भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे समाजपरिवर्तनाचे शक्तिशाली साधन आहे. त्यांच्या विचारांमुळेच वंचित, पीडित आणि दुर्बल घटकांना आत्मसन्मान, समान संधी, न्यायाचा मार्ग मिळाला आहे. संविधानातील घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त झाली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. मुंबईतील दादरच्या चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या …
Read More »उच्च व तंत्रशिक्षण विभागाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नीट नावच माहित नाही पहिला जीआर चुकीचा दुसरा जीआरमध्ये दुरूस्ती
राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून आतापर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यावर आधारीत रायटींग आणि स्पिचेसचे अनेक पुस्तके प्रकाशित करण्यात आली. मात्र कालोऔघात मंत्री बदलला, त्याबरोबर त्यांच्या विभागातील माणसेही बदलली. परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आडनाव नेमके काय आहे किंवा ते कसे लिहिले जाते याची माहिती नसणारा व्यक्ती विरळाच म्हणावा लागेल. …
Read More »पंकजा मुंडे यांची यांची माहिती, उद्योजकता योजनेत शेतकरी गट व वराह पालनाचा समावेश मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत नव्याने समावेश
राज्यात पशुधनावर आधारित उद्योजकता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेत आता मुरघास संयंत्र वाटप योजनेत शेतकरी समूह गटाचा तसेच वराह पालन व्यवसायाचाही समावेश करण्यात आला असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. पशुसंवर्धन विभागाने यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय प्रसिद्ध केला. या निर्णयामुळे मुरघास …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेतले निर्णय
राज्य सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत कुळगांव-बदलापूर मधील मंजूर विकास आराखड्यातील चार एकर जमीन वीज उपकेंद्र उभारणीसाठी देणार, नाबार्डकडून मच्छिमारांच्या मुलभूत सोयी सुविधांकरिता ६१ कोटी २४ लाख, मुंबईत आयईएस स्कील टेक विद्यापीठ होणार, वैद्यकीय शिक्षण, नर्सिंग, आरोग्य सेवा सशक्तीकरणासाठी जायकाकडून ३ हजार ७०८ कोटींची सहाय्यता, आकांक्षित …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाच्या भरती प्रक्रियेत सुधारणेचा निर्णय संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने १८ सेवांचा, ९३ संवर्गाचा समावेश
शासनाच्या विविध पदांवरील भरती प्रक्रिया सुटसुटीत, सक्षम आणि उमेदवारांच्या दृष्टीने सुलभ व्हावी, याकरिता पदभरती प्रक्रियेत सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी देवेंद्र फडणवीस होते. या सुधारणेमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या विविध सेवांतर्गत संवर्गांची संख्या १०२ होणार आहे. तर संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने १८ सेवांचा आणि ९३ संवर्गाचा …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राजीनामा द्यावा परिवहन विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळे राज्यात रस्ते अपघात व त्यातील बळींची संख्या उच्चांकी पातळीवर!
राज्यभरातील रस्त्यांवर सातत्याने होत असलेले अपघात आणि त्यात मृत्यूमुखी पडणा-या नागरिकांची संख्या पाहता रस्ता सुरक्षेच्या बाबतीत राज्य सरकार पूर्णतः अपयशी ठरल्याचे स्पष्ट दिसत आहे. परिवहन विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळेच राज्यात अपघातांची व बळींची संख्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ राजीनामा …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, इंदू मील मधील डॉ आंबेडकर स्मारकास महायुतीकडून वेळकाढूपणा ठोस धोरण व योग्य नियोजन नसल्याने स्मारकास विलंब
भारतीय जनता पक्षाचे सरकार फक्त अदानी अंबानीसाठी असून देश विकण्याचे काम बिनबोभाट सुरु आहे. सरकारकडे कोणतेही निश्चित धोरण, नियोजन व आर्थिक शिस्त नसल्याने अनेक प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाहीत. इंदू मील मधील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासही भाजपा सरकारच्या वेळेकाढूपणाचा फटका बसला आहे. सरकारची इच्छाशक्ती व मानसिकताच नसल्याने स्मारकाचे काम रखडले आहे, असा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, आशा भोसले यांच्या संकल्पनेतील संगीत संस्था स्थापन करणार मंत्रिमंडळ बैठकीत आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या संकल्पनेतील संगीत संस्था स्थापन करण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य मंत्री उपस्थित होते. स्व. आशाताईंनी यांनी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, गारे पालमा कोळसा खाण प्रकल्प राज्याच्या ऊर्जा सुरक्षितेसाठी महत्त्वाचा * पहिल्या कोळसा रेल्वे रॅकचे आगमन, * महानिर्मितीला दीर्घघकालीन व स्थिर कोळसा पुरवठा
राज्यातील ऊर्जा सुरक्षितेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उच्च दर्जाच्या कोळसा खाणीमुळे कोळशाचे अवलंबित्व कमी होणार आहे. तसेच पर्यावरणाच्या संवर्धनासोबत विजेचे दर कमी होऊन भविष्यातील ऊर्जा गरज पूर्ण होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. महानिर्मितीच्या छत्तीसगड राज्यातील गारे पालमा सेक्टर -2 कोळसा खाणीतून कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात येणाऱ्या पहिल्या …
Read More »आदिती तटकरे यांचे आवाहन, ईकेवायसीच्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ईकेवायसी मध्ये दुरुस्ती करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ईकेवायसी (EKYC) करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले असून, महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. पुढे बोलताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात …
Read More »
Marathi e-Batmya