मुंबईः प्रतिनिधी राज्यातील निवडणूकांचे निकाल जाहीर होत असताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पहिलीच पत्रकार परिषद घेत सरकार स्थापनेसाठी सर्व मार्ग खुले असल्याचे जाहीर केले. त्याचा सर्वात मोठा धक्का आम्हाला बसला. त्यांना अनेकवेळा मी स्वतः फोन केला. पण त्यांनी तो स्विकारला नाही. तसेच अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाबाबत माझ्यासमोर चर्चा झालीच …
Read More »अखेर पदाचा राजीनामा….पण पुढचे सरकार भाजपाच्या नेतृत्वाखालील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीत राज्यातील जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखविला. परंतु निवडणूकीला महायुती म्हणून सामोरे जावूनही शिवसेनेने चर्चेची दारे बंद केली. त्यामुळे कठीण परिस्थिती असतानाही राज्य सरकार स्थापन करता आले नसल्याची खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत कार्यकाल संपत आल्याने राजीनामा राज्यपालांना सादर केला आहे. राज्यात नव्या निवडणूका होणे …
Read More »जर भाजपा शब्द पाळत नसेल तर मी माझ्या भूमिकेवर ठाम शिवसेना पक्षप्रमुख उध्द ठाकरे यांचे वक्तव्य
मुंबईः प्रतिनिधी युती मला तोडायची नाही. तसेच ती तुटावी म्हणून कोणतेही पाऊल उचलणार नाही. परंतु भाजपा जर दिलेला शब्द पाळत नसेल तर मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगत एकप्रकारे मुख्यमंत्री शिवसेनेचाच यावर आज शिक्कामोर्तब केले. वांद्रे येथील मातोश्री या निवासस्थानी शिवसेना आमदारांच्या बोलाविलेल्या बैठकीत ते …
Read More »कोणतीही भूमिका ठाम भूमिका न घेता भाजपाने राज्यपालांची घेतली भेट चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार, महाजन, शेलारांचे शिष्टमंडळ भेटले
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेसंदर्भात राज्यपालांकडे दावा करण्याऐवजी एकंदरच निर्माण झालेल्या राजकिय परिस्थितीची माहिती भाजपाच्या शिष्टमंडळाने दिली. तसेच या परिस्थितीतून मार्ग काढण्याची विनंती भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांना राजकिय परिस्थितीची माहिती दिल्याचे भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्यपालांच्या भेटीसाठी सुधीर मुनगंटीवार, …
Read More »शिवसेनेची वाट पहात भाजपा राज्यपालांना भेटणार सरकार स्थापनेची चर्चा करण्यासाठी राजभवनावर जाणार असल्याची मुनगंटीवारांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील जनतेने दिलेल्या जनादेशाप्रमाणे राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होणार आहे. मात्र अद्याप शिवसेनेनेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. तरीही आम्ही मुख्यमंत्र्यांच्यावतीने गुरूवारी राज्यपालांची भेट घेवून सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राज्यातील भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. याबैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरिष …
Read More »अमित शाहंच्या त्या कौशल्याची आम्हीही वाट पाहतोय शरद पवारांची मिश्किल टिपण्णी
मुंबईः प्रतिनिधी कोणत्याही राज्यात निवडणूका झाल्या की, तेथे जर भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही, तर भाजपाध्यक्ष अमित शाह हे सरकार स्थापन करून दाखवतात. आम्हीही त्यांच्या या कौशल्याची वाट पाहतोय अशी कोपरखळी वजा टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. नवी दिल्लीतील पोलिसांनी काढलेल्या मोर्च्यावर देशातील कायदा व सुव्यवस्थेबाबत पक्षाची …
Read More »भाजपा-शिवसेनेचे शेवटच्या २४ पैकी २३ तास झाले तरी काहीही घडेल राष्ट्रवादी काँग्रेसच सर्वेसर्वा शरद पवार यांचे स्पष्ट संकेत
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणूकीत जनतेने भाजपा-शिवसेनेच्या पारड्यात मतांचे पारडे टाकले आहे. तरीही त्यांच्याकडून अद्याप सरकार स्थापन केले जात नाही. मात्र त्यांना दिलेल्या मुदतीतील २४ तासापैकी २३ तास झालेले असतील तरी त्या शेवटच्या तासात कोणता तरी मार्ग निघेल अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त करत राज्यातील संभाव्य …
Read More »केंद्रीय मंत्री गडकरींच्या मध्यस्थीने मातोश्रीशी बोलणी होणार उध्दव ठाकरे यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याचे प्रयत्न
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेला राजकिय घोळावर तोडगा काढण्यासाठी भाजपाने पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मध्यस्थी मार्फत बोलणी करण्याच्या हालचाली भाजपाकडून करण्यात येत असल्याची माहिती भाजपामधील विश्वसनीय सूत्रांनी दिली. विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहीर होवून १२ दिवस उलटून …
Read More »कधीही आनंदाची बातमी जाहीर होईल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेल्या गोंधळावर भाजपाकडून पहिल्यादांच आपली भूमिका जाहीर करत कधीही आनंदाची बातमी जाहीर होणार असल्याचे सांगत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेशी चर्चा करण्याची तयारी असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच राज्यातील सरकार हे देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली स्थापन होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष …
Read More »मंत्री राम शिंदें पक्षश्रेष्ठींना म्हणाले विखे-पाटीलांना मंत्री करू नका सरकार स्थापन होण्यापूर्वीच भाजपातर्गंत वातावरण तापले
मुंबईः खंडूराज गायकवाड भाजपला सत्ता स्थापन करायला एकीकडे अद्याप मुहूर्त मिळत नसताना दुसरीकडे मात्र पक्षांतर्गत बंडाळीमुळे सध्या भाजपातर्गंत राजकारण जोरदार तापले आहे. अहमदनगर जिल्ह्यावर आपल्याशिवाय कोणाची पकड निर्माण होवू नये यासाठी भाजपाचे पराभूत मंत्री राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे- पाटील यांनाच मंत्रिमंडळात घेवू नये अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करत त्यासाठी जोरदार …
Read More »
Marathi e-Batmya