जाग फि वाढ न करण्याचे सर्व शाळांना आदेश

मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे सर्वच आर्थिक व्यवहार बंद आहेत. त्यामुळे अनेक शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. तरीही मुंबईसह राज्यातील अनेक शाळांनी परस्पर फि वाढविण्यास सुरुवात केल्याची तक्रार माजी शिक्षण मंत्री अॅड.आशिष शेलार यांनी विद्यमान शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याकडे २९ एप्रिल २०२० रोजी करत निदर्शनास आणून …

Read More »

मुख्यमंत्री, महसूलमंत्री: साहेबराव गायकवाड यांच्या दुर्दैवी मृत्यूची सीआयडी चौकशी करा महाराष्ट्र भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड ह्यांच्या अकस्मिक मृत्यूची सी. आय. डी. मार्फत चौकशी झाली पाहिजे त्याचप्रमाणे कै. गायकवाड यांची अवघ्या पाच महिन्यांच्या आत बदली करण्याचा आदेश कोणाच्या सहीने निघाला, ती माहिती जनतेसमोर आली पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी शुक्रवारी केली. …

Read More »

गृहमंत्री देशमुख, रेल्वे तिकिटांची विक्री नसताना मजूरांकडून पैसे कोण घेतय? जनतेची शंका दूर करण्याची भाजपा प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी एक व्हिडिओ जारी करून केंद्र सरकारवर टीका केली व रेल्वेने कामगारांकडून तिकिटाचे पैसे घेऊ नयेत अशी मागणी केली. या संदर्भात माधव भांडारी म्हणाले की, अनिल देशमुख जनतेची दिशाभूल करत आहेत. लॉकडाऊनमुळे रेल्वेगाड्यांची प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक …

Read More »

चक्क विरोधी पक्षनेते फडणवीसांना एनकांऊटरच्या धमक्या भाजपाकडून राज्यभरातल्या आयुक्तांना निवेदन

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यात गेले काही दिवस कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असुन यासंबंधीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज राज्यभर पोलिस आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. गेले काही दिवस राज्यांत माध्यमांची गळचेपी होत असून, समाज माध्यमांवर सरकार विरोधात व्यक्त होणाऱ्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. राज्याचे …

Read More »

आमदारांनो तुमच्या लक्षवेधी, तारांकित प्रश्न पाठवा, पण ऑनलाईन विधानमंडळाकडून अधिवेशनासाठी सदस्यांना पत्र

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाचे संकट असले तरी विधिमंडळाकडून कायदेशीर गोष्टींची पूर्तता करण्यासाठी तसेच आगामी पावसाळी अधिवेशन तयारीचा भाग म्हणून विधान परिषदच्या आमदारांना तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना आदी गोष्टी विधानमंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने पाठविण्याची विनंती केली. तसेच ही प्रश्न, लक्षवेधी ११ मे रोजी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यतच पाठविण्यास सांगितले. महाराष्ट्र विधानपरिषद …

Read More »

फडणवीस सरकारने केली महाराष्ट्राची घोर फसवणूक! काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुजरात राज्याला पुढे आणण्याचा अट्टाहास लपून राहिलेला नाही. देशाचे पंतप्रधान सर्व राज्यांकडे समदृष्टीने पाहत नाहीत हे स्पष्ट आहे. परंतु गुजरातचे महत्त्व वाढण्याकरीता महाराष्ट्राच्या हितांना मुठमाती देण्याइतपत तत्कालीन फडणवीस सरकारची मजल जाईल असे कधीच वाटले नव्हते. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईत प्रस्तावित असताना ते गुजरातला …

Read More »

मुख्यमंत्र्यांसह महा आघाडीचे ५ आणि भाजपाचे ४ उमेदवार रिंगणात काँग्रेसमधून खान, सावंत, हुसेन तर भाजपातून तावडे, मुंडे यांच्या नावाची चर्चा

मुंबई: प्रतिनिधी राज्यात राजकिय स्थिरता आणण्याच्या उद्देशाने विधान परिषदेची निवडणूक घेण्याचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. या निवडणूकीत शिवसेनेकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विद्यमान उपसभापती अॅड.नीलम गोऱ्हे यांची नावे निश्चित सांगण्यात येत आहेत. तर काँग्रेसकडून दोन उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक असे पाच उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. भाजपाकडून चार …

Read More »

राज्यातील सर्वांवर मोफत उपचार : खाजगी रूग्णालयांच्या मनमानीस लगाम महाराष्ट्र दिनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची जनतेला आरोग्यदायी भेट

मुंबई: प्रतिनिधी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील १०० टक्के जनतेला मोफत आरोग्य उपचार देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज महाराष्ट्र दिनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहिर करत राज्यातील नागरिकांना मोफत व कॅशलेस विमा संरक्षण देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे त्यांनी जाहीर केले. दरम्यान, कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना मुंबईतील काही …

Read More »