Editor

पंतप्रधान म्हणतात चर्चा झाली नाही, मग स्थानबध्द केंद्राचे पत्र कसे जारी केले एनआरसी कायद्यावरून खोटं बोलत असल्याचा काँग्रेसचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनआरसी कायद्याबाबत मंत्रिमंडळात आणि संसदेत चर्चा झाली नसल्याचे सांगितले. मात्र देशाचे गृहमंत्री सीएए आणि एनआरसी कायदा संपूर्ण भारतात राबविणार असल्याचे संसदेसह इतर ठिकाणी जाहीररित्या सांगत आहेत. तसेच स्थानबध्द केंद्र स्थापन करण्याबाबत सर्व सरकारांना केंद्राकडून पत्र पाठविण्यात आल्याने मग चर्चा न करताच ही …

Read More »

आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले, माझ्याकडची माहिती तुम्हाला देतो मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी भीमा कोरेगांव प्रकरणाची काही महत्वाची माहिती माझ्याकडे असून ती पुढील भेटीत आपणास देणार असल्याचे सांगत एनआरसी कायद्याला विरोध करण्यासाठी २६ तारखेला मोर्चा काढण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सांगितल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. एनआरसी आणि सीएए कायद्याच्या विरोधात परवा मोर्चा काढण्यात …

Read More »

काँग्रेसकडून चव्हाण, थोपटे आणि गायकवाड यांची नावे निश्चित लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

मुंबई-नवी दिल्लीः प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार २७ डिसेंबर पूर्वी करण्याचा निर्णय शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची यादी जवळपास निश्चित मानली जात असताना काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पुण्याच्या भोर तालुक्यातील संग्राम थोपटे आणि मुंबईतील धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांची नावे …

Read More »

राष्ट्रवादीतून देशमुख, मलिक, मुश्रीफ, आव्हाड यांची नावे निश्चित नव्या चेहऱ्यात निकम, तटकरे यांचा समावेश होण्याची शक्यता

मुंबईः प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिल देशमुख, हसन मुश्रीम, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड यांची नावे निश्चित झाली आहेत. तर नव्या चेहऱ्यांमध्ये तटकरे, निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. विधानसभा निवडणूकीत सर्वाधित मदतीचा हात हा पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, …

Read More »

भाजपला लागलेली उतरती कळा कोणी रोखू शकणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे भाकित

मुंबईः प्रतिनिधी मागील दिड-दोन वर्षात भाजपाच्या हातून राज्ये हातून जात असून मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि आता झारखंड सारखी हाती राहीलेली नाहीत. भाजपाच्या कारभारावर लोकांचा आता विश्वास राहीलेला नसल्याने त्यांची आता उतरती कळा लागली असून ही उतरती कळा कोणी रोखू शकणार नसल्याचे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. …

Read More »

विदर्भाच्या नातवाकडून १० रूपयांच्या शिव-भोजन योजनेसह विदर्भ विकासाचे बिगूल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून घोषणा

नागपूरः प्रतिनिधी मी विदर्भाचा नातू असून माझ्यासाठी आजोळचे आर्शीवाद महत्वाचे आहेत. त्यामुळे विदर्भातील कोणतेही सिंचन प्रकल्प रखडले जाणार नसून सिंचनातील अनुषेश भरून काढणार आहे. तसेच या भागात उद्योग गोसीखुर्द प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण करणार असल्याची घोषणा करत विदर्भाच्या विकासासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमची मदत लागेल अशी साद घालत १० …

Read More »

शेतकरी कर्जमाफीची मुख्यमंत्री ठाकरेंकडून घोषणा तर फडणवीसांचा सभात्याग कर्जमाफीची मार्चपासून अंमलबजावणी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांकडून जाहीर

नागपूरः प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचे देण्यात आलेले आश्वासन करण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे दोन लाख रूपयांपर्यंतचे कर्जमाफ करत असल्याची घोषणा विधानसभेत केली. तसेच या कर्जमाफीची अंमलबजावणी मार्च २०२० पासून करणार असून ही कर्जमाफी कोणत्याही अटीशर्तीशिवाय राहणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा …

Read More »

भारत देश म्हणजे धर्मशाळा आहे का? मनसेप्रमुख राड ठाकरे यांची नागरीकत्व कायद्यावर टीका

पुणेः प्रतिनिधी १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाला आणखी लोकांची काय आवश्यकता अशी खोचक विचारणा करत सर्व देशाच्या लोकांना सामावून घ्यायला भारत देश काय धर्मशाळा आहे असा सवाल नागरीकत्व कायद्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. देश म्हणून …

Read More »

भीमा कोरेगांव प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची महाविकास आघाडी सरकारकडे मागणी

पुणेः प्रतिनिधी एक वर्षापूर्वी पुण्यात एल्गार परिषद झाली. त्यानंतर भीमा कोरेगांव येथे दंगल झाली. मात्र यासंपूर्ण प्रकरणात पोलिसांचे वागणे आक्षेपार्ह असून त्यांच्याकडून अधिकाराच गैरवापर झालेला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी अशी मागणी राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडे करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले. केवळ नक्षलवादाच …

Read More »

संकटातील अर्थव्यवस्थेवरून लक्ष हटविण्यासाठी नागरीकत्व कायदा आणला भारतातील धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता- शरद पवारांची भीती

पुणेः प्रतिनिधी देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक आणि संकटात असताना नागरीकत्व कायदा (CAA) कायदा आणून या मुळ मुद्यावरून लक्ष हटविण्यासाठीच हा विषय पुढे आणण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. तसेच या कायद्यामुळे देशाच्या धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता असल्याची भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. पुण्यात आयोजित पत्रकार …

Read More »