Editor

निराधार, श्रावणबाळसह अन्य योजनेचे निवृत्तीवेतन तीन महिन्याचे अॅडव्हान्स सामाजिक न्यायमंत्री धंनजय मुंडे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार, श्रावणबाळ व केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन अशा पाच योजनेच्या बाबतीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी महत्वपूर्ण निर्णय …

Read More »

बांधकाम कामगारांनो २००० रू. मदतीसाठी अर्ज व दस्तावेज नको कामगारांची फसवणूक केल्यास कारवाई

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडॉऊन सुरू आहे. या कालावधीत रोजगार बुडालेल्या इमारत व इतर बांधकाम मजुरांना दोन हजार रुपये थेट बँक खात्यात (DBT पध्दतीने) वाटप करण्यात येत आहेत. बांधकाम मजुरांनी यासाठी कोणताही अर्ज, बँकेचा तपशील, आधार क्रमांक नव्याने सादर करण्याची आवश्यकता नाही, असे महाराष्ट्र इमारत व इतर …

Read More »

परप्रांतीय मजूरांसाठी ३मे नंतर मुंबई, पुण्यातून विशेष गाड्या सोडा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र

मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने लागू केलेल्या देशव्यापी टाळेबंदीची मुदत ३ मे रोजी संपत आहे. टाळेबंदीची मुदत संपल्यानंतर रेल्वेसेवा सुरु झाल्यास, महाराष्ट्रात ठिकठिकाणी थांबलेले परप्रांतीय मजूर बांधव आपापल्या गावी परतण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची व त्यामुळे गर्दी उसळून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने मुंबई व पुणे येथून …

Read More »

राज्यातला वेग सात दिवसांवर : पाच हॉटस्पॉट कमी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला असून हा कालावधी सात दिवसांवर गेला आहे. जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्य शासनामार्फत कोरोना प्रतिबंध आणि उपचार केले जात आहेत. राज्यात घाबरून जाण्याची स्थिती नाही. मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई महापालिकेला …

Read More »

काँग्रेसकडून पालघरप्रकरणातील भाजपा कार्यकर्त्यांचे कनेक्शन उघड प्रवक्ते सचिन सावंत यांनी फोडले बिंग

मुंबई: प्रतिनिधी पालघरमधील ज्या गडचिंचले गावात तिघांच्या हत्येची दुर्दैवी घटना घडली. त्या ग्रामपंचायतीवर १० वर्षांपासून भाजपाची सत्ता असून चित्रा चौधरी ह्या सध्या तिथल्या सरपंच आहेत. या घटनेत भाजपाचे स्थानिक बुथ कार्यकर्त्ये असून त्यांच्या नावाची अधिकृत यादी भाजपाने त्यांच्या पक्षाच्या डहाणू फेसबुकवर घोषित केल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी …

Read More »

राज म्हणाले मुख्यमंत्री ठाकरेंना, महसूलासाठी तरी हॉटेल, वाईन शॉप उघडा महिन्याकाठी १२५० कोटी रूपयांचा महसूल न गमाविण्याची पत्राद्वारे विनंती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोना लॉकडाऊनमुळे सर्व अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. हॉटेल ही मुंबईकरांसाठी चैनीची गोष्ट नव्हे तर गरज आहे. त्यातच माफक आणि स्वस्त दरात जेवण मिळणारी हॉटेल्स बंद असल्याने नागरिकांचीही गैरसोय होत आहे. यापार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेत धुगधुगी निर्माण करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दरात जेवण मिळण्यासाठी हॉटेल्स आणि वाईन शॉप्स सुरु …

Read More »

एप्रिलचा पूर्ण पगार मिळणार, मार्चचा अर्धा पगार गणपतीत राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी कोव्हीड- 19 च्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक आपत्तीच्या अनुषंगाने राज्याच्या महसुली जमेवर प्रतिकूल परिणाम झाला असला तरी, शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन एकाच टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. महसुली उत्पन्नात झालेली घट लक्षात घेता खर्चात काटकसर करण्याच्या उद्देशाने सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन माहे …

Read More »

कालच्या तुलनेत राज्यात १२१ कमी रूग्ण बाधीत ४३१ने संख्या वाढत ५ हजार ६ ४९ वर पोहोचली

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत मागील तीन दिवसांपासून वाढत राहीलेली संख्या आज कमी झाली आहे. आज दिवसभरात ४३१ रूग्णांचे निदान झाले असून काल रूग्णांची संख्या ५५२ वर पोहोचली होती. त्यातुलनेत आज १२१ ने कमी रूग्ण आढळून आले आहेत. तर १८ रूग्णांचे निधन झाले असून राज्यातील एकूण रूग्णांची संख्या ५ …

Read More »

मंत्रालयाचे कामकाज पुन्हा ५ टक्के कर्मचाऱ्यांवर चालणार राज्य सरकारचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोना विषाणूचा पार्दुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर राज्य सरकारकडून उपाययोजना आखण्यात येत आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. त्यामुळे अखेर मंत्रालयाचे कामकाज चालविण्यासाठी १० टक्क्यापर्यंत वाढविण्यात आलेली कर्मचाऱी-अधिकाऱ्यांची संख्या पुन्हा ५ टक्क्यावर आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून यासंदर्भातील आदेशही जारी करण्यात आले. मुंबई महानगरात, …

Read More »

व्वा छान: साठीतील ९८ रूग्णांसह ५०० हून अधिक तरूण कोरोनामुक्त आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा वाढत असतानाच मंगळवारी एकाच दिवशी कोरोनाच्या १५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. ही दिलासादायक बाब असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या ७२२ जणांपैकी पुरूषांची संख्या सर्वाधिक ४४१ असून २८१ महिला आहेत. त्यामध्ये ३१ ते ५० या वयोगटातील ३१८ रुग्णांचा समावेश आहे. त्या खालोखाल २१ ते ३० …

Read More »