Editor

संभाजीराजेंनी सोडले भाजपाला, केल्या या दोन घोषणा 'स्वराज्य' संघटनेची स्थापना, स्वतंत्र राजकिय वाटचाल करणार

भाजपाचे सहयोगी सदस्य म्हणून राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्त केलेले माजी खासदार संभाजी राजे यांनी आज मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नसल्याचे सांगत स्वराज्य या नव्या संघटनेची स्थापना केल्याचे जाहीर करत या संघटनेच्या माध्यमातून राजकारणात उतरणार असल्याचे जाहीर केले. काही दिवसांपूर्वी खासदार संभाजी राजे यांनी १२ मे रोजी आपली भूमिका …

Read More »

नाना पटोले म्हणाले, राष्ट्रवादीकडून काँग्रेसच्या पाठीत सुरा खुपसला राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा दिल्याने राजकिय आरोपांना सुरुवात

नुकत्याच झालेल्या भंडारा आणि गोंदियाच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत आघाडीच्या धर्माला तिलांजली देत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पाठिंबा दिल्याने सर्वाधिक संख्याबळ असूनही काँग्रेसला विरोधात बसावे लागले. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधत राष्ट्रवादीने काँग्रेसच्या पाठित सुरा खुपसल्याचा आरोप ट्विट करत केला. विशेष म्हणजे …

Read More »

मनसे प्रमुख राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकीः सुरक्षेची मागणी गृहमंत्र्यांकडे सुरक्षा देण्याची मागणी

सध्या भोंग्याच्या प्रश्नावरून चर्चेत आलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आज एका पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी देत पत्रात उर्दू शब्दांचा वापर करण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे राज ठाकरे यांना राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने सुरक्षा पुरवावी अशी मागणी करत यासंदर्भातील तक्रार आज राज्याचे …

Read More »

“या” शेतपीकांच्या उत्पादनाच्या वाढीसाठी राज्य सरकार देणार एक हजार कोटी कापूस, सोयाबीन उत्पादन वाढविण्यासाठी विशेष कृती योजना

कापूस आणि सोयाबीनची उत्पादकता वाढविण्याच्या विशेष कृती योजनेस तीन वर्षात एक हजार कोटी निधी देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या विशेष कृती योजनेच्या अंमलबजावणीसाठी कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात येणार आहे. राज्यातील कापूस पिकाखाली ४२ लाख हेक्टर व सोयाबीन पिकाखाली …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णयः योजनेचा लाभार्थी होणार आधार कार्डशी कनेक्ट वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थींपर्यंत पोहचविण्यासाठी आधार कार्डशी जोडणार

राज्य शासनाचे विविध लाभ, सवलती व शिष्यवृत्तीच्या योजना राबवितांना राज्यातील एकही पात्र लाभार्थी या योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून सर्व लाभार्थींची नावे ३० डिसेंबर २०२२ पर्यंत आधार कार्डशी जोडण्याची प्रक्रीया अनिवार्य करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या संदर्भात राज्याच्या नुकत्याच …

Read More »

वंचितने पाठविली राज्य निवडणूक आयोगाला नोटीस “न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होता कामा नये”, वंचित बहुजन आघाडीने बजावली कायदेशीर नोटीस  

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगास दिलेल्या आदेशानुसार पूर्वीच्या प्रभाग रचनेनुसार २ आठवड्यांच्या आत राज्यातील साधारण २४८६ स्थानिक स्वराज्य संस्थाचा निवडूक कार्यक्रम जाहीर करणे आवश्यक होते. मात्र राज्य निवडणूक आयोगाने या आदेशाचा चुकीचा अर्थ लावत ५ मे रोजी एक परिपत्रक काढून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांना प्रभाग रचनेचे कामकाज नव्याने सूरू …

Read More »

पेरा वाढण्याची शक्यता गृहीत धरून बियाणांची उपलब्धता वाढवा - कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

राज्यातील शेतकरी बांधवांना खरीप हंगाम-२०२२ मध्ये दर्जेदार, प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा करावा, बियाण्यांची उपलब्धता, पुरवठा सुरळीत व्हावा, सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता गृहीत धरून सोयाबीनच्या बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत नियोजन करावे, तेलबियांच्या बियाणांची उपलब्धता वाढवावी, योजनांच्या माध्यमातून उभ्या केलेल्या बीज प्रकल्पांना गती द्यावी, कोणत्याही शेतकरी बांधवांची तक्रार येऊ नये यासाठी काटेकोर नियोजन करावे, असे …

Read More »

सामाजिक न्याय मंत्री मुंडे, शिक्षणमंत्री गायकवाड, राज्यमंत्री डॉ. कदम यांनी केली इंदू मिल स्मारकाची पाहणी इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक निर्धारित वेळेत पूर्ण होईल - धनंजय मुंडे

दादर येथील इंदूमिल परिसरात उभारण्यात येत असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक निर्धारित वेळेत व अत्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा काम करीत आहेत. या शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी आवश्यक निधी देखील उपलब्ध करून देण्यात असून, मार्च २०२४ पर्यंत या स्मारकाचे काम पूर्ण करणे अपेक्षित असल्याचे सामाजिक …

Read More »

आधारभूत किंमतीनुसार हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांनी १७ मे पर्यंत नोंदणी करा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन

किमान आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी आतापर्यंत ४ लाख ९४ हजार ३९९ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. मार्चपासून आजतागायत ५०.८४ लाख क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला असून, उद्दीष्टपूर्तीसाठी दि. १७ मे २०२२ पर्यंत नोंदणीची तारीख अंतिम करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले …

Read More »

बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधीः ग्रामीण डाक सेवक पदासाठी ५ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन ६७ रिक्त पदे भरली जाणार

भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून अधीक्षक, डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील ६७ रिक्त पदे भरली जाणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ५ जून २०२२ पर्यंत व त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरावेत असे आवाहन वरिष्ठ अधीक्षक, डाकघर, नवी …

Read More »