Editor

राज्यपालांनी राज्य सरकारला आदेश दिल्यानंतर फडणवीसांची मागणी अन्यथा मागास भागांची २५ वर्षांची लढाई संपुष्टात येण्याची विरोधी पक्षनेत्यांना भीती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील वैधानिक विकास मंडळांचा कालावधी आज ३० एप्रिल रोजी संपत असून, ही मुदतवाढ न देण्यात आल्यास मागास भागांची २५ वर्षांची लढाई संपुष्टात येईल. त्यामुळे या वैधानिक महामंडळांवरील नियुक्त्यांना मुदतवाढ देण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे केली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी …

Read More »

पवारांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांचे केले कौतुक चांगले काम करत असल्याची शाबासकीची थाप

मुंबई: प्रतिनिधी राज्यावर आलेले कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे विशेषत: अजित पवार हे चांगले चांगले काम करत आहेत. तसेच मंत्रिमंडळातील त्यांचे इतर सहकारीही चांगले काम करत असल्याची शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मारत त्यांचे कौतुक केले. समाजमाध्यमातून जनतेशी संवाद साधताना त्यांनी या …

Read More »

कोरोनाची भीती बाळगून फार काळ घरात बसता येणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी कारखाने, व्यापार आणि उद्योग गेले ४० दिवस बंद आहेत. रोजगार बुडाला आहे. त्याचा विपरीत परिणाम शासनाच्या अर्थकारणावर होत आहे. राज्याचा २०-२१ चा अर्थसंकल्प पाहिला तर महसुली उत्पन्न हे ३ लाख ४७ हजार कोटीच्या आसपास जाईल असं दिसतंय. परंतु आज सुधारित माहिती घेतली असता या महसुलात तूट १ लाख …

Read More »

असंघटीत कामगारांना ५ हजार: म.फुले आरोग्य योजनेतील रूग्णालयात मोफत कोरोना चाचणी काँग्रेसच्या टास्क फोर्सचा अहवाल सादर

मुंबई: प्रतिनिधी महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांची चाचणी मोफत करावी, असंघटीत कामगारांना ५ हजाराचा मदतनिधी द्यावा, शेतकऱ्यांना नव्याने कर्ज द्यावे, पीपीई किटवरील टॅक्स माफ करावा यासह विविध मागण्या आणि सुधारणांचा अहवाल काँग्रेस पक्षाच्या टास्कफोर्सने आज सादर करण्यात आल्याची माहिती पक्षाचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी …

Read More »

तीन दशकातील हिंदी चित्रपटांतील अभिनेत्रींचा हिरो गेला वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई: प्रतिनिधी बुधवारी चतुरस्त्र अभिनेता इरफान खान यांच्या निधनाच्या घटनेतून बॉलीवूड सावरत नाही. तोच मागील तीन दशकांपासून प्रत्येक नव्या अभिनेत्रीचा हिरो म्हणून राहीलेले ऋषी कपूर यांचे आज सकाळी वयाच्या ६७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या विशेष म्हणजे त्यांनाही काल संध्याकाळी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तोच सकाळी त्यांची प्राण …

Read More »

एकही रुग्ण तपासणी- उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर शासकीय तसेच महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून त्यांना उपचार देण्यात यावेत, उपचाराविना रुग्णांना परत पाठविण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज राज्य शासनामार्फत अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे …

Read More »

या नोडल अधिकाऱ्यांचे पत्र असेल तरच मूळ गावी जाता येणार मंत्रालयातील नियंत्रण कक्ष देखरेख ठेवणार: काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील स्थलांतरीत कामगार, पर्यटक, यात्रेकरू आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या परराज्यातील मूळ गावी जाण्यासंदर्भात सातत्याने केंद्राकडे मागणी केल्यानंतर अखेर त्याबाबतची मार्गदर्शक तत्वे आणि परवानगी दिली. त्यानुसार राज्य सरकारकडून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून जाहीर केले. त्याचबरोबर राज्य आपत्ती व्यवस्थापनचे संचालक यांनाही नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यामुळे …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंच्या मागणीला यश : कामगार, पर्यटक, विद्यार्थ्यांना गावी जाण्यास परवानगी मुंबईतील ६ लाखाहून अधिक कामगार घरी पोहोचणार

मुंबई: प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेशासह राज्यात अडकलेल्या जवळपास १० लाख कामगारांना त्यांच्या घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला असून पर्यटक, विद्यार्थी यांनाही आपापल्या घरी जाण्यास परवानगी देण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला असून तसे आदेशही जारी करण्यात आले. विशेष म्हणजे परराज्यातील कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव …

Read More »

उद्योगजगताने मोठे, धाडसी, जलद, चौकटीबाहेरचे निर्णय घ्यावे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे उद्योगपतींना आवाहन

मुंबई: प्रतिनिधी कोरोनानंतरच्या काळात मोठ्या, धाडसी, जलद आणि चौकटीबाहेरच्या निर्णयांची अधिक गरज भासणार आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. आर्थिक क्षेत्रातील विविध मान्यवरांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते बोलत होते. या चर्चेत स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी झरिन दारूवाला, केपीएमजीचे संतोष कामथ, …

Read More »

घरगुती वीज आकार ५ टक्के तर वाणिज्यिक व औद्योगिक वीज वापराचा आकार स्थिर ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने या काळात घरगुती वीज आकार ५ टक्क्यांपर्यत कमी करण्यात आला आहे. तसेच वाणिज्यिक-औद्योगिक वीजेवरील आकार तीन महिन्यासाठी स्थिर ठेवण्यात आला असल्याची माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिली. याशिवाय मुंबईसह राज्यात वीज पुरवठा करणारे अदानी, टाटा, बेस्ट व महावितरण …

Read More »