Editor

उस्ताद झाकीर हुसेन आणि शशिकांत गरवारे यांना मुंबई विद्यापीठाकडून एल.एल.डी. व डी. लिटने सन्मानित राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठाकडून पदवी बहाल

जागतिक कीर्तीचे तबलावादक पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन व प्रसिध्द उद्योजक शशिकांत गरवारे यांना मुंबई विद्यापीठाने मानद एल.एल.डी. व डी. लिट. पदवी देऊन सन्मान केला, हे अत्यंत अभिनंदनीय असून अशा सन्मानामुळे नव्या पीढीला प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी केले. मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित विशेष दीक्षांत समारंभात …

Read More »

संजय राऊत म्हणाले, अशी पत्रे शिवसेना भवनात शेकड्याने येतात मात्र… त्या पत्रावरून मनसेवर साधला निशाणा

काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना धमकीचं पत्र आल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेवून राज ठाकरे यांना सुरक्षा पुरविण्याची मागणी केली. यापार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणा की, अशी पत्रे शिवसेना भवनात आम्हाला रोज शेकड्याने येत असतात असा …

Read More »

राज्यसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर, हे खासदार झाले निवृत्त १० जून २०२२ रोजी मतदान तर त्याच दिवशी मतमोजणी होवून निकाल जाहीर

राज्यसभेतील महाराष्ट्रातील ६ जागांसह रिक्त होत असलेल्या ५७ जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर झालाय. भारत निवडणूक आयोगाने या निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक जारी केले आहे. यानुसार १० जून २०२२ रोजी या ५७ जागांसाठी मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांचा समावेश असून यात शिवसेना नेते संजय राऊत यांच्यापासून ते राष्ट्रवादी …

Read More »

शरद पवार म्हणाले, राजकारणी लोकांपेक्षा सामान्य माणूस शहाणा, चुकलं तर अक्कलही शिकवतात डॉ.आंबेडकरांच्या राज्यघटनेमुळे देश एकसंध

देशातील विद्यमान राजकिय परिस्थितीबाबत बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हणाले, आम्हा राजकारणी लोकांपेक्षा सामान्य माणूस शहाणा असून आमचं चुकलं तर अक्कल शिकवतात आणि दुरुस्त करायला पुढे काही आलं तर त्याला संधी देतात असे सांगत देश एकसंध राहिला तो केवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्य घटनेमुळे असेही सांगितले. गुरुवारी १२ …

Read More »

ते पत्र जाहिर करत पटोले म्हणाले,… याला पाठीत खंजीर खुपसणे म्हणायचे नाही तर काय ? माझ्यावर टीका करून सत्य झाकता येणार नाही

भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या अध्यक्ष आणि सभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा लिखीत करार मोडून राष्ट्रवादीने भाजपासोबत जाऊन सत्ता स्थापन केली, ही दगाबाजीच आहे. याला पाठीत खंजीर खुपसणे नाही तर दुसरे काय म्हणायचे? असा सवाल करून माझी पार्श्वभूमी संपूर्ण देशाला आणि राज्याला माहित आहे. आम्ही जे काही करतो …

Read More »

ताज महल कोणी बांधला हे ठरविण्यासाठी आम्ही इथे बसलोय का? अलाहाबाद उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारत याचिका फेटाळून लावली

मागील काही दिवसांपासून उत्तर भारतात ताज महल हा हिंदू मंदिरावर बांधण्यात आल्याचा अपप्रचार भाजपाकडून जाणीवपूर्वक पसरविण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाच्या अयोध्या येथील प्रसारमाध्यमाचे प्रमुख डॉ.रजनीश सिंह यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल करत भारतीय पुरातत्व विभागाला याबाबत आदेश देण्याची मागणी केली. मात्र आम्ही ताजमहल कोणी बांधला हे ठरविण्यासाठी इथे …

Read More »

संभाजीराजेंनी सोडले भाजपाला, केल्या या दोन घोषणा 'स्वराज्य' संघटनेची स्थापना, स्वतंत्र राजकिय वाटचाल करणार

भाजपाचे सहयोगी सदस्य म्हणून राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्त केलेले माजी खासदार संभाजी राजे यांनी आज मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नसल्याचे सांगत स्वराज्य या नव्या संघटनेची स्थापना केल्याचे जाहीर करत या संघटनेच्या माध्यमातून राजकारणात उतरणार असल्याचे जाहीर केले. काही दिवसांपूर्वी खासदार संभाजी राजे यांनी १२ मे रोजी आपली भूमिका …

Read More »

नाना पटोले म्हणाले, राष्ट्रवादीकडून काँग्रेसच्या पाठीत सुरा खुपसला राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा दिल्याने राजकिय आरोपांना सुरुवात

नुकत्याच झालेल्या भंडारा आणि गोंदियाच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत आघाडीच्या धर्माला तिलांजली देत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पाठिंबा दिल्याने सर्वाधिक संख्याबळ असूनही काँग्रेसला विरोधात बसावे लागले. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधत राष्ट्रवादीने काँग्रेसच्या पाठित सुरा खुपसल्याचा आरोप ट्विट करत केला. विशेष म्हणजे …

Read More »

मनसे प्रमुख राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकीः सुरक्षेची मागणी गृहमंत्र्यांकडे सुरक्षा देण्याची मागणी

सध्या भोंग्याच्या प्रश्नावरून चर्चेत आलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आज एका पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी देत पत्रात उर्दू शब्दांचा वापर करण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे राज ठाकरे यांना राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने सुरक्षा पुरवावी अशी मागणी करत यासंदर्भातील तक्रार आज राज्याचे …

Read More »

“या” शेतपीकांच्या उत्पादनाच्या वाढीसाठी राज्य सरकार देणार एक हजार कोटी कापूस, सोयाबीन उत्पादन वाढविण्यासाठी विशेष कृती योजना

कापूस आणि सोयाबीनची उत्पादकता वाढविण्याच्या विशेष कृती योजनेस तीन वर्षात एक हजार कोटी निधी देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या विशेष कृती योजनेच्या अंमलबजावणीसाठी कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात येणार आहे. राज्यातील कापूस पिकाखाली ४२ लाख हेक्टर व सोयाबीन पिकाखाली …

Read More »