महाराष्ट्रातील गरजू रूग्णांना अत्यावश्यक आरोग्यसेवा पुरविण्यासाठी, आर्थिक सहाय्य देण्याकरिता राज्य शासनाद्वारे कार्यान्वित मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक सुलभ व पेपरलेस होत आहे. महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आर्थिक मदत मिळविण्याची प्रक्रिया पूर्णतः पेपरलेस करण्यात येणार असून या प्रक्रियेसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता राहणार …
Read More »शरद पवार यांची टीका, दावोसमधून महाराष्ट्रात गुंतवणूक आणल्याचा सरकारचा दिखावा महाराष्ट्रातील कंपन्यांनाच तिथे बोलावून उद्योग आणत असल्याचा देखावा
दावोसमध्ये ज्या कंपन्यांशी करार झाले त्यातील बहुसंख्या कंपन्या भारतीय होत्या. फक्त एकाच परदेशी कंपनीने महाराष्ट्राशी करार केलेला आहे. २८ भारतीय कंपन्यांनी सामंजस्य करार केला, त्यातील २० कंपन्या महाराष्ट्रातील असून त्यातही १५ मुंबईतील आहेत. या कंपन्या गुंतवणूक करणार हे आधीच ठरले होते, मग त्या सगळ्यांना दावोसला निमंत्रित केले गेले. तिथून महाराष्ट्रात …
Read More »येत्या पाच वर्षांत घरगुती विजेचे दर २३ टक्क्यांनी कमी होणार महावितरण चे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांची माहिती
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० योजनेमुळे पुढील दोन वर्षांत कार्यरत होणा-या सौर उर्जा प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार असून घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक यांनाही मोठा फायदा होणार आहे. सौर उर्जा प्रकल्पांमुळे आगामी पांच वर्षांत १०० युनिट पर्यंत वीज वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे वीज दर ५ रु. ८७ प्रति युनिट …
Read More »शैक्षणिक हितासाठी एका वर्षासाठी ईब्ल्यूएस प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवेश घेतलेल्या प्रवेशित परंतु विहित नमुन्यामध्ये ईडब्लूएस EWS प्रमाणपत्र सादर न केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशास एका वर्षासाठी विशेष बाब म्हणून ईब्ल्यूएस प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या जवळपास १ हजार ६०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना लाभ होणार असल्याची …
Read More »नाना पटोले यांची घोषणा, लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचा एल्गार,राष्ट्रीय मतदार दिनी आंदोलन लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या भाजपा व निवडणूक आयोगाचा निषेध करणार
भारतीय जनता पक्ष व निवडणूक आयोगाने विधान सभेच्या निवडणुकीत मतांवर दरोडा टाकून लोकशाहीचा गळा घोटला आहे. भाजपा व निवडणुक आयोगाची ही अभद्र युती लोकशाहीला कलंक लावणारी आहे. लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी तसेच मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष शनिवारी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर जिल्हा व तालुका स्तरावर तीव्र आंदोलन करणार …
Read More »अजित पवार म्हणाले, पक्षाचे काम करताना आगीतून फुफाट्यात पडल्याची भावना… आपल्याला अजितपर्व पुढे नेताना भविष्याचा वेध घ्यायचा आहे - सुनिल तटकरे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त सदस्य कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करा असे सांगतानाच निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच काम करा. पल्ला लांब असला तरी दिवस पटकन निघून जातात त्यामुळे लक्षपूर्वक काम करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. गुरुवारी नांदेड जिल्हयातील नायगाव मतदारसंघातील सुमारे …
Read More »भंडारा येथील ऑर्डीनन्स फॅक्टरीत स्फोटः आठ जणांचा मृत्यू सकाळी १० वाजता झाला स्फोटः स्फोटात ७ जण जखमी
महाराष्ट्रातील भंडारा येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीत आज सकाळी एक शक्तिशाली स्फोट झाल्याची माहिती पुढे आली असून स्फोटानंतर लगेचच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी घटनास्थळाची पाहणी करत या दुर्घटनेत किमान ८ जणांचा मृत्यू तर ७ जण जखमी झाल्याची माहिती दिली. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात सकाळी १० वाजता आर्डिनन्स फॅक्टरीत हा स्फोट झाला. प्राथमिक माहितीनुसार, …
Read More »नाना पटोले यांची मागणी, शिंदे व फडणवीस सरकारने दावोससंदर्भात श्वेतपत्रिका काढावी ‘बुक माय शो’, ‘हिरानंदानी’शी करार करून सरकार काळाबाजारी व गुन्हेगारीला प्रोत्साहन देत आहे का?
दावोसमध्ये ६१ कंपन्यांशी केलेल्या करारातून १५.७० लाख कोटींची गुंतवणूक व १५.९५ लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यात मोठी गुंतवणूक आली तर त्याचे स्वागतच केले पाहिजे पण केलेले करार व वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा जनतेला अधिकार आहे. याआधीही असेच मोठे करार झालेले आहेत, …
Read More »चार क्षेत्रातील ८० टक्के कंपन्या योग्य उमेदवाराच्या शोधात जागतिक स्थरावर हे प्रमाण ७४ टक्के पेक्षा जास्त
जागतिक स्तरावर भरतीचा दृष्टिकोन मजबूत असूनही, भारतीय नियोक्ते २०२५ च्या पहिल्या तिमाहीत सततच्या प्रतिभेच्या कमतरतेमुळे सावध राहण्याची अपेक्षा करत आहेत, असे मॅनपॉवरग्रुप टॅलेंट शॉर्टेज सर्व्हेनुसार म्हटले आहे. भारतातील चार क्षेत्रांमध्ये केलेल्या या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की ८०% नियोक्ते पात्र उमेदवार शोधण्यासाठी संघर्ष करत आहेत, जे जागतिक सरासरी ७४% …
Read More »मल्टी ड्राईव्ह टेक्नोलॉजीमध्ये सुझुकी गुंतवणूकीस तयार अॅक्सेस स्कूटरच्या लॉचिंगनंतर दिली माहिती
दुचाकी वाहन उद्योगात विविध पॉवरट्रेन पर्यायांवर पैज लावल्याने संघर्ष तीव्र होत असताना, सुझुकी मोटरसायकल इंडिया अनेक तंत्रज्ञानाचा शोध घेण्यास तयार आहे, असे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना माहिती दिली. “जेव्हा आपण मल्टी पाथवे म्हणतो तेव्हा ते सर्वसमावेशक असेल. वेगवेगळे उत्पादक, त्यांच्या ताकदीनुसार, बॅटरी इलेक्ट्रिक व्यतिरिक्त इतर गोष्टी वापरून …
Read More »
Marathi e-Batmya