Editor

अजून थोडे दिवस कळ काढा, जाता येईल शेजारच्या जिल्ह्यात कंटेन्मेंटमधील प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा बंदच राहणार

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोवीड विषाणूचा प्रादुर्भाव कमी होण्याकरिता उपाययोजना करण्यात येत असताना हळूहळू आर्थिक व्यवहाराला चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेड झोन आणि कंटेन्टमेंट झोनमधील बाधितांची संख्या कमी करण्यावर भर देणे आवश्यक असल्यामुळे आंतर जिल्हा प्रवासावर अजूनही निर्बंध आहेत, जिल्ह्यांच्या सीमा अजून काही काळ बंदच राहणार असल्याचे आज राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले. …

Read More »

या महिन्यातही धान्य घेताना अंगठा लावायचा नाही अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोविड 19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेशन दुकानातून अन्न धान्याचे वाटप करतांना सुरू असलेली ई पॉस प्रणाली मार्च आणि एप्रिल मध्ये शिथिल करण्यात आली होती. मात्र केंद्र सरकारच्या वतीने नव्याने ई पॉस प्रणाली पुन्हा सुरू करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. मात्र राज्यात अद्याप अनेक जिल्ह्यात रेड आणि ऑरेंज क्षेत्र …

Read More »

सामान्य प्रशासनाच्या आदेशाला “गुच्छ” मुळे महसूलकडून केराची टोपली त्या अधिकाऱ्यांना रूजू न करून घेण्याचे आदेश गृहनिर्माण विभाग लवकरच काढणार

मुंबई : विशेष प्रतिनिधी म्हाडा आणि एसआरएमधील अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार या पदावरील व्यक्तीची प्रतिनियुक्ती करायची असेल तर गृहनिर्माण विभागाची मंजूर घेणे आवश्यकच करण्याचा निर्णय राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने दिला. तरीही महसूल विभागातील अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या “गुच्छ” मुळे सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखवित दोन अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती महसूल विभागाने केल्याचा …

Read More »

कोरोनाच्या अनुषंगाने राज्यातील ५१.०५ लाख लोकांचे सर्वेक्षण पूर्ण फक्त ९९७ कंटेनमेंट झोन क्रियाशील

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाबाधीत रूग्णांच्या अनुषंगाने आतापर्यंत ५१.०५ लाख नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. सद्यपरिस्थितीत ११ हजाराहून अधिक सर्वेक्षण पथकांच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्यात आले असून ९९७ कंटेनमेंट झोन सक्रिय असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात आज ११५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात …

Read More »

मद्य दुकाने सुरु करण्यावरून घोळ…अखेर सरकारकडून मद्यविक्रीस परवानगी उत्पादन शुल्क म्हणते बंद तर सरकार म्हणते सुरु राहणार

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यातीत मार्गदर्शक तत्वे जाहीर करताना मद्य दुकानांवरून राज्य सरकारने घोळ घालण्यास सुरुवात केली आहे. एकाबाजूला मुंबई उपनगरातील सर्व जिल्ह्यात वाईन शॉप्स, बिअर बार बंदच राहणार असल्याचे परिपत्रक काढून जाहीर करण्यात आले. तर दुसऱ्याबाजूला राज्य सरकारकडून कंन्टोमेंट झोन वगळता इतर भागात वाईन शॉप्सची दुकाने सुरु …

Read More »

राज्य उत्पादन शुल्क म्हणते १७ मे पर्यत सर्व वाईन शॉप्स, बार बंदच विभागाकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्पा उद्या ४ मे पासून सुरु होत आहे. मात्र या तिसऱ्या टप्प्यात वाईन शॉप्स आणि बार पूर्वीप्रमाणेच बंद राहणार आहेत. तसेच या काळात दारूबंदी कायदा लागू करण्यात आलेला असून बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देत ही बंदी मुंबई उपनगरातील सर्व जिल्ह्यांना …

Read More »

पंतप्रधान मोदीजी IFSC हे प्राधिकरण मुंबईतच ठेवा तर मुंबईचे महत्त्व कमी करुन आंतरराष्ट्रीय बदनामीदेखील होईल अशी शरद पवारांची भीती

मुंबई: प्रतिनिधी गुजरातमध्ये IFSC स्थलांतरित करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची आणि गुणवत्तेच्या आधारावर मुंबईतच हे प्राधिकरण स्थानांतरित करण्याची विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली. IFSC प्राधिकरण ही देशातील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांमधील सर्व वित्तीय सेवांचे नियमन करण्यासाठी युनिफाइड एजन्सी असून मुंबई …

Read More »

मुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्र्यांच्या अधिकारावर महसूल विभागाचे अतिक्रमण कोरोनाचे कारण पुढे करत महसूल विभागाकडून परस्पर दोघांची नियुक्ती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातल्या कोरोना संकटाच्या विरोधात लढण्यासाठी सगळे लढत असताना महसूल विभागाने मात्र थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि विभागाच्या अधिकारावर अतिक्रमण करत थेट म्हाडाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचा धक्कायदायक प्रकार नुकताच उघडकीस आला. काही महिन्यांपूर्वी महसूल विभागाने प्रतिनियुक्तीवर पाठविलेल्या एका गोटे नामक अधिकाऱ्याने म्हाडाच्या कारभारात भलताच धुमाकुळ …

Read More »

सनदी अधिकारी राहुल पाटील यांनी होणाऱ्या पत्नीसोबत दिली कोरोना विरोधी लढ्याला मदत लग्न दिवसाची आठवण म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख रुपयांचे सहकार्य

चंद्रपूर: प्रतिनिधी आज २ मे खरं तर सध्या कोरोना नसता तर राहुल दादा आणि तेजस्विनी वहिनी यांचा लग्नं समारंभ झाला असता. राहुल पाटील हे भारतीय वनसेवेत (IFS) चंद्रपूर येथे कार्यरत आहेत. अर्थात लग्न पुढे गेल्यामुळे खुप वाईट नक्कीच वाटतय. पण त्याहीपेक्षा या दोघांचं कौतुक जास्त वाटतय, त्याच कारणही तसंच आहे. …

Read More »

मुंबई महानगराची वाटचाल १० हजाराकडे: नव्याने ७९० सापडले मुंबई-ठाणे मिळून ९ हजार ७०९ वर संख्या पोहोचली

मुंबई: प्रतिनिधी दोनच दिवसांपूर्वी राज्यातील कोरोनाबाधीतांची संख्या १० हजारने ओलांडली असताना मुंबई आणि ठाणे मंडळ मिळून लवकरच ही संख्या ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज संध्याकाळपर्यंत राज्यात नव्याने ७९० रूग्ण आढळून आले असून राज्याची संख्या १२ हजार २९६ वर पोहोचली आहे. तर मुंबई शहरातील बाधितांची संख्या ८ हजार ३५९ वर …

Read More »