राजकारण

जयंत पाटील यांची टीका, सरकारला शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसता येणार नाही शेतकरी आत्महत्या मुक्त राज्य करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा मात्र आत्महत्यांनी गाठला उच्चांक

राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या संख्येवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यास सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी या सरकारच्या माथ्यावर लागलेला शेतकरी आत्महत्येचा हा ‘कलंक’ सरकारला पुसता येणार नाही असा हल्लाबोल त्यांनी सरकारवर केला आहे. एका बातमीचा आधार …

Read More »

उद्धव ठाकरे यांची टीका, शिवसेनेची स्थापना कमळाबाईला पालखीत… भाजपा आणि शिंदे गटावर केली सडकून टीका

शिवसेनेतील फुटीर गटाकडून आणि भाजपाकडून सातत्याने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शिवसेनेची काँग्रेस केल्याचा आरोप सातत्याने करण्यात येतो. त्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, २५ वर्षे ज्यांच्यासोबत राहिलो त्यांनी आतापर्यंत आमची दोस्तीच पाहिली. मात्र आता आमच्या मशालीची धगही सोसा असा गर्भित इशारा भाजपाला देत २५ …

Read More »

ग्रामविकासच्या भरतीप्रक्रियेतील उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये मंत्री गिरीश महाजन यांचे आवाहन

ग्रामविकास विभागाची संपूर्ण भरतीप्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या आय.बी.पी.एस. या कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सदर परीक्षा अत्यंत पारदर्शक व काटेकोर पद्धतीने होणार आहे. तथापि, काही समाजविघातक प्रवृत्तींच्या व्यक्तींकडून प्रलोभने दाखवून आर्थिक फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा फसवणुकीपासून उमेदवारांनी दक्षता घ्यावी, तसेच अशाप्रकारच्या कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, असे …

Read More »

जी-२० साठी मोदी सरकारच्या कृत्यावरून राहुल गांधी यांचे टीकास्त्र भटक्या कुत्र्यांना बांधले, मार्गावरील झोपडपट्ट्या झाकल्या

आंतरराष्ट्रीय स्तरावरील जी-२० देशाच्या राष्ट्रप्रमुखांची दोन दिवसीय परिषद नवी दिल्लीत होत आहे. या परिषदेच्या पार्श्वभूमी मोदी सरकारने परिषदेसाठी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पाहुण्यांना देशाची गरीबी आणि रस्त्यावरील भटकी कुत्री दिसू नयेत यासाठी दिल्लीत रस्त्यालगत असलेल्या झोपड्यांना लपविण्यासाठी लांबलचक पडदा बांधण्यात आलेला आहे. तसेच भटक्या कुत्र्यांना जबरदस्तीने पकडून त्यांना जनावरांच्या अॅम्ब्युलन्समधून हलविले जात …

Read More »

जी-२० मध्ये भारत- अरब राष्ट्र- युरोपीय संघाच्या नव्या कॉरीडॉरची घोषणा साऊथ एशियामध्ये चीनला पर्याय म्हणून भारताची रणनीती

आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनचा वाढता आक्रमकपणा आणि अर्थनीतीमुळे भारतासह युरोप आणि अरब राष्ट्रांबरोबर अमेरिकेलाही झुंडावे लागत आहे. यापार्श्वभूमीवर सध्या नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या जी-२० या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदतेत चीनच्या वाढत्या दादागिरीला रोखण्यासाठी भारतीय उपखंड ते युरोपीयन महासंघ व्हाया अरब राष्ट्र असा नवा रस्ते आणि दळणवळणाच्या अनुषंगाने कॉरिडॉर उभारण्याच्यादृष्टीने तयारी दाखविली आहे. …

Read More »

राजस्थानात आता भाजपाकडून व्हाया शिंदे राजेंद्रसिंह गुडा प्रयोग वसुंधरा राजे यांच्याऐवजी आता राजेंद्र सिंह गुढा यांची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा

राजस्थानमध्ये काँग्रेसला भगदाड पाडून काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांच्या माध्यमातून भाजपा आघाडीचे सरकार बसविण्याचा प्रयत्न भाजपाच्या अंगाशी आला. त्यामुळे वर्षाअखेर राजस्थान विधानसभा निवडणूकीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना शह देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून राजेंद्रसिंह गुडा यांना राजस्थानच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपाकडून हालचाली सुरु झाल्याची माहिती पुढे येत आहे. …

Read More »

अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना घर बांधणीसाठी दहा लाखापर्यंत कर्ज मंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

अल्पसंख्याक समाजातील समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी पाच तज्ज्ञ सदस्यांची अभ्यास समिती गठित करण्यात येणार आहे. समाजातील नागरिकांना घर बांधणीसाठी दहा लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत योजनेचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची …

Read More »

ओबीसींना धक्का न लावता मराठा समाजाला अतिरीक्त आरक्षण द्या काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला अतिरीक्त आरक्षण द्यायला पाहिजे. केंद्र सरकारने १० टक्के मराठा समाजाला अर्थिक मागास प्रवर्ग म्हणून आरक्षण देताना ५० टक्के अट ओलांडली आहे. तर मग मराठा समाजाला अतिरीक्त आरक्षण देण्यात काय अडचण आहे. असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पुणे काँग्रेस …

Read More »

काका पुतण्यात संघर्ष: शरद पवार गटाने ४० आमदारांना…. अजित पवार गटाचे दावे फेटाळले -निवडणूक आयोगाला पाठविले ई-मेलद्वारे पत्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली असून शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे फूट पडल्यानंतर दोन्ही गटांनी आपलाच खरा पक्ष असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे केला होता.यावर शरद पवार गटाने अजित पवार गटाचे सगळे दावे फेटाळून लावले आहेत. त्यांच्या सोबत गेलेल्या ४० आमदारांना अपात्र करण्याची …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, नरेंद्र मोदींनी ९ वर्षात देशावर १०० लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर उभारला सहाव्या दिवशीही काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला जनतेचा दांडगा प्रतिसाद

स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या सरकारने देशात सुईपासून रॉकेट पर्यंतचा विकास केला. चंद्रावर चांद्रयान-३ सोडले त्या इस्रोची स्थापनासुद्धा काँग्रेस सरकारच्या काळातच झाली. २०१४ साली भाजपाचे सरकार सत्तेवर आले पण या सरकारने मागील ९ वर्षात नवीन काहीच उभे केले नाही. उलट काँग्रेस सरकारने उभे केलेल्या सर्व बँका, रेल्वे, विमानतळे, विमा कंपन्या विकून टाकल्या. देश …

Read More »