Breaking News

पुणे-पिंपरी चिंचवड विषारी दारू दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू: मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता हडपसर येथे मोठा साठा जप्त, बॅरल भरून विषारी दारूचे स्टॉक

पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात संशयित विषारी दारूमुळे मृत्यूंचे सत्र सुरूच असून मृतांचा आकडा वाढत असल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. आनंदवन, काटेवस्ती, संजयनगर, आझाद चौक आणि जय महाराष्ट्र चौक परिसरात या घटनेने भीती, संताप आणि शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दुर्घटनेतील सर्वाधिक हृदयद्रावक घटना फुगेवाडी येथे घडली. विजय राठोड …

Read More »

आमदार रईस शेख यांची माहिती, भिवंडी शहराच्या पाणीपुरवठा योजनेतील अडथळे दूर करणार बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचेही आश्वासन

अमृत अभियान अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या भिवंडी- निजामपूर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनसाठी भाडेतत्त्वावर जागा देण्यासंदर्भात मुंबई महानगरपालिका १० दिवसांमध्ये सर्व अडथळे दूर करेल, असे आश्वासन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले, अशी माहिती भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी दिली. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयामध्ये शुक्रवारी, …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचे नेतृत्व करेल ‘मुंबई टेक विक 2026’ चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

महाराष्ट्र एआय क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहे. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, मजबूत स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची  तयारी यामुळे आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचे नेतृत्व करेल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. ‍‍ मुंबईतील बीकेसी येथे ‘मुंबई टेक विक २०२६’ चे मुख्यमंत्री फडणवीस …

Read More »

अमेरिका-इराण युद्धबंदी कराराच्या प्रस्ताव डोनाल्ड ट्रम्प यांच्या अंतिम मंजूरीसाठी प्रलंबित दोन्ही बाजूच्या वाटाघाटी पूर्ण, बहुतेक अटी पूर्ण

अहवालानुसार, अमेरिका आणि इराण यांच्यात नाजूक युद्धविराम वाढवण्यासाठी आणि तेहरानच्या अणुकार्यक्रमावर पुन्हा चर्चा सुरू करण्याच्या उद्देशाने एक प्राथमिक करार झाला आहे, परंतु हा प्रस्ताव अद्याप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. ॲक्सिऑसने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंच्या वाटाघाटी करणाऱ्यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला ६० दिवसांच्या सामंजस्य कराराच्या चौकटीवर सहमती …

Read More »

सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसकडून खासदारकीची ऑफर खासदारकी स्विकारण्याऐवजी राज्यात सक्रिय राहण्याचा निर्णय ठाम

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सादर केल्यानंतर लगेचच, गुरुवारी सिद्धरामय्या यांनी एक गोष्ट स्पष्ट केली: त्यांची राजकीय वाटचाल अजून संपलेली नाही. आपण राज्याच्या राजकारणातच सक्रिय राहू आणि राष्ट्रीय राजकारणात जाण्यात आपल्याला काहीही रस नाही, असे त्यांनी जाहीर केले. राजीनामा सादर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना, काँग्रेसच्या या ज्येष्ठ नेत्याने एक महत्त्वाची बाब उघड केली. …

Read More »

अमेरिकेचा इराण आणि ओमानला निर्बंधाचा इशारा होर्मुझच्या सामुद्रधुनीतील भूमिकेवरून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला इशारा

होर्मुझच्या सामुद्रधुनीतील इराण आणि ओमानच्या भूमिकेबद्दल अमेरिकेने निर्बंधांची धमकी दिल्यानंतर आणि तीव्र इशारा दिल्यानंतर आखातातील नाजूक शांततेला नवीन तडे गेले. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट यांनी या सामरिक जलमार्गात टोल आकारण्यासाठी इराणला मदत करणाऱ्या कोणत्याही देश, कंपनी किंवा व्यक्तीवर निर्बंध लादण्याची धमकी दिली. स्कॉट बेसेंन्ट यांनी एक्सवर पोस्ट करत म्हणाले की, …

Read More »

प्रसिद्ध उर्दू कवी शायर बशीर बद्र यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन भोपाळ येथे झाले निधन

प्रख्यात उर्दू कवी बशीर बद्र यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले आहे. नव्या उर्दू गझलचे अनभिषिक्त कवी मानल्या जाणाऱ्या त्यांनी आपल्यामागे शेरोशायरीचा खजिना मागे ठेवला आहे, जो आपण दीर्घकाळ त्याचा आनंद घेत बशीर बद्र यांची आठवण काढत राहु. बशीर बद्र साहेबांनी अत्यंत मधुर सुरांमध्ये गायन केले. अनेकांचा असा विश्वास …

Read More »

पावसाळी मासेमारी बंदी लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई १ जून ते ३१ जुलै दरम्यान यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौकांना बंदी

मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छीमारांच्या जीवित व वित्त रक्षणाच्या उद्देशाने राज्य शासनाने महाराष्ट्राच्या सागरी जलक्षेत्रात पावसाळी मासेमारी बंदी लागू केली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या आदेशानुसार १ जून २०२६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत (दोन्ही दिवस धरून) महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास बंदी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, दिल्लीत गेलेल्या महाराष्ट्राच्या अर्धा डझन मंत्र्यांच्या हाती वाटाण्याच्या अक्षता कांद्याला १५०० रुपये नाही तर ३००० रुपयेच भाव द्या, बकरी ईदच्या निमित्ताने दंगली भडकवण्याचे भाजपाचे षडयंत्र, भाजपाच्या भूमिकेमुळे पशुपालन करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांचे नुकसान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भरतेचे गाजर दाखवून अर्थव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यानेच इंधन संकट ओढवले आहे. कोणतेही ठोस धोरण नसल्याने पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी गॅसची मोठ्या प्रमाणात भाववाढ करावी लागत आहे. इंधन कमतरता होणार हे दिसत असतानाही नरेंद्र मोदी पाच राज्याच्या निवडणूक प्रचारात व्यस्त होते, त्याची मोठी किंमत देशातील जनतेला मोजावी …

Read More »

एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती, आमच्यात मतभेद नाही, विधान परिषद निवडणुकीत महायुती १७ पैकी १७ जागा जिंकणार मराठा समाज, समान नागरी कायदा आणि विकासावर सरकार ठाम

विधान परिषदेच्या १७ जागांसाठी महायुती एकजुटीने निवडणूक लढवणार असून सर्व १७ जागांवर विजय मिळवणार, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट करत जागावाटप सन्मानाने होईल, असे सांगितले. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच …

Read More »