मुंबई

मोदींचे कार्टून, मोदी, मल्ल्या यांच्या छायाचित्रांमुळे प्रचार फिल्मला परवानगी नाकारली ! निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करावा अन्यथा प्रचार थांबवणार: आव्हाड यांचा इशारा

ठाणे : प्रतिनिधी नरेंद्र मोदीसारखे कार्टून दिसते, निरव मोदी, विजय मल्ल्या यांचे छायाचित्र असल्याने मिडिया सेंटरचे सेक्रेटरी मिलिंद दुसाने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या निवडणूक प्रचार फिल्मला परवानगी नाकारण्याची माहिती धक्कादायक आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याप्रश्नी २४ तासात हस्तक्षेप करावा अशी मागणी करत न्याय द्यावा अन्यथा निवडणूकीचा प्रचार थांबवू …

Read More »

आझाद मैदानात वर्षभरात ६३८ आंदोलनात अडीच लाख आंदोलनकर्ते सहभागी दरदिवशी होतात सरासरी २ आंदोलने तर ७०४ आंदोलक असतात

मुंबई: प्रतिनिधी सरकारी दरबारी विविध मागण्यांची तड लावण्यासाठी मुंबईतील सीएसएमटी येथील आझाद मैदानावर राज्यातील तमाम सामाजिक संघटना, राजकिय पक्ष आंदोलनासाठी जमा होतात. या मैदानावर मागील वर्षी अर्थात २०१८ साली राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना, कामगार संघटन, ख्रिश्चन, बंजारा आणि अन्य समाजाबरोबर व्यापारी संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा, उपोषण आणि …

Read More »

वसई-विरार महानगरपालिकेतील अखेर ती २९ गावे अखेर शासनाने वगळली माजी आमदार विवेक पंडीत यांच्या लढ्याला यश

मुंबई: प्रतिनिधी अनेक वर्ष वसई-विरार महानगरपालिकेतून बळजबरीने लोकांच्या मताविरुद्ध सामील केल्या गेलेल्या २९ गावांना वगळावे याकरिता विविध स्तरांवर लढा, आंदोलने केली गेली. तसेच या मागणीकरिता प्रदीर्घ न्यायालयीन लढा ही उभा केला गेला. या पार्श्वभूमीवर २९ गावांना महानगरपालिकेतून वगळण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला. गावे वगळल्याच्या निर्णयाचे प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र राज्य शासनाने …

Read More »

पक्षश्रेष्ठींच्या नाराजीमुळे उमेदवारी अर्ज मागे मात्र कपिल पाटलांना विरोध कायम - सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे

भिवंडीः प्रतिनिधी भिवंडी लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे बाळ्यामामा यांनी बंडखोरी करत भरलेला उमेदवारी अर्ज शुक्रवारी अखेर मागे घेतला . शिवसेनेला संपविण्याची भाषा करणारे भिवंडी लोकसभा मतदार संघाचे भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या विरोधात शिवसेना पक्षश्रेष्ठींचा आदेश न जुमानता सुरेश ( बाळ्या मामा ) म्हात्रे यांनी कपिल पाटील यांच्या विरोधात अपक्ष …

Read More »

होर्डींग्जसाठी ५ लाखांचा हप्ता घेणारा ‘अविचारी’ खासदार कोण? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

ठाणे : प्रतिनिधी काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील होर्डिंग धोकादायक स्थितीत असून ते एका बाजूला कलले आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाच्या कोणत्याही निर्देशांचे पालन न केल्यामुळे हे होर्डींग्ज बेकायदेशीर असल्याचे सिद्ध झालेले आहे. मात्र, ठाण्यातील चार खासदारांपैकी एका खासदाराने या होर्डींग्जच्या उभारणीसाठी पाच लाखांचा हप्ता घेतला आहे. ठाणेकरांच्या …

Read More »

दिव्यांग दाखले वाटप अद्यादेशास ठामपाकडून दीड वर्षे हरताळ अन्यथा २७ मार्चला आंदोलनाचा संघटनेचा इशारा

ठाणेः प्रतिनिधी दिव्यांगांना ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयामधून अपंगत्वाचे दाखले दिले जातात. मात्र, सबंध जिल्ह्यातून दिव्यांग येथे येत असल्याने अपुरे मनुष्यबळ आणि यंत्रणेअभावी सिव्हील रुग्णालयामधून दाखले वाटपास विलंब होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने 17 ऑक्टोबर 2017 रोजी एक अद्यादेश काढून ठामपाच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दिव्यांग दाखले देण्यात यावे, असे आदेश …

Read More »

मुंबई लोकल व रेल्वे सर्कलवर सव्वालाख कोटी खर्च करा मुंबईतील सर्व पुलांची श्वेतपत्रिका जाहीर करण्याची शरद पवार यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी दिवसेंदिवस रेल्वे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यायला हवे असे सांगतानाच बुलेट ट्रेनपेक्षा मुंबईतील रेल्वे पुल आणि मुंबई लोकलची अवस्था सुधारावी अशी मागणी आता बुलेट ट्रेन होणार आहे. यावर सव्वा लाख कोटी खर्च होणार आहे. आमचे सर्वांचे मत आहे की, सरकारने तो पैसा मुंबई लोकल …

Read More »

शरम असेल तर महापौर व मनपा आयुक्तांची हकालपट्टी करा मुंबईतील सर्व पुलांचे पुन्हा ऑडिट करण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई: प्रतिनिधी मुंबई हे शासन आणि महापालिका पुरस्कृत अपघातांचे शहर झाले आहे. भाजप, शिवसेनेच्या भ्रष्ट आणि दळभद्री कारभारामुळे मुंबईकरांचे जगणे कठीण आणि मरण सोपे झाले आहे. सातत्याने पूल कोसळण्याच्या आणि आगींच्या घटनांमध्ये मुंबईकर मारले जात आहेत या निर्लज्ज आणि बेजबाबदार कारभाराची जबाबदारी देखील घेतली जात नाही. हे अत्यंत संतापजनक असून …

Read More »

बुलेट ट्रेन रद्द करून त्याचा निधी उपनगरीय रेल्वेसाठी वापरणार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे आश्वासन

ठाणेः प्रतिनिधी दिवसेंदिवस उपनगरीय रेल्वे प्रवाशांची दुर्दशाच होत आहे. जीव मुठीत धरुन रेल्वेत चढलो तरी जीवंत परत येऊ का? अशी धाकधूक प्रवाशी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मनात कायम असते. रेल्वेच्या पुलांसह रेल्वेंना जोडणारे पादचारी पुल आणि रस्त्यांवरील पुल धोकादायक झालेले असतानाही हे सरकार जबाबदारी स्वीकारत नाही. वास्तविक पाहता, बुलेट ट्रेनवर कोट्यवधी …

Read More »

मेट्रो ४ अंडरग्राऊंड करा ठाणेकरांनी केली मागणी

ठाणे: प्रतिनिधी “म्युस” व ” ठाणे नागरी प्रतिष्ठान” (ठाणे मतदाता जागरण अभियानची मुख्य संघटना यांनी नागरिकांच्या केलेल्या पाहणीत ७९% नागरिकांनी मेट्रो ४ (कासार-वडवली ते मुंबई) ही अंडरग्राऊंड करा याचा कौल दिला आहे. मेट्रो ४ जीचे प्रत्यक्ष काम एमएमआरडीए करत आहे त्याचे स्वागत नागरिकांनी फार उत्साहाने केलेले नाही. वाहतुकीचा खोळंबा, वाढते …

Read More »