Tag Archives: bjp

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना सर्व माफ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खास सवलत

मुंबईः प्रतिनिधी राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन आज पार पडले. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे हे पहिलेच अधिवेशन असल्याने त्यांना सर्व गोष्टी माफ असून त्यांनी किमान पुढील अधिवेशनात चर्चांना उत्तरे द्यावीत अशी अपेक्षा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. अर्थसंकल्पिय अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर मंत्रालय व विधिमंडळात आयोजित पत्रकार परिषदेत ते …

Read More »

राष्ट्रवादी- शिवसेना म्हणाली, दूषित वातावरण होतेय भाजपाने बोलू नये एनपीआर, सीएएच्या कायद्यावरून विधानसभेत रणकंदन

मुंबईः विशेष प्रतिनिधी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या एनपीआर आणि सीएए कायद्यामुळे राज्यातील कोणाचेही नागरिकत्व जाणार नाही. मात्र याबाबतच्या अफवा राज्याच्या मंत्र्यांकडूनच पसरविल्या जात असल्याने याप्रश्नी गृह विभागाने लक्ष घालण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यात माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोन मंत्र्यांच्या नावाचा उल्लेख करून त्यांना बोलू न …

Read More »

छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली विमानतळाला संभाजी महाराजांचे तर मुंबई सेंट्रलला नाना शंकरशेठ यांचे नाव

मुंबईः विशेष प्रतिनिधी औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचा निर्णय १९९३ साली युती सरकारने घेतला होता. त्यानंतर आता शिवसेना सत्तेच्या प्रमुखस्थानी असतानाही शहराचे नामांतर संभाजीनगर न करता केवळ औरंगाबादच्या विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज नामांतर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्यावतीने विधानसभेत मांडण्यात आला. हा प्रस्ताव एकमाताने पारीत झाल्यानंतर भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या …

Read More »

आता आमदारांच्या वाहन कर्जावरील व्याज सरकार भरणार अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील आमदारांच्या खाजगी वाहनावरील ड्रायव्हरच्या वेतनात वाढ करत त्याचा खर्च सरकारी तिजोरीतून देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आमदारांना नवे वाहन खरेदी करण्यासाठी ३० लाख रूपयांपर्यंतचा निधी वाढविण्यात आला असून त्यावरील व्याजाची रक्कम सरकार भरेल अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली. विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी वरील …

Read More »

अर्थमंत्री पवारांकडून फक्त राजकियच उत्तर माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांकडून प्रश्नांचा भडीमार

मुंबईः विशेष प्रतिनिधी अर्थसंकल्पावर अनेक सदस्यांनी आपली मते मांडली. या मतांची दखल घेत अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे मुद्दे मांडणे अपेक्षित होते. मात्र त्यांच्या चर्चेवरील उत्तरात फक्त राजकिय मुद्यांचीच उत्तरे असल्याची टीका माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी करत पवार यांच्या भाषणाने भ्रमनिरास झाल्याचे सांगत भाजपाच्या सदस्यांनी सभात्याग …

Read More »

चार दिवस सुनेचेही येतात… त्यामुळे चुकीला माफी नाही फडणवीस, मुनगंटीवारांवर अजित पवारांचा पलटवार

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील सत्तेवर कधी समोरचे येतात तर सत्तेतले कधी समोर जातात. त्यामुळे सत्तेत यायची कधी संधी मिळाली तर असे पुन्हा वागू नका असा उपरोधिक सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देत सासूचे चार दिवस असले तरी सूनेचे चार दिवस येतात अशी कोपरखळी लगावत सुधीर …

Read More »

सरकार पडण्यावर शरद पवार म्हणाले, शिमगा संपला ना आता? राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा भाजपाला टोला

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडव्या आधी पडणार असल्याचे भाकित भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या वक्तव्याला २४ तास ही उलटत नाही, तोच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतित्तुर देत म्हणाले की, शिमगा संपला ना? माझ्या माहितीप्रमाणे कालच झाल्याचा उपरोधिक टोला भाजपा नेत्यांना लगावत राज्यातील सरकार पाच वर्षाचा कार्यकाल …

Read More »

अजित पवारांच्या मनात आजही फडणवीसच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मागितली माफी

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर त्यावरील चर्चा सुरु करण्यासंदर्भात आज दुपारी विधानसभेत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चर्चा होती. त्यावेळी अजित पवार यांनी अनावधाने फडणवीस यांचा उल्लेख विरोधी पक्षनेते असा करण्याऐवजी मुख्यमंत्री असा केला. मात्र लगेच आपली चूक …

Read More »

राज ठाकरेंना पडला प्रश्न सततच्या पराभवातून आलेली उद्विग्नता पडली बाहेर

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात स्पष्ट वक्ता, अचूक टायमिंग साधणारा नेता म्हणून मनसे प्रमुख राज ठाकरे यांची ओळख आहे. मात्र गेल्या ९ वर्षापासून राज ठाकरे अर्थात मनसे पक्षाला विधानसभा, लोकसभा आणि महानगरपालिकांमध्ये सपाटून मार खावा लागत आहे. त्यामुळे या पराभवाबद्दलची उद्विग्नता पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी व्यक्त करत मतदानाच्यावेळी लोक जातात …

Read More »

ब्लॅकमेलिंगसाठी आरटीआयचा वापर नको स्थापन करतानाच मनसे प्रमुख राज ठाकरेंची तंबी

नवी मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढण्यासाठी शॅडो कॅबिनेटची स्थापना मनसेकडून १४ व्या वर्धापन दिनाच्या औचित्य साधून केली. मात्र या स्थापनेच्यावेळीच सरकारच्या निर्णयाची माहीती घेताना ब्लॅकमेलिंगसाठी शॅडो कॅबिनेटमधील सदस्यांनी आरटीआयचा वापर करू नये असा सज्ज़ दम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला. नवी मुंबई येथे पक्षाच्या १४ …

Read More »