राजकारण

पंकजा मुंडे यांचे सूचक वक्तव्य, मी वेगळा निर्णय घेणार वेगळ्या स्वतंत्र राजकिय पक्षाचे सुतोवाच

गेल्या दोन-तीन दिवसापासून राज्यातील शक्तीपीठांच्या यात्रेवर असून शिवा शक्तीने माझ्या डोक्यात घातले की लोकांचे दर्शन घे म्हणून मी आशिर्वाद घेण्यासाठी इथे आले आहे. मात्र माझा या ठिकाणी अनोखा सन्मान केला मी कोणत्याही पदावर नसताना असे माझे मोठे स्वागत केले. यातच माझी यात्रा सफल झाली. आगामी निवडणुका आधी मी यात्रा काढणार …

Read More »

नाना पटोले यांचा टोला, देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा केला म्हणून तर माफी मागितली केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करावी, सर्व समाज घटकांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेल

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात शांततेने आंदोलन सुरु असताना शुक्रवारी पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. पोलीसांनी निर्दयीपणे मारहाण केली, लोकांची डोकी फोडली. मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरु होती त्याला देशभर प्रसिद्धी मिळत होती त्यावरून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी हा प्रकार जाणीवपूर्वक केला आहे. फडणवीसांनी गुन्हा केला म्हणून तर माफी मागितली, असे काँग्रेस …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, भाजपा खोटे बोलून सत्तेत… देश व लोकशाही वाचवण्याची लढाई केवळ काँग्रेसची नाही तर आपल्या सर्वांची

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा खोटे बोलून सत्तेत आले आहे. सत्तेत येताच मोदी सरकारने घटनामत्क व्यवस्थेची मोडतोड केली. लोकशाही व संविधान धाब्यावर बसवूर मनमानी कारभार सुरु आहे. काँग्रसने ६० वर्षात देशभरात विविध संस्थांचे जाळे उभे करुन विकास सगळीकडे पोहचवला आणि मोदी सरकार त्याच संस्था विकून देश चालवत आहेत. मोदी सरकारच्या …

Read More »

शेतकरी सेनेचे (उबाठा ) प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील भाजपामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्वागत

शेतकरी सेनेचे (उबाठा) प्रदेश सरचिटणीस तसेच मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांनी मंगळवारी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष (मुख्यालय) माधव भांडारी, सरचिटणीस माधवी नाईक, विजय चौधरी आदी उपस्थित होते. …

Read More »

भारत जोडो यात्रेच्या पहिल्या वर्धापनदिनी काँग्रेसच्या राज्यभर पदयात्रा व जाहीर सभा LPG गॅसच्या किंमतीतून मोदी सरकारने जनतेला लुटल्याचा पर्दाफाशही करणार

काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमीटरची भारत जोडो यात्रा काढून देश जोडण्याचे काम केले. या ऐतिहासिक भारत जोडो यात्रेला ७ सप्टेंबर २०२३ रोजी एक वर्ष होत आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी राज्यभर सर्व जिल्ह्यात ७ सप्टेंबर रोजी भारत जोडो यात्रा काढून पहिला वर्धापन …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, ५० टक्के सामाजिक आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची गरज संसदेत महिलांना आरक्षण दिल्यास राष्ट्रवादीचा पाठिंबा

देश पातळीवर सामाजिक आरक्षणाची मर्यादा ५० टक्के होऊन वाढवून ६५ टक्के केल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो. परंतु तसे केंद्रातलं भाजपा सरकार करत नाही असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार केंद्र सरकारवर केला. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, आरक्षणासाठी शांतीच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर लाठी हल्ला …

Read More »

८५ टक्के बहुजनांना ५० टक्के आणि १५ टक्क्यांना ५० टक्के आरक्षण हा कुठला न्याय ? इतर राज्यात ५० टक्यांची मर्यादा हटवली मग मराठा आरक्षणासाठीच अडचण का ? - अतुल लोंढे

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे ही राज्यातील सर्वच राजकीय पक्षांची अपेक्षा आहे, सत्ताधारी पक्षही तीच भाषा बोलतो पण कृती मात्र काहीच करत नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर सध्या असलेली ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा काढावी लागेल, बिहार, तामिळनाडू, कर्नाटकसह इतर काही राज्यात आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे …

Read More »

‘इंडिया’ नाव हटवण्याचा अधिकार कुणालाही नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार

जळगाव जिल्हा दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जसह राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही भाष्य केले. तर यावेळी उपस्थित पत्रकारांनी त्यांना केंद्र सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात विरोधकांच्या इंडिया आघाडीचे नाव बदलले जाणार असल्याची चर्चा आहे. यावर मत …

Read More »

लाठीचार्जच्या आरोपांवरून ठाकरे-सरकारमध्ये आव्हान प्रतिआव्हान अजित पवार यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान, ...तर आम्ही तिघेही राजकारण सोडू

जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर सरकार विरुद्ध विरोधक असा सामना रंगला आहे. मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्याचे आदेश दिल्याचे आरोप उद्धव ठाकरे यांनी सिद्ध करावे. हे आरोप सिद्ध झाल्यास आम्ही तिघेही (एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार) राजकारण सोडू असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले तर महाविकास आघाडीच्या कार्यकाळात …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र द्या अपर मुख्य सचिवांच्या समितीने प्राधान्याने महिन्याभरात अहवाल सादर करावा

मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रक्रिया करण्याकरिता नेमलेल्या अपर मुख्य सचिवांच्या समितीने तातडीने कार्यवाही करून महिनाभरात अंतिम अहवाल द्यावा, या कामी सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मराठा आरक्षण व समाजाला सुविधा देण्यासाठी नेमलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक आज सह्याद्री अतिथगृह येथे झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »