मुंबई : प्रतिनिधी जवळपास सहा महिन्यांपासून आज राज्यातील सिनेमागृहे/नाटयगृहे बंद असली तरी येणाऱ्या काळात सिनेमागृहे/नाटयगृहे सुरु करताना नागरिकांची सुरक्षा याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. लॉकडाऊननंतर सिनेमागृहे उघडताना सिनेमागृहात प्रेक्षक येण्यासाठी हा काळ महत्वाचा आहे. राज्यातील सिनेमागृहे आणि नाटयगृहे सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित …
Read More »महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या अनुकंपा तत्वावरील पदांची भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला असून गट- क व गट – ड मधील विविध संवर्गातील १२४ पदांची भरती करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्यात आली असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. २२ मार्च २०१२ …
Read More »कोरोना : बाधितांच्या संख्येत पुन्हा ४ हजाराने वाढ तर घरी जाणारे जास्तच मुंबईतही वाढ १८ हजार ३१७ नवे बाधित, १९ हजार १६३ बरे झाले तर ४८१ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी राज्यात दररोज बरे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांच्या पुढे असून सलग तिसऱ्यांदा नविन रुग्ण कमी संख्येने नोंदविले गेले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस राज्यात उपचाराखाली असलेल्या ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या कमीकमी होत आहे. आज दिवसभरात १८ हजार ३१७ नविन रुग्णांची नोंद झाली असून १९ हजार १६३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. …
Read More »हॉटेल्स, रेस्टॉरंट, फूड कोर्टला ५ ऑक्टोंबरपासून परवानगी पुणे-मुंबई रेल्वे सेवा पूर्ववत डब्बेवाले, सर्व उद्योगांना परवानगी राज्य सरकारकडून मिशन बिगेन अंतर्गत आणखी नव्या सवलती
मुंबई: प्रतिनिधी मिशन बिगेन अगेन-६ अंतर्गत राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड कोर्ट सुरु करण्यास राज्य सरकारने ५ ऑक्टोंबरपासून परवानगी देत डब्बेवाल्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्यासही मान्यता दिली. याशिवाय मुंबई महानगर प्रदेशातील सर्व लहान-मोठ्या उद्योग (मॅन्युफॅक्चरिंग युनिट) आणि अत्यावश्यक सेवेत न येणाऱ् सर्व गोष्टी सुरु करण्यास परावनगी दिली. त्याचबरोबर मुंबई-पुणे दरम्यान …
Read More »उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा मंत्रिमंडळाने फेटाळत केली उपसमितीची स्थापना केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती
मुंबई : प्रतिनिधी नुकतेच केंद्र सरकारने संसदेत कृषी विषयक तीन विधेयके मंजूर केली. मात्र ही विधेयकांची राज्यात अंमलबजावणी करणार नसल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना केली होती. तसेच याविषयीचे वृत्तही काही प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केले. परंतु आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखआली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित …
Read More »सरकारचा मोठा निर्णय : अखेर त्या आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या- मुख्यमंत्र्यांचे आदेश आरे वृक्षतोड विरोधी आंदोलकर्त्यांना दिलासा
मुंबई: प्रतिनिधी आरे येथे मेट्रोसाठी कापण्यात येणारी वृक्षतोड थांबविण्याकरिता आंदोलन केलेल्या आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावी अशी विनंती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत केली. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर सदस्यांनी देखील याला अनुमोदन दिले. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे गुन्हे लगेच मागे घेण्याची कार्यवाही करावी …
Read More »मुंबईतल्या या चार रूग्णालयातील कोविड योद्ध्यांचा राज्यपालांनी केला सत्कार कोरोनामुळे होणारे मृत्यू शून्यावर आणण्याची डॉ. लहाने यांची ग्वाही
मुंबई : प्रतिनिधी शासकीय रूग्णालयातील डॉक्टर, अधीक्षक, प्राध्यापक, प्रमुख व्यवस्थापिका (मेटरन), स्वच्छता निरीक्षक आणि सर्व वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी कोरोना महामारीच्या संकट काळात निष्ठेने सेवा करीत आहेत. या सर्व कोविड योद्ध्यांचे कार्य अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. कोविड १९ या जागतिक महामारीच्या काळात मुंबईतील सेंट जॉर्ज रूग्णालय, द कामा ॲण्ड ॲलब्लेस रूग्णालय, गोकुलदास तेजपाल (जीटी) …
Read More »बाबरी मशीद खटल्याचा निकाल धक्कादायक असून वस्तुस्थितीला धरून नाही काँग्रेसचे माजी खा. हुसेन दलवाई यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी बाबरी मशीद खटल्याप्रकरणी सीबीआय कोर्टाने आज दिलेला निकाल धक्कादयक असून वस्तुस्थितीला धरून नाही. यामुळे देशातील जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल अशी भीती माजी खा. हुसेन दलवाई यांनी व्यक्त केली. बाबरी मशीद पाडण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराकडून राष्ट्रव्यापी मोहीम राबविण्यात आली. रथयात्रा काढण्यात आल्या, दंगली घडविल्या यात …
Read More »बाबरी विध्वंस प्रकरणी न्यायालयाने निकाल दिला तो अपेक्षितच आम्हाला निकालानंतर आश्चर्य वाटत नाही- नवाब मलिक
मुंबई : प्रतिनिधी बाबरी विध्वंस प्रकरणाचा आज न्यायालयाने निकाल दिला आहे तो अपेक्षितच होता. त्यामुळे आम्हाला निकालानंतर आश्चर्य वाटत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मत मांडले. पुराव्याअभावी आरोपींची न्यायालयाने सुटका केली आहे. परंतु युट्यूबवर गेलात तर जगामध्ये व्हिडीओ उपलब्ध आहेत. ६ डिसेंबर …
Read More »बाबरी मस्जिद प्रकरणाची चौकशी करणारे न्या.लिबरहान म्हणतात, “बाबरीचा निकाल म्हणजे फार्स” आयोगाने जी माहिती गोळा केली त्याच्या विरूध्द निर्णय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था बाबरी मस्जिद पाडण्याच्यी घटना घडल्यानंतर या घटनेची चौकशी करण्यसाठी तेव्हाचे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंगराव यांनी न्या.लिबरहान आयोगाची स्थापना केली. या आयोगाचे काम १७ वर्षे चालले. त्या १७ वर्षात आयोगाने १०० साक्षीदार तपासले आणि अनेकांवर दोषारोप निश्चित करण्यात आले. मात्र सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ज्या गोष्टी पाह्यल्या आणि त्यानुसार …
Read More »
Marathi e-Batmya