राज्यातील ॲग्रीगेटर आधारित प्रवासी वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक व नियमबद्ध करण्यासाठी राज्य शासनाच्या ॲग्रीगेटर धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून, राज्यात कार्यरत सर्व ॲग्रीगेटर कंपन्यांनी १ सप्टेंबर २०२६ पर्यंत विहित प्रक्रियेनुसार परिवहन विभागाकडे नोंदणी पूर्ण करावी. त्यानंतर विनानोंदणी अथवा नियमबाह्य पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या ॲग्रीगेटर कंपन्या आणि संबंधित वाहनांवर कठोर कायदेशीर कारवाई …
Read More »अतुल लोंढे यांचा आरोप, एमपीएससी मधून सरळ सेवा भरतीने अधिकारी बनवण्याच्या तरुणांच्या स्वप्नावर भाजपा बुलडोझर
भाजपाचे मनुवादी सरकार जेन-झी विरोधी आहे. नीट पेपर फुटी प्रकरण अद्याप ताजे असताना राज्यातील भाजपा महायुती सरकारने या तरुणाईंच्या स्वप्नांवर, आशा अकांक्षांवर वरवंटा फिरवला आहे. एमपीएससी मधून सरळ सेवा भरतीतून थेट अधिकारी होण्याचे तरुणांचे स्वप्न भाजपा सरकारच्या नव्या जीआरमुळे अंधाकारमय झाले आहे. अधिकारी भरतीचे ६०-४० प्रमाण बदलणारा जीआर सरकारने आणला असून …
Read More »उच्च न्यायालयाची अन्न व औषध प्रशासनाला विचारणा, कॅन्टीन बंद
अनेक खाजगी हॉटेल्स आणि आस्थापनांचे परवाने निलंबित केल्यानंतर, अन्न सुरक्षा नियमांची अंमलबजावणी एकसमानपणे केली जात आहे की नाही, यावर मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाला (FDA) प्रश्न विचारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, नियामकाच्या अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या आवारातील वकिलांच्या संघटनेद्वारे चालवल्या जाणाऱ्या कॅन्टीनला भेट दिली. त्यानंतर बॉम्बे बार असोसिएशनद्वारे (BBA) चालवल्या …
Read More »नीट परिक्षेसंदर्भातील चार याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावल्या
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नीट (यूजी) उमेदवारांनी दाखल केलेल्या चार रिट याचिका फेटाळून लावल्या, ज्यात त्यांनी त्यांच्या ओएमआर शीटमध्ये फेरफार केल्याचा आरोप केला होता. न्यायालयाने दोन उमेदवारांच्या मूळ ओएमआर शीटची तपासणी करून आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे (एनटीए) म्हणणे ऐकून, गुणवत्तेच्या आधारावर त्यांच्या याचिका फेटाळल्या. उर्वरित दोन याचिकाकर्त्यांनी त्यांच्या याचिका मागे …
Read More »अभिजीत दीपके यांचा खोचक सल्ला, नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पद सोडून सोशल मिडीया इन्फ्लुएन्सर बनावे
‘कॉकरोच जनता पार्टी’चे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. नीट पेपरफुटीवरून देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांदरम्यान पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडियावर केलेल्या प्रयत्नांची खिल्ली उडवत अभिजीत दीपके म्हणाले की, मोदींनी देशाच्या सर्वोच्च पदावरून पायउतार होऊन त्याऐवजी ‘इन्फ्लुएन्सर’ बनावे असा खोचक सल्ला दिला. केंद्रीय शिक्षण …
Read More »वंदे मातरम, अपमान करणे फौजदारी गुन्हा ठरणार
संसदेने बुधवारी राष्ट्रगीत ‘वंदे मातरम’चा अपमान करणे हा फौजदारी गुन्हा ठरवणारे विधेयक मंजूर केले. लोकसभेत थोड्या चर्चेनंतर गोंधळात हे विधेयक संमत झाले. ‘राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक (सुधारणा) विधेयक, २०२६’ हे विधेयक एक दिवस आधीच राज्यसभेने मंजूर केले होते. लोकसभेत हे विधेयक मंजूर झाल्यामुळे, प्रस्तावित सुधारणा आता कायदा बनण्याच्या अधिक जवळ आली …
Read More »शालेय विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनात चिकन बिर्याणी देण्याचा मुख्यमंत्री विजय यांचा विचार मध्यान भोजनात अंडी देण्याच्या निर्णयानंतर आता चिकन बिर्याणी देण्याचा विचार
तामिळनाडू सरकार मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा चिकन बिर्याणी देण्याच्या प्रस्तावर विचार करत आहे. शालेय शिक्षण मंत्री राजमोहन यांनी ही कल्पना मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यासमोर मांडली. या प्रस्तावावर बोलताना राजमोहन म्हणाले की, राज्यातील प्रत्येक प्रमुख राजकीय काळात शालेय पोषण कार्यक्रम आपापल्या परीने अधिक मजबूत करण्यात आला …
Read More »मल्लिकार्जून खर्गे यांचा अमित शाह यांना इशारा, तर विद्यार्थी पुन्हा एकदा धडा शिकवतील विद्यार्थ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दिल्लीत २० जुलै रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या कथित पोलीस कारवाईसाठी त्यांनी अमित शाह यांना जबाबदार धरले. वरिष्ठ सभागृहात हा मुद्दा उपस्थित करताना मल्लिमाकार्जून खर्गे म्हणाले की, या घडामोडींची गृहमंत्री यांनी “जबाबदारी स्वीकारावी, माफी …
Read More »चित्रपती व्ही. शांताराम व राज कपूर जीवनगौरव या कलावंताना जाहिर, तसेच विशेष योगदान पुरस्कार पं. हृदयनाथ मंगेशकर आणि सलीम खान यांना जीवनगौरव पुरस्कार; प्रसाद ओक व राणी मुखर्जी यांचा विशेष योगदान पुरस्काराने गौरव
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे २०२५ चे ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना, तर ‘स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच ‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार’ अभिनेते व दिग्दर्शक प्रसाद ओक यांना, तर ‘स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार’ प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ ज्येष्ठ नागरिक व महिलांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय
एसटी प्रवासात शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप एनसीएमसी स्मार्ट कार्ड प्राप्त झाले नसल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप …
Read More »
Marathi e-Batmya