मुंबई: प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने भारतीय जनता पक्षाकडून सर्व हातखंडे वापरले जात आहेत. भिवंडीमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूमबाहेर होमहवन, जादूटोणा करण्याचा प्रकार हा त्यातलचा एक आहे. भाजपच्या कोणत्या नेत्याच्या सांगण्यावरून जादूटोणा करणात आला? असा सवाल उपस्थित करत याची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते …
Read More »पराभवाच्या नैराश्याने ग्रासल्यामुळे भाजपकडून बेछूट विधाने माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह विधानाचा प्रदेश काँग्रेसकडून निषेध
मुंबई : प्रतिनिधी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले विधान आक्षेपार्ह व निंदनीय आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभव स्पष्टपणे दिसू लागल्याने भाजपला नैराश्याने ग्रासले असून, त्यामुळे त्यांची प्रचाराची पातळी खालावून बेछूट, बेताल विधाने केली जात असल्याचे टीकास्त्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी …
Read More »दानवेंच्या जावयासाठी नव्हे तर शिवसेनेच्या उमेदवारासाठी भाजपचे प्रयत्न भाजप प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांचा खुलासा
मुंबईः प्रतिनिधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई तथा शिवसेनेचे बंडखोर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विजयासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केले नाही तर शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विजयासाठी प्रयत्न केल्याचा खुलासा भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी केला. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांच्या विजयासाठी …
Read More »वंचित आघाडी कोणाला वंचित करणार ? आघाडीबरोबरच युतीलाही घोर
मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीसाठी राज्यात चार टप्प्यात मतदान झाले. मात्र या चारही टप्प्यात वंचित आघाडीच्या झंझावाती प्रचारसभेला मिळालेला प्रतिसाद आणि जनमानसांचा कल झुकल्याने प्रस्थापित भाजपा-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला वंचित करणार की वंचित स्थापित होणार यावरून जनमानसांबरोबरच राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात वंचित आघाडीने आपले उमेदवार …
Read More »पश्चिम-उत्तर महाराष्ट्र, विदर्भात आम्हीच येणार नाही तर राजीनामा देणार भाजपच्या मंत्र्यांकडून पैज
मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीसाठी राज्यात शेवटच्या टप्प्यात मतदान नुकतेच पार पडले. या चारही टप्प्यात राज्यातील जनतेमध्ये सत्ताधारी भाजप-सेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीबाबत जनतेमध्ये समिश्र चर्चा झडत होत्या. त्यामुळे २३ मे रोजी लागणारे निकाल काय असतील याबाबत आतापासूनच उत्सुकता असली तरी राज्य सरकारमधील भाजप मंत्री आतापासूनच महाराष्ट्रात सर्वाधिक जागा भाजपच्या …
Read More »मुंडे स्मारकावरून एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न सरकार टाळाटाळ करत असल्याचा भगवान महासंघाचा आरोप
औरंगाबाद : प्रतिनिधी लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी औरंगाबादमध्ये जागा आणि निधी देऊन देखील सरकार हेतुपूरस्पर टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष सचिन डोईफोडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. गोपीनाथ मुंडे यांचे शहरात भव्य स्मारक व्हावे आणि त्यातून …
Read More »मोदींचा अर्ज भरायला उध्दव गेले, पण दिसले का हो ? राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यात हरवली शिवसेना
मुंबईः प्रतिनिधी केंद्रात पुन्हा एकदा फिर एक बार मोदी सरकारचा नारा देत भाजपाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीपासून दुरावलेल्या सर्व घटक पक्षांना जवळ करण्याचा प्रयत्न केला. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीतील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रालोआतील सर्व नेत्यांना बोलावले. मात्र या गर्दीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे काही दिसले …
Read More »भाजपाने सीबीआयला सर्वे एजन्सी बनवलेय का? काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा सवाल
मुंबईः प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीने सीबीआय सारख्या महत्वाच्या स्वायत्त संस्थेला निवडणुकीतील ओपीनियन पोल सारखे सर्वे करण्याची एजन्सी बनवली आहे का ? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून आपण दोन लाख साठ हजारांच्या मताधिक्क्याने विजयी होऊ असा सीबीआयचा अहवाल …
Read More »नरेंद्र मोदी जुन्याच आश्वासनांवर निवडणूक लढवतायत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची टीका
पुणे – तळेगाव दाभाडेः प्रतिनिधी गेली ५ वर्षे नरेंद्र मोदींचं राज्य आपण बघितलं, मोदींनी सांगितले होते उद्योगधंदा वाढवेन… रोजगार देईन…अनेक आश्वासन त्यांनी दिली. लोकांनी याच आधारावर भाजपला बहुमत दिले. बहुमत असेल तर कोणतेही निर्णय घेता येतात. त्यामुळे मोदी यांनी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होईल असे वाटले होते. परंतु ही निवडणुकही भाजपला …
Read More »राज ठाकरे आणि शरद पवार यांचे स्क्रिप्ट सेम टु सेम शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषा सेम टु सेम आहे. त्यामुळे राज ठाकरे कोणाच्या स्क्रिप्टनुसार सध्या भाषणे करीत आहेत हे आता वेगळे सांगायची गरज नसल्याची टीका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली. शरद व पवार व राज ठाकरे यांच्या वेगवेगळ्या …
Read More »
Marathi e-Batmya