महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या न्हावा-शेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर असून, कोन ते पळस्पे दरम्यान जलवाहिनी टाकण्याच्या कामात येणाऱ्या तांत्रिक अडचणी एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी यांनी परस्पर समन्वयातून तातडीने दूर करून कामाला गती द्यावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील …
Read More »दत्तात्रय भरणे यांचे आश्वासन, २ लाखांपर्यंतच्या सर्व पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार शेतक-यांना मिळणार कर्ज नील झाल्याचे प्रमाणपत्र
“राज्यातील ज्या शेतकऱ्यांची थकीत कर्ज रक्कम २ लाखांपर्यंत आहे, त्या सर्व पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे. ‘हेअरकट’मुळे कर्जमाफीच्या यादीत रक्कम कमी दिसत असली तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याचे किंवा काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, संबंधित बँकांशी समन्वय साधून या सर्व तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात येत असल्याचे” कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी …
Read More »दादाजी भुसे यांची माहिती, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षणावर भर शिक्षण विभागाच्या शासकीय शाळांचा सर्वंकष आढावा
शालेय शिक्षण विभागांतर्गत कार्यरत जवाहर नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय, सैनिकी शाळा, शासकीय विद्यानिकेतन आणि कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या शाळांमधून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षणावर अधिक भर देण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. या अनुषंगाने या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे, सोयी सुविधा, विद्यार्थ्यांची प्रवेश स्थिती अभ्यासाचे मूल्यमापन याबाबत त्यांनी मंत्रालयात मंगळवारी आयोजित बैठकीत …
Read More »राहुल गांधी यांची मागणी, अमित शाह यांना गृहमंत्री पदावरून हटवा आंदोलकाच्या मोर्चावेळी अमित शाह पोलिसांना वारंवार फोनवरून बोलत होते
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा वापर करण्यास अधिकृत केल्याचा आरोप करणाऱ्या आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यास नकार दिला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पदावरून हटवावे या मागणीचा पुनरुच्चार केला. काही तासांपूर्वी, राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे लोकसभेतील कागद …
Read More »देशातील मान्सूनच्या स्थितीची छायाचित्रे इस्रोकडून प्रकाशित, अनेक राज्यात मान्सूनची हजेरी डिप डिप्रेशनचा वातावरणीय पट्टा अरबी आणि बंगालच्या उपसागरात
मान्सूनमुळे आज भारताचा मोठा भाग पावसात न्हाऊन निघाला आहे. एकाच वेळी अनेक वादळे एकत्र येत आहेत असे वाटू शकते, परंतु उपग्रहाचे चित्र आणि भारतीय हवामान विभागाचा (IMD) स्वतःचा मागोवा वेगळेच सांगतो. ही अजूनही एकच प्रणाली आहे, जी ताशी १२ किलोमीटरच्या स्थिर, सामान्य गतीने पुढे सरकत आहे आणि ती आता इतकी …
Read More »राहुल गांधी यांचा आरोप, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर अमित शाह यांनी फायरिंग करण्याचे आदेश दिले कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलना दरम्यान विद्यार्थ्यांवर बळाचा वापर
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करण्याचे अधिकार दिल्याचा आरोप केल्यानंतर बुधवारी लोकसभेत गदारोळ झाला. या आरोपांना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि इतर एनडीए खासदारांनी तीव्र विरोध दर्शवला. पेपर फुटी प्रकरणी विधेयकावरील …
Read More »माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विरोधातील फौजदारी कारवाई सर्वोच्च न्यायालयाने केली बंद सीबीआयच्या रिपोर्ट मध्ये ठोस नोंद घेण्यासारखी ठोस कारणे नव्हती
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरील कोळसा खाण वाटप प्रकरणातील फौजदारी कारवाई बंद केली. २०१५ मध्ये विशेष सीबीआय न्यायालयाने एजन्सीचे क्लोजर रिपोर्ट फेटाळून लावत त्यांना खटल्याला सामोरे जाण्यासाठी बोलावले होते, तो आदेश न्यायालयाने रद्द केला. मनमोहन सिंग यांचे अपील मंजूर करताना, न्यायालयाने म्हटले की एजन्सीचे निष्कर्ष फेटाळण्यासाठी किंवा …
Read More »राहुल गांधी यांनी विद्यार्थी आणि इतर मधील फरक स्पष्ट केल्याने सत्ताधाऱ्यांचा गोंधळ तर असंसदीय शब्दाचा वापर केला म्हणून सत्ताधाऱ्यांचा गोंधळ
बुधवारी लोकसभेत गदारोळ पाहायला मिळाला. तरुणांच्या अलीकडील निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर सरकारवर टीका करताना, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका विद्यार्थ्याशी झालेल्या संभाषणाचा संदर्भ देत ‘असंसदीय’ शब्द वापरला. ‘पेपर लीक’ विरोधी कायद्यातील सुधारणांवरील चर्चेदरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी ‘विद्यार्थी’ आणि ‘इतर’ यांच्यातील फरक स्पष्ट केला. परंतु सत्ताधारी बाकावरून पंतप्रधान नरॆंद्र मोदी यांच्या …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, पालघरच्या महापूर बाधितांसाठी एकात्मिक मदत आराखडा करा आपत्तीच्या काळातही अखंडित वीज पुरवठ्यासाठी 'इन्फ्रास्ट्रक्चरल अपग्रेडेशन'
पालघर हा मुबलक पाऊस पडणारा आणि वेगाने नागरीकरण होत असलेला जिल्हा असल्याने या अनुषंगाने भविष्यातील विविध प्रकारच्या आपत्ती टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाधित कुटुंबांना नियमातील तरतुदींपेक्षा अधिक मदत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विशेष पॅकेज मंजूर करण्यात येईल या दृष्टीने पालघर आणि नाशिक जिल्ह्यांसाठी एकात्मिक मदत आराखडा तयार करण्यात …
Read More »रोहित पवार यांचा आरोप, भाजप सरकार आल्यापासून वेगवेगळ्या विभागाचे पेपर फुटतायत सीईटीचा पेपर सुद्धा फुटत असेल ते गंभीर आहे
सीईटी सेलचा मुद्दा आमच्याकडे देखील आला आहे. भाजप सरकार राज्यात आल्यापासून वेगवेगळ्या विभागाचे पेपर फुटत आहेत. जर सीईटीचा पेपर सुद्धा फुटत असेल ते गंभीर आहे,असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे. रोहित पवार बोलताना म्हणाले की,भाजप सरकार राज्यात आल्यापासून वेगवेगळ्या …
Read More »
Marathi e-Batmya